शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

जिल्ह्यात ३ लाख विद्यार्थ्यांना आधार

By admin | Updated: April 30, 2015 00:31 IST

जिल्हा परिषद : शिक्षण विभाग लागला कामाला

रत्नागिरी : प्रत्येक शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या बालकांचे आधारकार्ड काढण्याची मोहीम रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळांमधील २ लाख ९८ हजार ९९० विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यात येणार आहे.बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ च्या यशस्वी अंमलबजावणीने शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहामध्ये समाविष्ट करुन घेणे, ही महत्त्वाची समस्या होती. आतापर्यंत या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांचे कायमस्वरुपी आधारकार्ड काढून उपाययोजना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राज्यातील शाळांमध्ये प्रवेश घेतलेले प्रत्येक बालकाचे आधारकार्ड व ते प्रवेश क्रमांकाशी जोडण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. आधारकार्ड मोहिमेस प्रारंभ झाला असून २६ जूनपर्यंत प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढले जाणार आहे.प्रत्येक बालकाच्या प्रवेशनोंदणी पंचीकेतील क्रमांक आधारकार्डशी जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता एकही बालक शालाबाह्य होणार नाही. २६ जूनपर्यंत १०० टक्के विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याचे काम पूर्ण करावे, असे निर्देश आल्याने तशा सूचना प्रत्येक गटशिक्षणाधिकाऱ्यांना त्या त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)