शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

इंदू मिलचा प्रश्न भाजपने सोडविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2015 00:34 IST

भीमराव आंबेडकर : बौद्ध महासभेचे मुंबईत लवकरच देशव्यापी अधिवेशन

कुडाळ : मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होण्यासाठीचा प्रश्न काँग्रेसच्या राज्यात सुटला नाही, तो भाजप सरकारने तत्काळ सोडवून मुंबई-इंदू मिल येथे स्मारक होण्याचा मार्ग मोकळा केला आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली. समाज बांधवांचे धार्मिक, सामाजिक प्रश्न सोडविण्याकरिता येत्या १६ व १७ मे रोजी भारतीय बौद्ध महासभेचे देशव्यापी अधिवेशन मुंबईत होणार असून, यापुढे संस्थेच्यावतीने राजकीय क्षेत्रातही बांधवांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. कुडाळ तालुक्यातील बाव व घावनळे येथील गावांमध्ये खासगी कार्यक्रमानिमित्त भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर आले होते. यावेळी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकर यांनी १६ व १७ मे रोजी मुंबई येथे होणाऱ्या देशव्यापी महाअधिवेशनाबाबत येथील भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी आंबेडकर म्हणाले, भारतीय बौद्ध महासभा ही धार्र्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून ही संस्था राजकीय पक्षविरहीत काम करते. यापुढे ही संस्था समाज बांधवांना राजकीय क्षेत्रातही मार्गदर्शन करेल. यावेळी भारतीय बौद्ध महासभा मुंबईचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भिकाजी वर्दे, प्रभाकर जाधव, विलास वळंजू, महेश परूळेकर, व्ही. डी. जाधव, सोमा कुडाळकर, आर. डी. कदम, महेंद्र कदम, आनंद कासार्डेकर, पी. डी. माणगावकर, जनीकुमार कांबळे, चंद्रकांत कदम, सुदीप कांबळे, वि.रा. आसुलकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)बाबासाहेबांच्या स्मारकाची सर्वांचीच इच्छा पूर्णबाबासाहेबांचे मुंबईत मोठे स्मारक व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा होती. चैत्यभूमी येथील जागेत मोठे स्मारक होऊ शकत नाही. त्यामुळे इंदू मिलची जागा निश्चित करण्यात आली आहे. परंतु काँग्रेस सरकारच्या काळात गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले हे स्मारक सध्याच्या सरकारने तत्काळ मंजूर केले. याचा आनंद आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर म्हणाले.जग जसजसे प्रगत होत आहे, तसतसे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्व वाढत असून मानवता आणि आदर्श समाज घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना वेगळा सन्मान आहे. भारतीय बौद्ध महासभा ही धार्र्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून ही संस्था राजकीय पक्षविरहीत काम करते. यापुढे ही संस्था समाज बांधवांना राजकीय क्षेत्रातही मार्गदर्शन करेल.- भीमराव आंबेडकर, कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा