शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

बाबासाहेबांमुळेच एकात्मता अबाधित

By admin | Updated: November 28, 2015 00:11 IST

स्नेहलता चोरगे : वैभववाडीत संविधान दिन साजरा

वैभववाडी : डॉ. बाबासाहेबांनी संविधानद्वारे देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क, अधिकार मिळवून दिले असून, ते आजही अबाधित आहेत. त्यांनी समतेची शिकवण देऊन राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्याचे महान कार्य केले आहे. त्यामुळेच शंभर टक्के लोकशाही प्रणालीचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून भारताची जगात वेगळी ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे यांनी येथे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.बौद्ध सेवा संघ आणि तालुका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाच्या आवारात ‘संविधान दिन’ साजरा केला. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार जी. आर. गावित, सभापती वैशाली रावराणे, उपसभापती शोभा पांचाळ, पंचायत समिती सदस्या शुभांगी पवार, माजी बांधकाम सभापती जयेंद्र्र रावराणे, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, नगरसेवक रोहन रावराणे, संतोष माईणकर, अक्षता जैतापकर, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष यशवंत यादव, ग्रामीण शाखा अध्यक्ष शुभांगी यादव, प्रा. रमाकांत यादव, सरचिटणीस बाळकृष्ण जाधव, संजय कदम आदी उपस्थित होते.चोरगे म्हणाल्या, डॉ. आंबेडकर यांनी दलितांसह शोषितांना सुखकर जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. माणसाला आपल्या हक्क व अधिकाराची जाणीव करून देणारे संविधान आंबेडकर यांनी देशाला दिले. धर्म निरपेक्षता, समानता व राष्ट्रीय एकता याची शिकवण देणारे हे संविधान जगभर प्रसिद्ध झाले. त्यामुळे बाबासाहेबांची समता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण प्रत्येक भारतीयाने आचरणात आणणे आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावंतवाडी येथील सगुण जाधव यांनी गाडगे महाराजांच्या वेशभूषेत त्यांचे विचार उपस्थितांसमोर मांडले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रफुल्ल जाधव यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेमुळे लोकशाही आणि देशातील सहिष्णुता आजही टिकून आहे. त्याचप्रमाणे देशवासीयांना अनेक घटनात्मक अधिकार प्राप्त झाले आहेत. जयेंद्र रावराणेदेशाला एका चौकटीत बांधून ठेवण्याचे सामर्थ्य आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून केले. आजच्या महासत्तेचा पाया हा आंबेडकर यांनी रचला होता. -भालचंद्र साठे, काँग्रेस तालुकाध्यक्ष