शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

बाबासाहेबांची ‘ती’ ब्ल्यू प्रिंट बौद्धमय बनविणारी होती

By admin | Updated: September 22, 2015 23:25 IST

राजरत्न आंबेडकर : वाघिवरे येथे जनजागरण प्रबोधन संमेलन

देवगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय करण्याचे जे स्वप्न ठेवले होते, ते साकार करण्यासाठीच दि बुद्धीष्ट सोसायटी आॅफ इंडिया तथा महासभेची स्थापना केली होती. बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना करताना या संस्थेची उद्देशिका, कार्यप्रणाली, नियमांची ब्ल्यू पिंं्रट तयार करून ठेवली होती. परंतु आमच्या लोकांना हे माहितच नाही. डॉ. बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेसाठी बनविलेली ब्ल्यू पिंं्रट ही केवळ या संस्थेची नव्हती तर या देशाला बौद्धमय बनविणारी होती, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय महासचिव राजरत्न आंबेडकर यांनी देवगड तालुक्यातील वाघिवरे या ठिकाणी व्यक्त केले. देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ विजयदुर्ग विभागाच्यावतीने महापुरूष जीवनसंदेश अभियानाअंतर्गत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या शृंखलाबद्ध विशेष जनजागरण प्रबोधन संमेलनामध्ये उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत विचारमंचावर संघाचे अध्यक्ष किशोर कांबळे, उपाध्यश दिलीप वाडेर, कार्याध्यक्ष तिर्लोटकर, डी. के. पेडणेकर, महिला अध्यक्ष सुरभी पुरळकर, उपाध्यक्षा अर्पिता साळुंखे, गाव शाखेचे अध्यक्ष मनोहर सावंत तसेच मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत आठवले, सुनील भालेराव, प्रदिप सावंत, रहाटे आदी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख दहा उद्देश निश्चित केले होते. यामध्ये भारताला बौद्धमय करण्याचाच मुख्य उद्देश दिसून येतो. राजरत्न म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी लिहून ठेवले की, भारतीय बौद्ध महासभेव्दारे देशात शाळा आणि महाविद्यालयांची निर्मिती करण्यात यावी. यामध्ये धर्माच्या आधारावर विज्ञानवादी शिक्षण दिले जावे. यामुळे प्रत्येक धर्माचा चिकीत्सक पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करून कोणता धर्म जनकल्याणाचा आहे हे ठरविण्याची बौध्दीक क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होईल. (प्रतिनिधी)+बौद्ध महासभेव्दारे पूर्ण क्षमतेने काम करणारते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेव्दारे देशात दवाखाने, अनाथालये, मदत केंद्रे स्थापन करण्यात यावीत असे सांगितले. डॉ. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे दवाखाने, अनाथालये, मदत केंद्रे स्थापन झाली असती तर सरकारकडून आरोग्याच्या कोणत्याही सुविधा घेण्याची गरज उरली नसती. स्कोणत्याही योजनांसाठी याचना करण्याची गरज पडणार नव्हती. परंतु गेल्या ५९ वर्षात यावर काहीच काम झाालेले नाही. त्यामुळे आता भारतीय बौद्ध महासभेव्दारे बाबासाहेबांचा उद्देश पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याचे ते म्हणाले.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम.बौध्दजन सेवा संघातर्फे महापुरूष जीवनसंदेश अभियानांतर्गत संमेलन.बाबासाहेबांनी भारतीय बौध्द महासभेचे दहा उद्देश केले होते निश्चित : राजरत्न आंबेडकर.