शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

दर्जेदार रस्त्यांसाठी ‘स्काडा’ची सक्ती

By admin | Updated: January 1, 2017 23:06 IST

डांबरामधील भेसळ रोखणार : सिंधुदुर्ग बांधकाम विभाग तंत्रज्ञान वापरणार

अनंत जाधव ल्ल सावंतवाडीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम व रस्ते महामार्ग विभागाने भविष्यात रस्त्याची कामे दर्जेदार होण्यासाठी कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आता प्रत्येक डांबर प्लँटवर शासनाने ‘स्काडा’हे नवीन तंत्रज्ञान बसविण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे रस्ते बनविण्यासाठी वापरण्यात येणारे डांबराचे तापमान थेट इंटरनेटच्या माध्यमातून बांधकाम विभागाला कळणार आहे. त्याचबरोबर डांबरामध्ये होणारी भेसळही रोखण्यास मदत होईल. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात पाच ठिकाणी हे मशीन बसविण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. त्यामुळे रस्त्यात खड्डे पडणे, साईडपट्टी खचणे, पावसामुळे रस्ता वाहून जाणे असे प्रकार वरचेवर होत असतात. अनेक गावांमध्ये तर रस्ता केल्यानंतर एका वर्षातच तो खराब होतो. याच्या अनेक तक्रारी होतात, पण त्याची दखलही कोण घेत नाही. मात्र, अलीकडेच बांदा ते खारेपाटण या रस्त्याची झालेली दुर्दशा नागरिक रस्त्यावर उतरल्यानंतर जाणवल्याने बांधकाममंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली. गणेश चतुर्थीच्या काळात काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे भरण्यातही आले, पण ते फार काळ टिकले नाहीत.शासनस्तरावर सिंधुदुर्गमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्याची कामे दर्जेदार होण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातूनच बांधकाम विभागाने स्थानिक पातळीवर रस्ता कामाची निविदा काढताना जो निविदा घेईल, त्या ठेकेदारासाठी नियमावली तयार करून देण्यात आली आहे.बांधकाम विभागाने विकसित केलेले स्काडा हे नवीन तंत्रज्ञान ज्या डांबर प्लँटमध्ये असेल, तेथूनच डांबर घेणे ठेकेदारावर बंधनकारक राहणार आहे. एखादा डंपर डांबर भरून रस्त्याच्या कामावर जाणार असेल, तर तत्पूर्वी त्या डांबराचे तापमान स्काडा मशीनद्वारे तपासण्यात येणार आहे. तसेच त्या डांबरात भेसळ आहे का हेही तपासण्यात येणार आहे. त्या मशीनचा संदेश बांधकाम विभागाला प्राप्त झाला, तरच ते डांबर ग्राह्य मानले जाणार आहे,अन्यथा त्या ठेकेदाराला त्याचा भुर्दंड कामाच्या निघालेल्या बिलातून बसणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच डांबर प्लँटमध्ये हे तंत्रज्ञान बसविण्यात आले असून, त्याला बांधकाम विभागाशी जोडण्यात आले आहे. तसेच एखादा डंपर डांबर घेऊन रस्त्यावर जाण्यापूर्वी त्याचा संदेश बांधकाम विभागाबरोबरच कार्यकारी अभियंत्यांनाही प्राप्त होत असतो. या नवीन उपाययोजनेमुळे रस्त्याच्या कामात अतिवृष्टीच्या नावाखाली सुरू असलेला डांबराचा घोळ कमी होणार असून, डांबराचा दर्जाही योग्य राहणार आहे. तसेच रस्तेही दर्जेदार होणार आहेत. हे नवीन तंत्रज्ञान एक महिन्यापासून अमलात आणण्यात आले आहे. त्याचा वापर रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी सुरूही केला आहे.