शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

‘दारिद्र्यरेषेखालील योजना’ बंद होणार!

By admin | Updated: April 18, 2016 00:25 IST

७१ हजार कुटुंबांना फटका : आर्थिक दुर्बल घटकांना विशेष लाभ

सिंधुदुर्गनगरी : दारिद्र्यरेषेखालील देशभरात सध्या अस्तित्वात असलेली यादी या एप्रिल अखेरपर्यंत बंद होणार आहे. त्यानंतर अलीकडेच घेण्यात आलेल्या धर्म, जात व आर्थिक सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे सध्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मिळणाऱ्या विविध सुविधा, योजना रद्द होणार असून, नवीन यादीप्रमाणे या सर्व सुविधा आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात येणार आहेत. याचा फटका जिल्ह्यातील ७१ हजार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना बसणार आहे.या संदर्भातील व्हिडिओ कॉन्फरन्स १३ एप्रिलला प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी थेट केंद्र सरकारच्यावतीने झाली असून सध्या ज्या योजना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना देण्यात येत आहेत, त्या तूर्तास थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर नवीन सर्वेक्षणानुसार यादी जाहीर झाल्यावर या सर्व सुविधांसोबतच अजूनही काही नव्या योजना आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणार असून, त्यासाठीचे लाभार्थी या जाहीर होणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांच्या यादीतील निश्चित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुमारे ९ लाख एवढी लोकसंख्या आहे. एकूण दोन लाख कुटुंबे असून, यापैकी तब्बल ७१ हजार एवढी कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्यामुळे आता नव्या शासन निर्णयानुसार सिंधुदुर्गातील या ७१ हजार कुटुंबांना देण्यात येणारे दारिद्र्यरेषेखालील लाभ मिळणे बंद होणार आहेत. त्याचबरोबर आता या ७१ हजार कुटुंबांपैकी नव्याने जाहीर होणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांच्या यादीत किती कुटुंबसंख्या राहते की जिल्ह्यातील दुर्बल घटक कुटुंबांमध्ये अजून वाढ होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशात असलेली गरीब-श्रीमंत ही असमानता दूर करून देशातील सर्व घटकांना समान आर्थिक व सामाजिक पातळीवर आणण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे अशी संकल्पना समोर आली होती आणि गेली कित्येक वर्षे ही यादी अस्तित्वात होती. दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबांना या यादीच्या वर काढण्यासाठी शासन विविध योजनांचा लाभ या कुटुंबांना देत होते. यात रेशन धान्य दुकानावरील तांदूळ, गहू, साखर, तेल, रॉकेल याचबरोबर घरकुल योजना, बेघर घरकुल योजना, आदी विविध योजनांचा लाभ या सर्वांना मिळत होता. असे असूनही दरवर्षी दारिद्र्य-रेषेखालील याद्यांमधील कुटुंबांची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतच होती.दारिद्र्यरेषेखालील यादी रद्द करण्याचे आदेशशासनाकडून सन २०१२ पासून देशामध्ये धर्म, जात याचबरोबर आर्थिक स्थिती, असे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता केंद्र शासन एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हे सर्वेक्षण जाहीर करणार आहे आणि त्यानंतर तत्काळ दारिद्र्यरेषेखालील यादी रद्द करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना देणार आहे.