शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणांतर्गत पूलांचे भूमिपूजन

By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST

विनायक राऊत : महामार्गावर पाच ठिकाणी बॉक्सेलऐवजी उड्डाण पूल

कणकवली/सिंधुदुर्गनगरी : मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया आॅगस्टपूर्वी पूर्ण केली जाईल. येत्या डिसेंबरपूर्वी चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याचे नियोजन आहे. कणकवली, लांजा, पाली, चिपळूण या बाजारपेठांच्या ठिकाणी प्रस्तावित बॉक्सेल पुलाचे आराखडे बदलून येथे उड्डाणपूल बनविण्यासाठी आराखडे तयार करण्यात येत आहेत. खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. जानवली पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात राऊत बोलत होते. यावेळी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा भाग म्हणून या महामार्गावरील जानवली (कणकवली), कसाल नदी व पीठढवळ नदीवरील पुलांचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. यावेळी राऊत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, संजय पडते, महामार्ग प्राधिकरणाचे ए. डी. सूर्यवंशी, यतीन पटवर्धन, बळी परब, युवासेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा राजश्री धुमाळे, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख सचिन सावंत, नगरसेविका नंदिनी धुमाळे, सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, युवा सेना तालुकाप्रमुख राजू राठोड, शामल म्हाडगुत, उपतालुकाप्रमुख प्रथमेश सावंत आदी उपस्थित होते. राऊत पुढे म्हणाले की, चौपदरीकरण होत असताना जमिनी व मालमत्तांना नवीन कायद्याप्रमाणे बाजारभावाच्या दुप्पट व चौपट मोबदला देण्यात येणार आहे. घरे, मालमत्ता वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. चौपदरीकरणासाठी केंद्रशासनाकडून ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मंजूर १४ पूलांच्या कामांपैकी ५ पुलांच्या कामाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. युती सरकार आल्यावर वर्षाच्या आत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यात राजकारणाचा भाग नसून लोकांची गरज म्हणून हे काम केले जात आहे. या चौपदरीकरणात फक्त पंधरा ते वीस टक्के मालमत्ता जाणार आहे. सध्या महामार्गाचे जमिन मोजणीचे काम सुरू असून लोकांनी याला सहकार्य करावे, असे आवाहन राऊत यांनी केले. विकासाच्या दृष्टीने सर्वांनी या कामाला सहकार्य करावे. जानवली पादचारी पुलासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते. चौपदरीकरणाने ही समस्याच संपुष्टात येईल. चौपदरीकरणाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण व्हायला हवे, असे माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले. भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर म्हणाले की, मुंबईत ५५ उड्डाणपूल युती सरकारने पूर्ण केले आहेत. युती सरकार आश्वासने पूर्ण करते, हे यामुळे सिद्ध झाले. आमदार वैभव नाईक म्हणाले, भूसंपादनाशी संबंधित लोकांचे प्रश्न, शंका असतील तर त्यांचे निरसन केले जाईल. महामार्ग चौपदरीकरणालाही काळाची गरज होती व आज ती प्रत्यक्षात उतरत आहे, यासाठी युतीचे शासन सर्वस्वी जबाबदार आहे. अतुल काळसेकर म्हणाले, सिंधुदुर्गात विकासाची स्थिती निर्माण करण्यासाठी युती शासनाने जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली जातील. या महामार्ग चौपदरीकरणासाठी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी व खासदार विनायक राऊत यांनी केलेले प्रयत्न निश्चितच स्पृहणीय आहेत. या महामार्गाचे काम २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचा ध्यास आहे. शिवसैनिकांची मोटारसायकल रॅलीही यावेळी लक्षणीय ठरली. (प्रतिनिधी)