शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

२५ हजार हेक्टरवर भातपीक लावणी

By admin | Updated: July 14, 2014 23:34 IST

४0 टक्के काम पूर्ण : अरूण नातू यांनी दिली माहिती

सिंधुदुर्गनगरी : गेले आठ दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल २५ हजार हेक्टर क्षेत्रावर भातपीक लावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे भातलावणीचे ४० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ६० टक्के भात लावणीचे काम जुलैअखेर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यावर्षी ६० हजार हेक्टर क्षेत्रावर भात लावणी होईल अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विभागातील कृषीतंत्र अधिकारी-सांख्यिकी अरुण नातू यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६८ हजार हेक्टरी क्षेत्र भात लागवडीखाली येण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यात ५९९८ हेक्टर क्षेत्रात भात पेरणी करण्यात आली आहे. अजूनपर्यंत २५ हजार हेक्टर क्षेत्रावर भातपीक लावणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तर उर्वरित ३५ हजार हेक्टर क्षेत्र जुलैच्या महिनाअरेख पूर्ण होईल अशी अपेक्षाही कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. भात लावणीचे काम होऊन उर्वरित राहिलेल्या क्षेत्रात भात पेरणी (रहू) व नागली अशी पिके घेतली जाणार आहेत. आतापर्यंत ९९ हेक्टर क्षेत्रावर नागली पीक घेण्यात आले आहे. या व्यतिरिक्त नाचणी, भुईमूग, कुळीथ आदी पिके घेण्याचे शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे.यावर्षी जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतीच्या कामांना ब्रेक लागला होता. त्यानंतर ४ जुलैपासून पावसाने नॉनस्टॉप सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांनाही जोरदार सुरुवात केली आहे. ६० हजार हेक्टर क्षेत्रापैकी २५ हजार हेक्टर क्षेत्रात भातपीक लावणी पूर्ण झाली आहे तर उर्वरित लावणीही जुलैअखेर होणार आहे. ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर भातलावणी होईल असा अंदाज कृषी विभागाचा आहे. त्यातच भात लावणी करून ४ ते ५ हेक्टर जागा पड रहात असेल तर त्याठिकाणी रहू पेरणी करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)