शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रांचे नियोजन काटेकोरपणे करावे

By admin | Updated: January 18, 2015 00:36 IST

दीपक केसरकर : यात्रा पूर्वतयारीच्या बैठकीत आदेश

सिंधुदुर्गनगरी : भाविकांच्या गर्दीचा विचार करून रस्ते, पाणी, वाहतूक व्यवस्था, आरोग्य यंत्रणा यादृष्टीने ट्रस्ट, व्यवस्थापकीय मंडळ यांनी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रांचे नियोजन व अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे आदेश पालकमंत्री व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.जिल्हा नियोजन समिती सभागृहात आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, आमदार वैभव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत आरोसकर, कुणकेश्वर ट्रस्टचे विश्वास भुजबळ, पुंडलिक नाणेरकर, एकनाथ चव्हाण, कुणकेश्वरचे सरपंच चंद्रकांत घाडी, डांगमोडेच्या सरपंच गायत्री ठाकूर, मालवणच्या सभापती सीमा परुळेकर, आंगणेवाडी ट्रस्टचे मंगेश आंगणे, नरेश आंगणे यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते.पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रलंबित असणारी रस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण करून कुणकेश्वर व आंगणेवाडी रस्ते दुरुस्तीचे काम गुणवत्तापूर्ण करा. यात्रास्थळी गर्दी वाढणार आहे असा अंदाज असल्यास पार्किंग वाढवावे. पार्किंगच्या ठिकाणी धुळीचा त्रास होत असल्यास त्यावरील योग्य त्या उपाययोजना करा व पार्किंगची व्यवस्था चोख ठेवण्यात यावी. आरोग्य विभागाने यात्रास्थळी असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्त्रोत तपासून घ्यावेत. दीपक केसरकर म्हणाले, जिल्हा आरोग्य विभागाने वैद्यकीय व्यवस्थेसाठी किमान २ हजार चौरसफूट जागा मंदिर परिसरात उपलब्ध करून देऊन ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे तेथे पेन्डॉल उभे करावेत. कुणकेश्वर येथे महाद्वार कमानीपासून वर जाणाऱ्या मार्गावरील ठिकठिकाणी तुटलेल्या पायऱ्या दुरुस्त करून घ्याव्यात आणि परतीच्या मार्गावरील सर्व उतार काढून त्याठिकाणी एकसारख्या उंचीच्या पायऱ्या किमान महाद्वारापर्यंत तयार करून घ्याव्यात यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्यांच्यामार्फत ही दुरुस्ती करून घ्यावी. त्यासाठी आवश्यक ती रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागास द्यावी व हे काम यात्रेपूर्वी होणे जरुरीचे आहे. दीपक केसरकर पुढे म्हणाले, परिवहन विभागाने यात्रा काळात कोणत्याही प्रकारे अवैध वाहतूक होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी. यात्रा काळात भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन येणाऱ्या वाहनांचा प्रवाह मर्यादित व नियंत्रित ठेवण्यासाठी जिल्हा सरहद्दीवर आणि घाटांच्या पायथ्यांशी तपासणी नाके उभारावेत. प्रस्तावित कारवाई व नियोजनाबाबत पुरेशी प्रसिद्धी द्यावी. यात्रास्थळी देवस्थानांना लागणारी वीज, विजेच्या जादा जोडण्या व विजेसंबंधी सर्व कार्यवाही यात्रा काळापुरती महाराष्ट्र विद्युत मंडळानेच स्वत:च्या अधिकारात व जबाबदारीवर करावी. तसेच बीएसएनएलने यात्रा कालावधीत यंत्रणा सुरळीत ठेवावी, असे आदेशही दीपक केसरकर यांनी दिले. (प्रतिनिधी)