शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

सजग राहणे ही अधोरेखित केलेली बाब

By admin | Updated: March 23, 2015 00:39 IST

गोपाळ दुखंडे : वेगुर्ले येथील ‘विचार जागर कार्यक्रमात पानसरेंना आदरांजली

वेंगुर्ले : भारतीय घटनेने आपल्याला दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच कोणालाही कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाही. यादृष्टीने सजग राहणे ही वर्तमानकाळाने अधोरेखित केलेली तातडीची बाब आहे. या देशातील सुबुद्ध नागरिकांनी त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते गोपाळ दुखंंडे यांनी येथे व्यक्त केले. तालुक्यातील विविध संस्थांच्यावतीने कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘विचार जागर’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्र सेवा दलाच्या अध्यक्षा मंगल परूळेकर, किरात ट्रस्टचे अ‍ॅड. शशांक मराठे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अ‍ॅड. देवदत्त परूळेकर, राष्ट्रभाषा हिंदी प्रचार सभेचे वीरधवल परब, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दुखंडे म्हणाले, गोविंद पानसरे यांनी नेहमीच वंचितांच्या आणि कष्टकऱ्यांच्या बरोबर राहून त्यांना अपेक्षित न्याय मिळावा, यासाठी सनदशीर मार्गाने व्यापक लढा उभारला. असे लढे उभारताना भारतीय लोकशाही मूल्य व्यवस्थेची कोणत्याही परिस्थितीत जपणूक केली पाहिजे, हे त्यांनी वेळोवेळी आपल्या कृती आणि लेखनातून स्पष्ट केले. आज त्यांच्या स्मृती जागवताना प्रत्येक भारतीय नारिकाने आपल्या घटनादत्त अधिकार व कर्तव्यांबाबत दक्ष असणे जरूरीचे झाले आहे, असे वाटते. सध्याचा काळ त्यादृष्टीने अतिशय आव्हानात्मक आहे. हे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे. मात्र, यासंदर्भात बुद्धजीवी वर्गात असलेली सर्व पातळ्यांवरची उदासीनता आणि आत्मकेंद्रित वृत्ती ही चिंतेची बाब आहे.प्रबोधनाच्या वाटेने जाऊन चळवळीतील कार्यकर्त्यांनी ही मरगळ झटकून टाकल्यास कॉ. पानसरे यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिल्याचे समाधान मिळू शकेल, असे विचार मांडले. यावेळी कॉ. पानसरे यांच्या हत्येनंतर राज्यभरातील नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या निवडक पानसरे यांच्याविषयीच्या कवितांचे वाचन रघुवीर परब, अरुण नाईक, सुनील जाधव, प्रा. ए. डी. सुतार, प्रा. प्रकाश देसाई, मंगल परूळेकर यांनी केले. यामध्ये स्मशान शांततेची शिकवण, प्रिय कॉम्रेड तुम्ही चुकलाच!, तू माझ्या बापाच्या अंत्ययात्रेस होतास, आदी कवितांचा समावेश होता. त्यानंतर कॉ. पानसरे यांच्या विविध माध्यमामध्ये याआधी प्रक्षेपित झालेल्या मुलाखतीचे दृक्श्राव्य रूपांतरण सादर करण्यात आले. कार्यक्रमाला एम. पी. मेस्त्री, जयश्री सामंत, भरत आवळे, अ‍ॅड. संदीप निंबाळकर, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक देवदत्त परूळेकर, तर प्रा. सुनील भिसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुक्तांगण परिवाराने परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)