शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

मीराबागेत मूलभूत सुविधांची वानवा

By admin | Updated: February 19, 2015 23:48 IST

कचरा कोंडाळे तुडुंब : कॉलनीत ड्रेनेज नसल्याने पाणी थेट रस्त्यावरच

कोल्हापूर : कॉलनीत अनेक वर्षे गटारी नाहीत, रस्ते कुठे चांगले तर कुठे एकदमच खराब, अशी मूलभूत सुविधांची वानवा मीराबाग प्रभागात पाहावयास मिळते. भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेल्या जाऊळाचा गणपतीपासून सुरू होणारा प्रभाग हा लक्षतीर्थ वसाहतीत थांबतो. जिव्हाळा कॉलनी, सुतारमळा, विश्वभारती कॉलनी, उत्तरेश्वर पेठमधील काही भाग, धुण्याची चावी, लक्षतीर्थ वसाहतीमधील तीन गल्ल्या असा विस्तारलेला हा प्रभाग आहे. आजूबाजूला काळवट जमीन, उसाचे क्षेत्र असल्याने हा भाग ग्रामीण तोंडवळा असलेला दिसतो. सामान्य माणसांची वस्ती असलेल्या या प्रभागात गटारी व सांडपाण्याची समस्या नागरिकांची डोकेदुखी आहे. पाणी मुबलक आहे; पण कचऱ्याचा उठाव होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. विश्वभारती कॉलनीमध्ये यावर्षी काही रस्ते केले आहेत. येथे पाणी नियमित व मुबलक आहे; पण काही ठिकाणी गटारी नाहीत. त्यामुळे उघड्यावरच पाण्याचा लोट जाताना दिसतो. उत्तरेश्वर पेठेत दहा वर्षे झाली, विजेचा खांब पडून आहे. कचऱ्याचा उठाव होत नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास होतो. आमदार निधीतून काही रस्ते केले आहेत; पण गटारी नसल्याने हे रस्तेही फार काळ टिकतील असे वाटत नसल्याचे नागरिकांचे मत आहे. या प्रभागात महापालिकेचा एकही दवाखाना नाही, व्यायामशाळा नसल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी आहेत. ड्रेनेज नसल्याने पाणी उघड्यावरच सोडले जाते. परिणामी परिसरात अस्वच्छताही दिसते. औषध फवारणी आठ-पंधरा दिवसांनी केली जाते. सुतारमळा येथे कचरा कुंडी ओसंडून वाहताना दिसली. कचरा खाण्यासाठी भटकी कुत्री फिरत असल्याने नागरिक जीव मुठीत व नाक हातात धरून जाताना दिसले. सुतारमळा येथील एका गल्लीत डांबरीकरण करून रस्ता चकाचक केला आहे; पण त्याशेजारी सुमारे सात-आठ फूट खोल उघड्या गटारी आहेत. अनोळखी भागातील दुचाकीस्वार या परिसरात आला तर थेट या उघड्या गटारीमध्ये जाण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या गटारीमध्ये किमान दोन फूट पाणी व घाण असल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. या घाणीमुळे डासांचे प्रमाण जास्त असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. चार वर्षांत सतेज पाटील व महापालिकेच्या माध्यमातून सहा कोटींची कामे केली. यामध्ये रस्ते, पाईपलाईनचे काम प्राधान्याने केले. काही ठिकाणी गटर्स प्रलंबित आहेत, त्याचबरोबर लक्ष्यतीर्थ-टेंबलाई मंदिर रस्त्याचे काम आगामी काळात पूर्ण करणार आहे. संपर्काबाबत नागरिकांच्या अपेक्षा असणार; पण मी सातत्याने कामांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. सर्व समस्या पाच वर्षांत पूर्ण होणार नाहीत, तरीही उर्वरित काळात प्रभाग समस्यामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहू.- मीना सूर्यवंशी (नगरसेविका, मीराबाग)