शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणांतर्गत पूलांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2015 00:35 IST

विनायक राऊत : महामार्गावर पाच ठिकाणी बॉक्सेलऐवजी उड्डाण पूल

कणकवली/सिंधुदुर्गनगरी : मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया आॅगस्टपूर्वी पूर्ण केली जाईल. येत्या डिसेंबरपूर्वी चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याचे नियोजन आहे. कणकवली, लांजा, पाली, चिपळूण या बाजारपेठांच्या ठिकाणी प्रस्तावित बॉक्सेल पुलाचे आराखडे बदलून येथे उड्डाणपूल बनविण्यासाठी आराखडे तयार करण्यात येत आहेत. खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. जानवली पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात राऊत बोलत होते. यावेळी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा भाग म्हणून या महामार्गावरील जानवली (कणकवली), कसाल नदी व पीठढवळ नदीवरील पुलांचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. यावेळी राऊत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, संजय पडते, महामार्ग प्राधिकरणाचे ए. डी. सूर्यवंशी, यतीन पटवर्धन, बळी परब, युवासेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा राजश्री धुमाळे, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख सचिन सावंत, नगरसेविका नंदिनी धुमाळे, सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, युवा सेना तालुकाप्रमुख राजू राठोड, शामल म्हाडगुत, उपतालुकाप्रमुख प्रथमेश सावंत आदी उपस्थित होते. राऊत पुढे म्हणाले की, चौपदरीकरण होत असताना जमिनी व मालमत्तांना नवीन कायद्याप्रमाणे बाजारभावाच्या दुप्पट व चौपट मोबदला देण्यात येणार आहे. घरे, मालमत्ता वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. चौपदरीकरणासाठी केंद्रशासनाकडून ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मंजूर १४ पूलांच्या कामांपैकी ५ पुलांच्या कामाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. युती सरकार आल्यावर वर्षाच्या आत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यात राजकारणाचा भाग नसून लोकांची गरज म्हणून हे काम केले जात आहे. या चौपदरीकरणात फक्त पंधरा ते वीस टक्के मालमत्ता जाणार आहे. सध्या महामार्गाचे जमिन मोजणीचे काम सुरू असून लोकांनी याला सहकार्य करावे, असे आवाहन राऊत यांनी केले. विकासाच्या दृष्टीने सर्वांनी या कामाला सहकार्य करावे. जानवली पादचारी पुलासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते. चौपदरीकरणाने ही समस्याच संपुष्टात येईल. चौपदरीकरणाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण व्हायला हवे, असे माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले. भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर म्हणाले की, मुंबईत ५५ उड्डाणपूल युती सरकारने पूर्ण केले आहेत. युती सरकार आश्वासने पूर्ण करते, हे यामुळे सिद्ध झाले. आमदार वैभव नाईक म्हणाले, भूसंपादनाशी संबंधित लोकांचे प्रश्न, शंका असतील तर त्यांचे निरसन केले जाईल. महामार्ग चौपदरीकरणालाही काळाची गरज होती व आज ती प्रत्यक्षात उतरत आहे, यासाठी युतीचे शासन सर्वस्वी जबाबदार आहे. अतुल काळसेकर म्हणाले, सिंधुदुर्गात विकासाची स्थिती निर्माण करण्यासाठी युती शासनाने जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली जातील. या महामार्ग चौपदरीकरणासाठी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी व खासदार विनायक राऊत यांनी केलेले प्रयत्न निश्चितच स्पृहणीय आहेत. या महामार्गाचे काम २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचा ध्यास आहे. शिवसैनिकांची मोटारसायकल रॅलीही यावेळी लक्षणीय ठरली. (प्रतिनिधी)