शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वरात भाजपला धक्का

By admin | Updated: July 9, 2016 00:48 IST

सूर्यकांत साळुंखेंचा राजीनामा : कारण मात्र गुलदस्त्यात

देवरूख : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख सूर्यकांत साळुंखे यांनी आपल्या भाजपमधील पदांचा राजीनामा सादर केल्याने चिपळूण - संगमेश्वरमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. साळुंखे यांच्या अचानक राजीनाम्यामागे नेमके कारण काय? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.सूर्यकांत साळुंखे हे प्रसिध्द उद्योजक असून, ते संगमेश्वर तालुक्याचे सुपुत्र आहेत. सन २००९ साली मनसेकडून त्यांनी चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत १५ हजारपेक्षा अधिक मते घेतली होती. यानंतर ते खऱ्या अर्थाने चर्चेत आले. मनसेचे सहसंपर्कप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात मनसेवाढीत साळुंखे यांचा मोठा वाटा होता. सहा वर्षे मनसेत काम केल्यानंतर पक्षांतर्गत कुरबुरीमुळे कंटाळलेले साळुंखे यांनी मनसेला रामराम केला होता. चिपळूण आणि संगमेश्वरमध्ये असलेला त्यांचा दांडगा संपर्क पाहून त्यांना आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.माजी आमदार विनय नातू आणि जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या भेटीनंतर साळुंखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही तालुक्यातील आपल्या असंख्य समर्थकांसह ते सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपवासी झाले. त्यांच्या प्रवेशाने दोन्ही तालुक्यातील भाजपला चांगलीच बळकटी मिळाली.प्रवेशानंतर काहीच दिवसात जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली तर त्यानंतर काहीच दिवसात त्यांना चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख करण्यात आले.यानंतर साळुंखे यांनी आपल्या कामाचा जोर वाढवला होता. जिल्हा कार्यकारिणीसह स्थानिक भागात बैठका घेत त्यांनी आपल्या समर्थकांना एकमार्गी भाजपमध्ये आणण्याचा सपाटा लावला होता. एवढे सारे सुरळीत सुरू असताना दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या दोनही पदांचा राजीनामा जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्याकडे सादर केला आहे. अद्याप तो मंजूर झाला नसला तरी साळुंखे यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण तरी काय? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडला आहे.राजीनाम्यामध्ये साळुंखे यांनी आपण पदांसाठी जास्त वेळ देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले असून, भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहू, असे नमूद केल्याने ते पक्ष सोडणार नाहीत हे निश्चित झाले आहे. मात्र, राजीनाम्याचे खरे कारण काय? याबाबत चर्चेला ऊत आला आहे. याबाबत साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)काही महिन्यातच रामराम... : विविध चर्चांना ऊतमनसेतून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या सूर्यकांत साळुंखे यांना भाजपने प्रयत्न करून आपल्या पक्षात ओढले. त्याला काही दिवस लोटले असताना त्यांनी आपल्या पदांना रामराम ठोकला. त्यामुळे विविध चर्चांना ऊत आला आहे. भाजपला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.राजीनामा अद्याप मंजूर नाही.जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्याकडे केला राजीनामा सुपूर्द.पदांसाठी जास्त वेळ देऊ शकत नाही : साळुंखे.