शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

कोकण सिंचनाचा अनुशेष ‘जैसे थे’

By admin | Updated: October 30, 2014 00:50 IST

निधीच नाही : कालव्यांची कामेही अर्धवट स्थितीत

श्रीकांत चाळके-खेडकोकणातील सिंचनाचा अनुशेष अद्याप भरला गेला नाही. आघाडी सरकारच्या काळात याविषयी कमालीचे मौन पाळण्यात आले. सिंचनाचा अनुशेष रखडल्याने कोकणात अजूनही पाणीटंचाई जाणवत आहेत. निधी उपलब्ध नसल्याने कालवेही अर्धवट स्थितीत आहेत. अनेक सिंचन प्रकल्पांची पुरती वाट लागल्याने पाणी प्रश्नाची बोंबाबोंब सुरू आहे.चार महिन्यांपूर्वी सिंचनाविषयी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते़ हा अनुशेष वेळीच भरला असता तर कोकणात वारंवार भासणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासली नसती. ही परिस्थिती अशीच राहिली तर यावर्षीही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कालव्यांची कामे अद्याप झाली नाहीत. त्यामुळे असंख्य हेक्टर जमीन ओलिताखाली आली नाही़ तसेच उर्वरित लघुपाटबंधारेच्या कामांना अद्याप निधी उपलध करून न दिल्याने हे प्रकल्प मार्गी लागण्याऐवजी त्यांची कामेच खोळंबून राहिली आहेत़ सिंचनाच्या अनुशेषाचा प्रश्न घोटाळ्याच्या लालफितीत अडकल्याचे बोलले जात आहे. राजकारण्यांच्या अडेलतट्टूपणामुळे कोकणातील पिण्याचे पाणी साठवणुकीला खो घातल्याने कोकणच्या वाट्याला दुर्दशा आली आहे़ आघाडी सरकारने कोकणातील जलसिंचनाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, यामुळेच पाणीटंचाईला आमंत्रण मिळाल्याची टीका होत आहे़पाण्याच्या टंचाईबरोबरच दुबार पिके, फलोद्यान किंवा दुग्धोत्पादन आदी शेतीला पूरक अशी सुबकता आली असती आणि हरितक्रांती घडली असती. ही बाब माजी विरोधी पक्षनेते आणि विधानपरिषदेचे आमदार रामदास कदम यांनी प्रत्येक अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाच्या निदर्शनास आणूनदेखील सत्ताधाऱ्यांच्या काळजाला पाझर फुटला नाही. या कामाला टप्याटप्याने निधी मिळत असल्याने उर्वरित निधीसाठी आणखी किती काळ थांबावे ? हाच खरा प्रश्न आहे. कोंडिवली तसेच शेल्डी, तळवटखेड, डुबी या चार लघुपाटबंधारेच्या कालव्यांची कामे अद्याप न झाल्याने असंख्य हेक्टर जमीन ओलिताखाली आलेली नाही. उर्वरित लघुपाटबंंधारेच्या कामांना अद्याप निधी उपलब्ध करून न दिल्याने हे प्रकल्प खोळंबून राहिले आहेत. त्यामुळे सिंचनाचा अनुशेष गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे दिसून येते. आघाडी सरकारने कोकणातील अशा महत्त्वाच्या धरण प्रकल्पांवर सूड उगवल्याचे बोलले जात आहे. धरणाच्या कामाचे प्रस्ताव मंत्रालयात धूळखात पडले होते. मात्र, जलसंपदा खात्याचे तत्कालीनमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांनीच या प्रकल्पांच्या विकसित करण्याच्या कामाला खो घातल्याचा आरोप होत आहे.