शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

चिपळुणात वीज ग्राहकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: November 6, 2015 23:40 IST

‘महावितरण’च्या कार्यालयातील प्रकार : वीज बिल कमी करण्याची मागणी

चिपळूण : तालुक्यातील कात्रोळी कुंभारवाडी येथील कृष्णा दिनू निवळकर (वय ५५) यांनी थकीत वीज बिल माफ करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. विष प्राशन केल्यानंतर निवळकर यांना प्रथम कामथे उपजिल्हा रुग्णालयात व नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.‘महावितरण’च्या चिपळूण येथील कार्यालयात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता कात्रोळी कुंभारवाडी येथील कृष्णा निवळकर हे वीज ग्राहक कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांच्या कार्यालयात आपल्या थकीत बिलाची रक्कम कमी करण्यासाठी आले होते. निवळकर यांच्याकडे सप्टेंबर २००८ ते मे २००९ दरम्यान, ३७,१५७ रुपयांची वीज बिलाची थकबाकी होती. त्यांनी घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी जोडणी घेतली होती. थकबाकी न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा दि. १३ एप्रिल २०१० मध्ये खंडित केला होता. त्यानंतर त्यांनी विविध राजकीय नेत्यांकडे धाव घेतली. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या घरी दुसरे मीटर बसवून वीज वापराची तपासणी केली असता वीज मीटर योग्य असल्याचे निदर्शनास आले होते. निवळकर हे घरघंटीसाठी थ्री फेजचा वापर करीत होते. बिलात सवलत मिळत नसल्याने शेवटी २०१० मध्ये त्यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. ग्राहक न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून ‘महावितरण’ची कारवाई योग्य असल्याचा निर्णय दिला. शिवाय थकबाकी जमा केल्याखेरीज वीजपुरवठा सुरू करू नये, असा निर्णय १७ जानेवारी २०१२ रोजी दिला. या निर्णयानंतरही निवळकर यांनी कार्यकारी अभियंता आवळेकर यांची भेट घेतली व बिलात सवलत देण्याची मागणी केली होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी पुन्हा त्यांनी कार्यकारी अभियंता आवळेकर यांची भेट घेऊन बिलात सवलतीची मागणी केली. त्यावेळी बिल कमी करता येत नाही. थकीत बिलावरील व्याज कमी करण्याचा प्रयत्न करू. मात्र, मुद्दल भरलीच पाहिजे. शिवाय अधूनमधून वीज बिल कमी करण्याबाबत शासनाच्या ज्या योजना येतील, त्याचाही लाभ तुम्हाला दिला जाईल, असे आवळेकर यांनी सांगितले. त्यानंतर अचानक त्यांच्यासमोर निवळकर यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारांसाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. कार्यकारी अभियंता आवळेकर यांनी ‘बिल माफ करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. त्यांचा वीज मीटर सुस्थितीत होता. त्यांनी विजेचा वापर केला होता. टप्प्याटप्प्याने त्यांनी बिलाची रक्कम भरली असती तर आतापर्यंत मुद्दल जमा झाली असती. पुढील काळात शासकीय योजनेतून व्याज माफीही मिळाली असती. या सर्व गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या होत्या. त्यांच्या सर्व तक्रारींची वेळोवेळी दखल घेतली होती. २००८ मध्ये ८२० रुपये व मे २००९ मध्ये तीन हजार रुपये बिल त्यांनी भरले होते. त्यानंतर कोणतीही रक्कम भरली नाही. ते असे कृत्य करतील, असे अजिबात वाटले नव्हते,’ असे कार्यकारी अभियंता आवळेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)