शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

आगामी निवडणुकांसाठी भाजपची व्यूहरचना

By admin | Updated: July 21, 2016 23:30 IST

प्रमोद जठार यांची माहिती : पक्षवाढीसाठी अटल बंधनाचा संकल्प

कणकवली : सिंधुदुर्गात होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या निवडणूक समितीची स्थापना करण्यात आली आहे. या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त भाजपाचे सदस्य निवडून यावेत यासाठी व्यूहरचना निश्चित करण्यात आली आहे तर १८ आॅगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भाजप परिवार वाढविण्याच्या दृष्टीने ‘अटल बंधन’ बांधण्यात येणार आहे. या माध्यमातून ३ लाख लोकांना परिवारात समाविष्ट करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे दिली.येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भाजपाच्या निवडणूक समितीची बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रमोद जठार यांनी बैठकीतील मुद्यांबाबत माहिती दिली. यावेळी तालुकाध्यक्ष रविंद्र शेट्ये, परशुराम झगडे, सुहास सावंत आदी उपस्थित होते. प्रमोद जठार म्हणाले, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्यावतीने १७ सदस्यांचा समावेश असलेली निवडणूक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी मी असणार आहे. तर माजी आमदार राजन तेली, अतुल काळसेकर, विलास हडकर, अ‍ॅड. अजित गोगटे, स्नेहा कुबल, जयदेव कदम, प्रमोद रावराणे, प्रभाकर सावंत, यशवंत आठलेकर, राजन चिके, शामराव काणेकर, सदाशिव ओगले, राजश्री धुमाळे आदींचा समावेश आहे. या समितीची पहिली बैठक गुरुवारी झाली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रभारी म्हणून काका कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी संकलित केलेल्या अहवालावर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुकीबाबतही व्यूहरचना आखण्यात आली आहे.मालवण येथे ५ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तर देवगड येथे सायंकाळी ५ वाजता, ६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ले येथे बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत नियोजन करण्यात आले आहे.नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून देवगडसाठी अ‍ॅड. अजित गोगटे, मालवणसाठी विलास हडकर, वेंगुर्लेसाठी स्नेहा कुबल तर सावंतवाडीसाठी राजन तेली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील कालावधीत निवडणुकीच्या निमित्ताने मेळावे तसेच कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद गटस्तरावर एका कार्यकर्त्याला पालकत्व देऊन त्या सर्वांची दर आठवड्याला बैठक घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंत्र्यांचे दौरे निश्चित करून विविध समस्या मार्गी लावण्यात येणार असल्याचेही जठार यांनी सांगितले. भाजपाच्यावतीने ‘अटल बंधन’रक्षाबंधनापासून भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक तसेच इतर पक्षातून भाजपात येणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटीत करण्यासाठी ‘अटल बंधन’ बांधण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ९१३ बुथच्या माध्यमातून हे बंधन बांधण्यात येणार असून ३ लाख लोकांना भाजपा परिवाराशी जोडण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे जठार यांनी सांगितले. युतीचा निर्णय निवडणुकीवेळीपक्षाचे काम वेगळे असून निवडणूक हा वेगळा विषय आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर युती करायची की नाही हा निर्णय त्या त्या वेळी निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यात येईल. अगोदरच युती जाहिर केल्यास कार्यकर्ते शांत रहात असल्याने पक्षाचे नुकसान होत असते. त्यामुळे पक्ष वाढविण्यासाठी इतरवेळी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जठार यावेळी म्हणाले. (वार्ताहर)+राणेंना गंभीर घेऊ नकानारायण राणे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या जुगलबंदीत जिल्हावासियांनी एकच संदेश घ्यायचा आहे. तो म्हणजे राजकारणात नारायण राणेंना गंभीरपणे घेऊ नये. सोनिया गांधी, माणिकराव ठाकरे यांच्यावर टीका करणारे नारायण राणे आता काँग्रेसचेच विधान परिषद सदस्य झाले आहेत. त्यामुळे त्यांचे वक्तव्य काँग्रेसही गंभीरपणे घेत नाही. तसेच आपणही केले पाहिजे, असे जठार म्हणाले.