शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वरात भाजपला धक्का

By admin | Updated: July 9, 2016 00:48 IST

सूर्यकांत साळुंखेंचा राजीनामा : कारण मात्र गुलदस्त्यात

देवरूख : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख सूर्यकांत साळुंखे यांनी आपल्या भाजपमधील पदांचा राजीनामा सादर केल्याने चिपळूण - संगमेश्वरमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. साळुंखे यांच्या अचानक राजीनाम्यामागे नेमके कारण काय? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.सूर्यकांत साळुंखे हे प्रसिध्द उद्योजक असून, ते संगमेश्वर तालुक्याचे सुपुत्र आहेत. सन २००९ साली मनसेकडून त्यांनी चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत १५ हजारपेक्षा अधिक मते घेतली होती. यानंतर ते खऱ्या अर्थाने चर्चेत आले. मनसेचे सहसंपर्कप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात मनसेवाढीत साळुंखे यांचा मोठा वाटा होता. सहा वर्षे मनसेत काम केल्यानंतर पक्षांतर्गत कुरबुरीमुळे कंटाळलेले साळुंखे यांनी मनसेला रामराम केला होता. चिपळूण आणि संगमेश्वरमध्ये असलेला त्यांचा दांडगा संपर्क पाहून त्यांना आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.माजी आमदार विनय नातू आणि जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या भेटीनंतर साळुंखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही तालुक्यातील आपल्या असंख्य समर्थकांसह ते सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपवासी झाले. त्यांच्या प्रवेशाने दोन्ही तालुक्यातील भाजपला चांगलीच बळकटी मिळाली.प्रवेशानंतर काहीच दिवसात जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली तर त्यानंतर काहीच दिवसात त्यांना चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख करण्यात आले.यानंतर साळुंखे यांनी आपल्या कामाचा जोर वाढवला होता. जिल्हा कार्यकारिणीसह स्थानिक भागात बैठका घेत त्यांनी आपल्या समर्थकांना एकमार्गी भाजपमध्ये आणण्याचा सपाटा लावला होता. एवढे सारे सुरळीत सुरू असताना दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या दोनही पदांचा राजीनामा जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्याकडे सादर केला आहे. अद्याप तो मंजूर झाला नसला तरी साळुंखे यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण तरी काय? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडला आहे.राजीनाम्यामध्ये साळुंखे यांनी आपण पदांसाठी जास्त वेळ देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले असून, भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहू, असे नमूद केल्याने ते पक्ष सोडणार नाहीत हे निश्चित झाले आहे. मात्र, राजीनाम्याचे खरे कारण काय? याबाबत चर्चेला ऊत आला आहे. याबाबत साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)काही महिन्यातच रामराम... : विविध चर्चांना ऊतमनसेतून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या सूर्यकांत साळुंखे यांना भाजपने प्रयत्न करून आपल्या पक्षात ओढले. त्याला काही दिवस लोटले असताना त्यांनी आपल्या पदांना रामराम ठोकला. त्यामुळे विविध चर्चांना ऊत आला आहे. भाजपला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.राजीनामा अद्याप मंजूर नाही.जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्याकडे केला राजीनामा सुपूर्द.पदांसाठी जास्त वेळ देऊ शकत नाही : साळुंखे.