शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

बाबासाहेबांची ‘ती’ ब्ल्यू प्रिंट बौद्धमय बनविणारी होती

By admin | Updated: September 22, 2015 23:25 IST

राजरत्न आंबेडकर : वाघिवरे येथे जनजागरण प्रबोधन संमेलन

देवगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय करण्याचे जे स्वप्न ठेवले होते, ते साकार करण्यासाठीच दि बुद्धीष्ट सोसायटी आॅफ इंडिया तथा महासभेची स्थापना केली होती. बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना करताना या संस्थेची उद्देशिका, कार्यप्रणाली, नियमांची ब्ल्यू पिंं्रट तयार करून ठेवली होती. परंतु आमच्या लोकांना हे माहितच नाही. डॉ. बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेसाठी बनविलेली ब्ल्यू पिंं्रट ही केवळ या संस्थेची नव्हती तर या देशाला बौद्धमय बनविणारी होती, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय महासचिव राजरत्न आंबेडकर यांनी देवगड तालुक्यातील वाघिवरे या ठिकाणी व्यक्त केले. देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ विजयदुर्ग विभागाच्यावतीने महापुरूष जीवनसंदेश अभियानाअंतर्गत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या शृंखलाबद्ध विशेष जनजागरण प्रबोधन संमेलनामध्ये उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत विचारमंचावर संघाचे अध्यक्ष किशोर कांबळे, उपाध्यश दिलीप वाडेर, कार्याध्यक्ष तिर्लोटकर, डी. के. पेडणेकर, महिला अध्यक्ष सुरभी पुरळकर, उपाध्यक्षा अर्पिता साळुंखे, गाव शाखेचे अध्यक्ष मनोहर सावंत तसेच मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत आठवले, सुनील भालेराव, प्रदिप सावंत, रहाटे आदी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख दहा उद्देश निश्चित केले होते. यामध्ये भारताला बौद्धमय करण्याचाच मुख्य उद्देश दिसून येतो. राजरत्न म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी लिहून ठेवले की, भारतीय बौद्ध महासभेव्दारे देशात शाळा आणि महाविद्यालयांची निर्मिती करण्यात यावी. यामध्ये धर्माच्या आधारावर विज्ञानवादी शिक्षण दिले जावे. यामुळे प्रत्येक धर्माचा चिकीत्सक पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करून कोणता धर्म जनकल्याणाचा आहे हे ठरविण्याची बौध्दीक क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होईल. (प्रतिनिधी)+बौद्ध महासभेव्दारे पूर्ण क्षमतेने काम करणारते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेव्दारे देशात दवाखाने, अनाथालये, मदत केंद्रे स्थापन करण्यात यावीत असे सांगितले. डॉ. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे दवाखाने, अनाथालये, मदत केंद्रे स्थापन झाली असती तर सरकारकडून आरोग्याच्या कोणत्याही सुविधा घेण्याची गरज उरली नसती. स्कोणत्याही योजनांसाठी याचना करण्याची गरज पडणार नव्हती. परंतु गेल्या ५९ वर्षात यावर काहीच काम झाालेले नाही. त्यामुळे आता भारतीय बौद्ध महासभेव्दारे बाबासाहेबांचा उद्देश पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याचे ते म्हणाले.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम.बौध्दजन सेवा संघातर्फे महापुरूष जीवनसंदेश अभियानांतर्गत संमेलन.बाबासाहेबांनी भारतीय बौध्द महासभेचे दहा उद्देश केले होते निश्चित : राजरत्न आंबेडकर.