शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘नरकासूर’ स्पर्धेचे आकर्षण

By admin | Updated: October 17, 2014 22:51 IST

प्रतिमा बनविण्याच्या कामांना वेग : विविध स्पर्धांमुळे युवावर्गात उत्साह

प्रसन्न राणे - सावंतवाडी--सर्वसामान्य जनतेला त्रास देणाऱ्या नरकासूर या राक्षसाचा वध श्रीकृष्णाने केला होता. हा दिवस नरकचतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ग्रामीण भागासह शहरातही नरकासूराच्या लहान-मोठ्या प्रतिमांचे दहन केले जाते. नरकचतुर्दशी काही दिवसांवरच येऊन ठेपल्याने नरकासूर बनविण्याच्या कामाला आता वेग आला असून युवा वर्गामध्ये उत्साह दिसून येत आहे. नरकासुराचा श्रीकृष्णाने वध केल्याने दीपावलीच्या पहाटे नरकासुराचे दहन केले जाते. ही परंपरा आजही कायम असून हा दिवस नरकचतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. पूर्वी सावंतवाडी शहरात हातावरच्या बोटावर मोजण्याइतक्याच नरकासुराच्या प्रतिमा तयार केल्या जात असत. मात्र, आता सावंतवाडीत अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या नरकासुराच्या प्रतिमा युवक करत असतात. त्यासाठी मंडळांकडून आर्थिक मदतही केली जाते. मंडळ नसल्यास युवक परिसरातील घराघरातून काही वर्गणी गोळा करुन नरकासूर तयार करण्याचा खर्च भागवितात. नरकासूर तयार करणे म्हणजे एक कलाच आहे. या कलेला वाव देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध भागात ‘नरकासूर स्पर्धा’ आयोजित केल्या जातात. सावंतवाडी तालुक्यातही अशा स्पर्धेचे आयोजन केले जाते. सावंतवाडी शहरासह तालुक्यातील अनेक युवा मंडळे आकर्षक आणि भव्य नरकासूर तयार करून या स्पर्धेत सहभागी होतात. या स्पर्धेतील एकापेक्षा एक सरस कलाकृतींमुळे क्रमांक निवडतानाही परीक्षकांची चांगलीच कसरत होते. या अनुषंगाने सावंतवाडीतील अनेक मंडळे यावर्षीही स्पर्धेत उतरण्यास सज्ज झाली आहेत. शहरात विविध ठिकाणी नरकासूर तयार करण्यात युवा मंडळी मग्न झाली आहे. नरकासूर तयार करण्यात तरुण वर्गाचा मोठा प्रतिसाद असतो. रात्रंदिवस मेहनत करून नरकासूर तयार के ला जातो. बांंबू आणि लाकडाच्या सहाय्याने सांगाडा तयार करून नंतर त्यात गवत आणि फटाके भरून नरकासूर तयार केला जातो. मात्र, अलीकडच्या काळात लोखंडी वेल्डिंगच्या सहाय्याने एकच कायमस्वरुपी सांगाडा बनवण्याचीही नवीन पद्धत रूळत चालली आहे. शहरातील मंडळे लागली कामालाग्रामीण भागात मात्र आजही बांबू आणि लाकडी वस्तू, कणके यांच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने नरकासूर तयार केले जातात. या कामाला आता वेग आला आहे. यासाठी वर्गणी, फंड याद्वारे आर्थिक बाजू सांभाळली जाते. सावंतवाडीमधील अनेक नरकासूर मंडळांपैकी वटसावित्री मंडळ, माठेवाडा मित्रमंडळ, चितारआळी मित्रमंडळ, गोठण मित्रमंडळ, भटवाडी मित्रमंडळ, सालईवाडा मित्रमंडळ, सबनीसवाडा मित्रमंडळ, वैश्यवाडा मित्रमंडळ ही मंडळे स्पर्धांमध्ये नेहमीच आघाडीवर असतात. याव्यतिरिक्तही बाळगोपाळही आपल्या मजेकरिता जमतील तशा नरकासुरांच्या प्रतिमा तयार करुन याचा आनंद लुटताना दिसत आहेत.