शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बाबासाहेबांमुळेच एकात्मता अबाधित

By admin | Updated: November 28, 2015 00:11 IST

स्नेहलता चोरगे : वैभववाडीत संविधान दिन साजरा

वैभववाडी : डॉ. बाबासाहेबांनी संविधानद्वारे देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क, अधिकार मिळवून दिले असून, ते आजही अबाधित आहेत. त्यांनी समतेची शिकवण देऊन राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्याचे महान कार्य केले आहे. त्यामुळेच शंभर टक्के लोकशाही प्रणालीचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून भारताची जगात वेगळी ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे यांनी येथे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.बौद्ध सेवा संघ आणि तालुका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाच्या आवारात ‘संविधान दिन’ साजरा केला. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार जी. आर. गावित, सभापती वैशाली रावराणे, उपसभापती शोभा पांचाळ, पंचायत समिती सदस्या शुभांगी पवार, माजी बांधकाम सभापती जयेंद्र्र रावराणे, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, नगरसेवक रोहन रावराणे, संतोष माईणकर, अक्षता जैतापकर, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष यशवंत यादव, ग्रामीण शाखा अध्यक्ष शुभांगी यादव, प्रा. रमाकांत यादव, सरचिटणीस बाळकृष्ण जाधव, संजय कदम आदी उपस्थित होते.चोरगे म्हणाल्या, डॉ. आंबेडकर यांनी दलितांसह शोषितांना सुखकर जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. माणसाला आपल्या हक्क व अधिकाराची जाणीव करून देणारे संविधान आंबेडकर यांनी देशाला दिले. धर्म निरपेक्षता, समानता व राष्ट्रीय एकता याची शिकवण देणारे हे संविधान जगभर प्रसिद्ध झाले. त्यामुळे बाबासाहेबांची समता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण प्रत्येक भारतीयाने आचरणात आणणे आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावंतवाडी येथील सगुण जाधव यांनी गाडगे महाराजांच्या वेशभूषेत त्यांचे विचार उपस्थितांसमोर मांडले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रफुल्ल जाधव यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेमुळे लोकशाही आणि देशातील सहिष्णुता आजही टिकून आहे. त्याचप्रमाणे देशवासीयांना अनेक घटनात्मक अधिकार प्राप्त झाले आहेत. जयेंद्र रावराणेदेशाला एका चौकटीत बांधून ठेवण्याचे सामर्थ्य आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून केले. आजच्या महासत्तेचा पाया हा आंबेडकर यांनी रचला होता. -भालचंद्र साठे, काँग्रेस तालुकाध्यक्ष