शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

सर्वात जास्त उमेदवार असल्याने चुरशीची लढत

By admin | Updated: April 13, 2016 23:23 IST

कुडाळ नगरपंचायत निवडणूक : खुले आरक्षण, दिग्गज उमेदवार, लढतीकडे सर्वांचेच लक्ष--कुडाळ गावाकडून नगराकडे

रजनीकांत कदम -- कुडाळ नगरपंचायत निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये सांगिर्डेवाडी मध्ये सर्वात जास्त नऊ उमेदवार निवडणुकीत उतरले असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रणधुमाळी उडणार आहे. नेमक्या कोणत्या उमेदवाराची इथे सरशी ठरणार हे मात्र सध्या तरी कोणीच सांगू शकत नाहीत.कुडाळ नगरपंचायतीचा शेवटचा म्हणजे प्रभाग क्र. १७ सांगिर्डेवाडी आहे. या प्रभागामध्ये खुला संवर्ग असे आरक्षण पडले असून या प्रभागाची एकूण मतदार संख्या ८४१ आहे तर यामध्ये पुरुष ४०९ व महिला ४३२ एवढे मतदार आहेत. या प्रभागामध्ये विनायक राणे (काँग्रेस), अभय शिरसाट (शिवसेना), वैभव परब (भाजप), तर अपक्ष म्हणून विलास राणे, वैभव राणे, अमित राणे, अशोक केरकर, सिताराम नेमळेकर, नीलेश परब असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक विहिरींची योग्य प्रकारे निगा राखणे, गटार व्यवस्था, घनकचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तसेच अन्य मुलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. या प्रभागात निवडणुकीला उभे असणाऱ्या सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवारांना काही ठिकाणी नाराजीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. सर्वात जास्त उमेदवार असल्याने या ठिकाणी कोण विजयी होणार याची ओढ कुडाळवासियांना लागली असून याबाबत १८ एप्रिल रोजी पर्यंत कुडाळवासीयांना वाट बघावी लागणार आहे. आज मतदान प्रत्यक्षात तीन दिवसावर येऊन ठेपल्याने रंगत वाढली आहे.अभय शिरसाट-विनायक राणे आमने-सामनेया नगरपंचायतीच्या सर्व प्रभागांचा विचार करता या प्रभागात सर्वात जास्त नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मत विभागणी या नऊ उमेदवारांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.या ठिकाणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट हे शिवसेनेतून व या प्रभागाचे तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य व कुडाळचे उपसरपंच विनायक राणे हे काँग्रेसमधून लढत असून हे दिग्गज एकमेकांसमोर उभे ठाकले असून दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे.अपक्षांचा त्रास मोठ्या प्रमाणावरया प्रभागात मोठ्या प्रमाणात अपक्ष असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास येथील राजकीय पक्षांना पडणाऱ्या मताधिक्क्यावर होणार आहे. आपल्याकडील असलेली मते राखून ती मते दुसरीकडे जावू नयेत याकरिता प्रत्येकालाच मेहनत घ्यावी लागणार आहे.येथील राजकीय पक्षांच्या उमेदवारांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.