शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अटकसत्र सुरूच; खेडमधून आणखी एक ताब्यात

By admin | Updated: April 27, 2015 00:16 IST

रघुवीर घाटातील हत्याकांड : नातेवाइकांनी मृतांना ओळखले

खेड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मालदेव सेडाशी येथील सावंत कुटुंबीयाच्या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी नातेवाइकांनी तिघाही मृतांना ओळखले असून, सडलेल्या मृतदेहांचे नमुने तपासणीकरिता फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार आहेत.लीलाबाई बापू सावंत (वय ४२), मनीषा बापू सावंत (१७), पूनम बापू सावंत (१२) यांचा खून करून त्यांचे मृतदेह रघुवीर घाटातील माकडकडी भागात टाकून दिल्याप्रकरणी अशोक धोंडिराम ढवळे (रा. शिरगाव पिंपळवाडी, ता़ खेड) आणि अविनाश शिंदे (रा. शिंदी, ता. महाबळेश्वर, जि़ सातारा) यांना पेण पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. खेड तालुक्यातील आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयिताचे नाव जाहीर केलेले नाही. दरम्यान, या हत्याकांडप्रकरणी नातेवाइकांनी तिन्ही मृतदेह ओळखले असून, याप्रकरणी आरोपींची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सडलेल्या मृतदेहांचे नमुनेदेखील तपासणीकरिता फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहेत.मायलेकींचे सडलेले मृतदेह पेण पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्या मृतदेहांचे विच्छेदन तिसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात केल्यावर ते मृतदेह खेड नगरपरिषदेच्या शवागृहात ठेवण्यात आले आहेत. या हत्याकांडाची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक खेडमध्ये दाखल झाले आहेत. या तिघीही बेपत्ता झाल्याची तक्रार दीपाली प्रशांत शिंदे (२३, रा. दिवा) यांनी पेण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर तपास करताना हे हत्याकांड उघड झाले. आरोपींनी तिघींना रघुवीर घाटात अज्ञातस्थळी ठेवून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)सावंत यांचा मोबाईल आरोपीकडेमृत लीलाबाई सावंत हिचा मोबाईल आरोपीकडे सापडल्यामुळेच आरोपीचा शोध लागल्याचा दावा पेण पोलिसांनी केला़ हत्याकांडप्रकरणी आणखी कोणाचा समावेश आहे, याबाबतचा तपास पेण पोलीस करीत असतानाच पोलिसांनी खेड तालुक्यातून आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.