शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

किनाऱ्यांवर काळ्या तेलाचे थर

By admin | Updated: August 25, 2014 22:12 IST

जैवविविधता धोक्यात : मत्स्योत्पादनावरही विपरीत परिणाम

संदीप बोडवे - मालवण --सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ला या तीन तालुक्यांची किनारपट्टी काळ््या तेलाच्या तवंगामुळे प्रदूषित झाली आहे. सागरी उधाण आणि भरतीच्यावेळी किनारपट्टीवर काळे तेल आणि त्या काळ््या तेलाचे गोळे जमा होऊ लागले आहेत. पर्यावरणास घातक असलेल्या काळ््या तेलाच्या तवंगामुळे सिंधुदुर्गची सागरी जैवविविधता धोक्यात येत असून शासनाने या संदर्भात प्रभावी धोरण आखण्याची गरज निर्माण झाली आहे.मागील दोन वर्षे सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर एकाचवेळी स्वच्छता मोहीम राबवून किनाऱ्यांवरील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यात आली. भारत सरकारने संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) जीईएफ आदींच्या माध्यमातून हाती घेतलेल्या ‘सागरी जैवविविधतेचे संवर्धन, जतन आणि तिचा शाश्वत वापर’ या प्रकल्पाअंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेनंतर प्रकल्पकर्ते आणि शासनाकडून प्लास्टिक निर्मुलनासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र किनारपट्टीवर पसरत असलेल्या काळ््या तेलाच्या थरांमुळे सागरी प्रदूषणाचा प्रश्न अजूनही गंभीर राहिला आहे. काळ््या तेलाच्या तवंगामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील जैवविविधता झपाट्याने धोक्यात येत असताना जैवविविधतेसंदर्भातील प्रकल्पकर्त्यांनी तसेच शासनाने या प्रदूषणाकडे अद्याप फारसे लक्ष दिलेले नाही. यंदाच्या पावसाळ््यात देवबाग, तोंडवळी, आचरा, तळाशिल, मिठमुंबरी तसेच वायंगणीच्या समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर तेलाचे तवंग आढळून आले. तेलाच्या थरामुळे तसेच काळ््या व घट्ट गोळ््यांमुळे किनारे प्रदूषित झाले. खाडी किंवा समुद्रकिनारी पावसाळ््यात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना याचा त्रास अधिक जाणवला. अनेकवेळा काळ््या तेलाच्या तवंगामुळे किनाऱ्याकडे येणारी मासळी कमी झाल्याची तक्रार मच्छिमारांनी नोंदवली. किनाऱ्यांवर पसरणारे तेल क्रुड आॅईल तसेच बोटींचे इंधन असल्याचे स्थानिक मच्छिमारांनी सांगितले. बॉम्बे हाय येथे तेल निर्मिती क्षेत्र आहे. मुंबईजवळच मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी येथे मोठ्या मालवाहू बोटींच्या इंजिनांचे वंगण तेल बदलण्याचे काम केले जाते. बदललेले खराब तेल समुद्रात सोडण्यात येते. दरवर्षी पावसाळ््यात किनाऱ्यांवर प्लास्टिक कचरा, तुटलेली जाळी, शितपेयांचे डबे, खाद्यपदार्थांची वेस्टणे आदी कचरा वाहून येतो. यंदा या कचऱ्याबरोबरच तेलाचे गोळे वाहून आल्याने किनारपट्टी अस्वच्छ झाली.मच्छिमारांचे नुकसानपावसाळ््यात समुद्रात व खाड्यांमध्ये गळ टाकून, पागुन किंवा लहान जाळ््यांद्वारे किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते. या मासेमारीमध्ये सोनम, कोकर, मोरी, वागळी, तांबोशी, पालू, शेंगटी आदी ठराविक प्रकारचे मासे पुरेशा प्रमाणात मिळतात. पावसाळ््यात तेलाच्या तवंगामुळे या माशांनी किनाऱ्यापासून दूर राहणे पसंद केल्याने मच्छिमारांचे नुकसान झाले आहे.- आनंद मालंडकर, ज्येष्ठ कासवमित्र, मालवणजीव साखळी धोक्यातऔद्योगिक क्षेत्रातील रसायन मिश्रीत सांडपाणी समुद्रात सोडण्यात येत असल्याने समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. यामुळे सागरी जीव साखळी धोक्यात आली आहे. यावर वेळीच आवर घालण्याची गरज आहे. अन्यथा सागरी प्रदुषण वाढत जाणार आहे आणि त्याचे विपरीत परिणाम आगामी काळात सर्र्वानाच भोगावे लागणार आहेत.- गंगाराम घाडी, अध्यक्ष, जिल्हा श्रमजिवी रापण संघकिनारा बनला तेलयुक्तमालवाहू बोटींच्या अपघातातूनही समुद्रात तेल गळती होते. ८ आॅगस्ट २०१० रोजी मुंबईजवळ मालवाहू बोटींची टक्कर झाल्याने हजारो लिटर तेलाची समुद्रात गळती झाली होती.याचा परिणाम म्हणून २०१० साली समुद्रातील मासे मरून किनाऱ्यांना लागत होते. सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर पावसाळ््यात काळे तेल व त्याचे गोळे वाहून आल्याने किनाऱ्यांवर तेलाचे थर पसरले होते.येथील चिवला, तारकर्ली, देवबाग, कुणकेश्वर, निवती हे किनारे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्धीस येत आहेत. किनाऱ्यांवरील तेलाचे थर तसेच खडकांना तेलाचे तवंग चिकटल्याने पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तेलामुळे किनारे दूषित झाल्यास पावसाळी पर्यटनावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.