शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

‘दारिद्र्यरेषेखालील योजना’ बंद होणार!

By admin | Updated: April 18, 2016 00:25 IST

७१ हजार कुटुंबांना फटका : आर्थिक दुर्बल घटकांना विशेष लाभ

सिंधुदुर्गनगरी : दारिद्र्यरेषेखालील देशभरात सध्या अस्तित्वात असलेली यादी या एप्रिल अखेरपर्यंत बंद होणार आहे. त्यानंतर अलीकडेच घेण्यात आलेल्या धर्म, जात व आर्थिक सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे सध्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मिळणाऱ्या विविध सुविधा, योजना रद्द होणार असून, नवीन यादीप्रमाणे या सर्व सुविधा आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात येणार आहेत. याचा फटका जिल्ह्यातील ७१ हजार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना बसणार आहे.या संदर्भातील व्हिडिओ कॉन्फरन्स १३ एप्रिलला प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी थेट केंद्र सरकारच्यावतीने झाली असून सध्या ज्या योजना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना देण्यात येत आहेत, त्या तूर्तास थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर नवीन सर्वेक्षणानुसार यादी जाहीर झाल्यावर या सर्व सुविधांसोबतच अजूनही काही नव्या योजना आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणार असून, त्यासाठीचे लाभार्थी या जाहीर होणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांच्या यादीतील निश्चित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुमारे ९ लाख एवढी लोकसंख्या आहे. एकूण दोन लाख कुटुंबे असून, यापैकी तब्बल ७१ हजार एवढी कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्यामुळे आता नव्या शासन निर्णयानुसार सिंधुदुर्गातील या ७१ हजार कुटुंबांना देण्यात येणारे दारिद्र्यरेषेखालील लाभ मिळणे बंद होणार आहेत. त्याचबरोबर आता या ७१ हजार कुटुंबांपैकी नव्याने जाहीर होणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांच्या यादीत किती कुटुंबसंख्या राहते की जिल्ह्यातील दुर्बल घटक कुटुंबांमध्ये अजून वाढ होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशात असलेली गरीब-श्रीमंत ही असमानता दूर करून देशातील सर्व घटकांना समान आर्थिक व सामाजिक पातळीवर आणण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे अशी संकल्पना समोर आली होती आणि गेली कित्येक वर्षे ही यादी अस्तित्वात होती. दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबांना या यादीच्या वर काढण्यासाठी शासन विविध योजनांचा लाभ या कुटुंबांना देत होते. यात रेशन धान्य दुकानावरील तांदूळ, गहू, साखर, तेल, रॉकेल याचबरोबर घरकुल योजना, बेघर घरकुल योजना, आदी विविध योजनांचा लाभ या सर्वांना मिळत होता. असे असूनही दरवर्षी दारिद्र्य-रेषेखालील याद्यांमधील कुटुंबांची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतच होती.दारिद्र्यरेषेखालील यादी रद्द करण्याचे आदेशशासनाकडून सन २०१२ पासून देशामध्ये धर्म, जात याचबरोबर आर्थिक स्थिती, असे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता केंद्र शासन एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हे सर्वेक्षण जाहीर करणार आहे आणि त्यानंतर तत्काळ दारिद्र्यरेषेखालील यादी रद्द करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना देणार आहे.