शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सजग राहणे ही अधोरेखित केलेली बाब

By admin | Updated: March 23, 2015 00:39 IST

गोपाळ दुखंडे : वेगुर्ले येथील ‘विचार जागर कार्यक्रमात पानसरेंना आदरांजली

वेंगुर्ले : भारतीय घटनेने आपल्याला दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच कोणालाही कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाही. यादृष्टीने सजग राहणे ही वर्तमानकाळाने अधोरेखित केलेली तातडीची बाब आहे. या देशातील सुबुद्ध नागरिकांनी त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते गोपाळ दुखंंडे यांनी येथे व्यक्त केले. तालुक्यातील विविध संस्थांच्यावतीने कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘विचार जागर’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्र सेवा दलाच्या अध्यक्षा मंगल परूळेकर, किरात ट्रस्टचे अ‍ॅड. शशांक मराठे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अ‍ॅड. देवदत्त परूळेकर, राष्ट्रभाषा हिंदी प्रचार सभेचे वीरधवल परब, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दुखंडे म्हणाले, गोविंद पानसरे यांनी नेहमीच वंचितांच्या आणि कष्टकऱ्यांच्या बरोबर राहून त्यांना अपेक्षित न्याय मिळावा, यासाठी सनदशीर मार्गाने व्यापक लढा उभारला. असे लढे उभारताना भारतीय लोकशाही मूल्य व्यवस्थेची कोणत्याही परिस्थितीत जपणूक केली पाहिजे, हे त्यांनी वेळोवेळी आपल्या कृती आणि लेखनातून स्पष्ट केले. आज त्यांच्या स्मृती जागवताना प्रत्येक भारतीय नारिकाने आपल्या घटनादत्त अधिकार व कर्तव्यांबाबत दक्ष असणे जरूरीचे झाले आहे, असे वाटते. सध्याचा काळ त्यादृष्टीने अतिशय आव्हानात्मक आहे. हे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे. मात्र, यासंदर्भात बुद्धजीवी वर्गात असलेली सर्व पातळ्यांवरची उदासीनता आणि आत्मकेंद्रित वृत्ती ही चिंतेची बाब आहे.प्रबोधनाच्या वाटेने जाऊन चळवळीतील कार्यकर्त्यांनी ही मरगळ झटकून टाकल्यास कॉ. पानसरे यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिल्याचे समाधान मिळू शकेल, असे विचार मांडले. यावेळी कॉ. पानसरे यांच्या हत्येनंतर राज्यभरातील नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या निवडक पानसरे यांच्याविषयीच्या कवितांचे वाचन रघुवीर परब, अरुण नाईक, सुनील जाधव, प्रा. ए. डी. सुतार, प्रा. प्रकाश देसाई, मंगल परूळेकर यांनी केले. यामध्ये स्मशान शांततेची शिकवण, प्रिय कॉम्रेड तुम्ही चुकलाच!, तू माझ्या बापाच्या अंत्ययात्रेस होतास, आदी कवितांचा समावेश होता. त्यानंतर कॉ. पानसरे यांच्या विविध माध्यमामध्ये याआधी प्रक्षेपित झालेल्या मुलाखतीचे दृक्श्राव्य रूपांतरण सादर करण्यात आले. कार्यक्रमाला एम. पी. मेस्त्री, जयश्री सामंत, भरत आवळे, अ‍ॅड. संदीप निंबाळकर, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक देवदत्त परूळेकर, तर प्रा. सुनील भिसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुक्तांगण परिवाराने परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)