शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

भाजप जिल्ह्यात सेनेचा बालेकिल्ला पोखरणार

By admin | Updated: June 29, 2015 00:33 IST

मेहता यांची निवड : संपर्क मंत्रीपदावरून चर्चेला उधाण

रत्नागिरी : गेल्या काही दशकांपासून कोकण विभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनून राहिला आहे. या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने काहीशी घुसखोरी करीत आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपला कोकणात आपला वेगळा ठसा उमटवणे वा कार्यकर्त्यांची मोट बांधणे अद्याप शक्य झालेले नाही. त्यामुळे नव्या दमाने कोकणात भाजपचे बळ वाढवण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यासाठी भाजपचे संपर्क मंत्री म्हणून प्रकाश मेहता यांची नियुक्ती करण्यात येत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात राज्य सरकारमधील पर्यावरणमंत्री म्हणून रामदास कदम हे काम पाहात आहेत, तर खेडमधून रवींद्र वायकर हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. हे दोन्ही मंत्री शिवसेनेचेच आहेत. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात शिवसेनेकडे तीन, तर राष्ट्रवादीकडे दोन मतदारसंघाचे आमदार आहेत. भाजपला मात्र रत्नागिरी जिल्ह्यात तसेच शेजारच्या सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात एकाही ठिकाणी विधानसभा मतदारसंघ जिंकता आला नाही. युतीच्याच माध्यमातून यापूर्वीचा कारभार सुरु होता. परंतु आता राज्य स्तरावरच शिवसेना - भाजपचा काडीमोड झाल्यामुळे प्रत्येक पक्षाला स्वतंत्रपणे आपले अस्तित्व निर्माण करण्याची वेळ आली आहे. कोकण हा शिवसेनेचा राजकीय बालेकिल्ला असताना राष्ट्रवादीने जोरदार धडक देत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला आव्हान दिले आहे. मात्र, भाजप कोठेही बळकट असल्याचे दिसून येत नाही.कोकणआणि मुुंबई यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे मुुंबईतील यशासाठी कोकणातील संघटना बळकट असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. ही बाब लक्षात घेऊनच भाजपने गेल्या काही महिन्यांपासून कोकणात पक्ष संघटना मजबुतीचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी देशभरातील सभासद मोहीमही कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आली. परंतु या मोहिमेला म्हणावे तेवढे यश मिळालेले नाही. ही बाब लक्षात घेऊनच राज्याच्या भाजप नेतृत्त्वाने कोकणातील संघटनेला बळकटी आणण्यासाठी काही नवीन प्रयोग करण्याचे ठरविले आहे. कोकणात भाजपचा स्वतंत्र मंत्री देण्यापेक्षा अन्य विभागात जे भाजपचे मंत्री म्हणून काम करतात, त्यांनाच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्रीपद देऊन पक्षसंघटना मजबूत करता येईल, असे भाजपच्या नेत्यांना वाटते आहे. त्यातूनच संपर्क मंत्रीपदाचा विषय पुढे आला आहे. तरीही कोकणातीलच एखाद्या भाजप नेत्याला मंत्रीपद द्यावे, अशी कोकणमधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यादृष्टीने भाजपचे प्रदेश प्रवक्ते सुरेंद्र तथा बाळ माने तसेच माजी आमदार विनय नातू यांच्याकडे मंत्रीपद दिले जावे, अशी येथील भाजप कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्यातून अनेक विकासकामांना गती मिळून अन्य पक्षांना शह देणे सोपे जाईल. तसेच पक्ष संघटनाही मजबूत बनेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर संपर्क मंत्रीपदाचा पर्याय स्वीकारला जाणार की, कोकणातील नेत्याला मंत्रीपद दिले जाणार, याबाबत तर्क वितर्क सुरु आहेत. (प्रर्तििनधी)कोकणात मजबूत संघटन करणार कोकणात भाजपचे वर्चस्व निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आता कोकणकडे आपला मोर्चा वळविला आहे. संपर्क मंत्रीपद महत्त्वाचे असून, प्रकाश मेहता यांना या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. संपूर्ण कोकणात जिल्ह्यात राज्य सरकारमधील महत्त्वाचे पद देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत.