शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मातीच्या पिशव्यांचा आधार

By admin | Updated: August 3, 2014 22:47 IST

भविष्यात संकट : गोव्याच्या हद्दीवरील डाव्या कालव्याला भगदाड

वैभव साळकर-दोडामार्ग , तिलारी प्रकल्पाचे गोव्यात पाणी वाहून नेणारे महाराष्ट्र हद्दीतील कालवे निकृष्ट असल्याचा आरोप वारंवार गोवा राज्याकडून होत असताना हे कालवा निकृष्टीचे ग्रहण गोव्यातील कालव्यांना लागल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. महाराष्ट्र-गोवा हदद्दीवर असलेल्या मुख्य डाव्या कालव्याला भेगा गेल्या असून त्याला चक्क पिशव्यांमध्ये माती भरून आधार देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात कालवा फुटीचे संकट निर्माण झाले आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी धरणाचे पाणी गोव्यात नेण्यासाठी प्रकल्पस्थळापासून उजवा आणि डावा असे दोन कालवे खोदण्यात आले आहेत. त्यापैकी मुख्य धरणाचे पाणी डाव्या कालव्याबाहेर तर उन्नेयी बंधाऱ्याचे पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडले जाते. डावा कालवा महाराष्ट्र-गोवा हद्दीवर बिचोली तालुक्यात प्रवेश करतो. या कालव्याचे काम निकृष्ट पद्धतीने झाल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. महाराष्ट्र हद्दीत अनेक ठिकाणी कालवा फुटण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हद्दीतील कालव्यांच्या कामाबाबत गोवा राज्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. गोव्याचे जलसंपदामंत्री दयानंद मांद्रेकर यांनीही गतवर्षी कालव्यांची पाहणी केली होती. त्यामुळे तिलारीचे कालवे एक चर्चेचा विषय बनला होता. मात्र, आता असाच प्रकार गोवा हद्दीतही पहावयास मिळतो आहे.कालव्याच्या वरच्याबाजूने डोंगर असून या डोंगराचे पाणी पावसाळ्यात खाली वाहून येते. त्याचा निचरा होण्यासाठी कालव्याखालून मोरी बांधणे आवश्यक होते. परंतु तसे न करता त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. हे पाणी सातत्याने त्या ठिकाणी आतमध्ये झिरपू लागल्यानेच कालव्याला भेगा पडल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.