शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांची ‘ती’ ब्ल्यू प्रिंट बौद्धमय बनविणारी होती

By admin | Updated: September 22, 2015 23:25 IST

राजरत्न आंबेडकर : वाघिवरे येथे जनजागरण प्रबोधन संमेलन

देवगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय करण्याचे जे स्वप्न ठेवले होते, ते साकार करण्यासाठीच दि बुद्धीष्ट सोसायटी आॅफ इंडिया तथा महासभेची स्थापना केली होती. बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना करताना या संस्थेची उद्देशिका, कार्यप्रणाली, नियमांची ब्ल्यू पिंं्रट तयार करून ठेवली होती. परंतु आमच्या लोकांना हे माहितच नाही. डॉ. बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेसाठी बनविलेली ब्ल्यू पिंं्रट ही केवळ या संस्थेची नव्हती तर या देशाला बौद्धमय बनविणारी होती, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय महासचिव राजरत्न आंबेडकर यांनी देवगड तालुक्यातील वाघिवरे या ठिकाणी व्यक्त केले. देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ विजयदुर्ग विभागाच्यावतीने महापुरूष जीवनसंदेश अभियानाअंतर्गत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या शृंखलाबद्ध विशेष जनजागरण प्रबोधन संमेलनामध्ये उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत विचारमंचावर संघाचे अध्यक्ष किशोर कांबळे, उपाध्यश दिलीप वाडेर, कार्याध्यक्ष तिर्लोटकर, डी. के. पेडणेकर, महिला अध्यक्ष सुरभी पुरळकर, उपाध्यक्षा अर्पिता साळुंखे, गाव शाखेचे अध्यक्ष मनोहर सावंत तसेच मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत आठवले, सुनील भालेराव, प्रदिप सावंत, रहाटे आदी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख दहा उद्देश निश्चित केले होते. यामध्ये भारताला बौद्धमय करण्याचाच मुख्य उद्देश दिसून येतो. राजरत्न म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी लिहून ठेवले की, भारतीय बौद्ध महासभेव्दारे देशात शाळा आणि महाविद्यालयांची निर्मिती करण्यात यावी. यामध्ये धर्माच्या आधारावर विज्ञानवादी शिक्षण दिले जावे. यामुळे प्रत्येक धर्माचा चिकीत्सक पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करून कोणता धर्म जनकल्याणाचा आहे हे ठरविण्याची बौध्दीक क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होईल. (प्रतिनिधी)+बौद्ध महासभेव्दारे पूर्ण क्षमतेने काम करणारते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेव्दारे देशात दवाखाने, अनाथालये, मदत केंद्रे स्थापन करण्यात यावीत असे सांगितले. डॉ. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे दवाखाने, अनाथालये, मदत केंद्रे स्थापन झाली असती तर सरकारकडून आरोग्याच्या कोणत्याही सुविधा घेण्याची गरज उरली नसती. स्कोणत्याही योजनांसाठी याचना करण्याची गरज पडणार नव्हती. परंतु गेल्या ५९ वर्षात यावर काहीच काम झाालेले नाही. त्यामुळे आता भारतीय बौद्ध महासभेव्दारे बाबासाहेबांचा उद्देश पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याचे ते म्हणाले.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम.बौध्दजन सेवा संघातर्फे महापुरूष जीवनसंदेश अभियानांतर्गत संमेलन.बाबासाहेबांनी भारतीय बौध्द महासभेचे दहा उद्देश केले होते निश्चित : राजरत्न आंबेडकर.