शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘पर्ससीन’साठी सेना आमदार सरसावले

By admin | Updated: February 17, 2016 01:21 IST

शिष्टमंडळ खडसेंना भेटणार : विनायक राऊत यांच्याकडे नेतृत्व, हंगामभर मासेमारीला मुभा द्यावी

रत्नागिरी : पर्ससीन मच्छिमारांनी दिलेल्या सागरी हद्दीत पर्ससीनने मच्छिमारी करावी ही बाब रास्त असली तरी त्यांना सप्टेंबर ते डिसेंबर अशी मर्यादा घालण्याऐवजी १५ मेपर्यंत मच्छिमारीस परवानगी मिळावी, या मागणीसाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील सेना आमदारांचे शिष्टमंडळ लवकरच मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्री एकनाथ खडसे यांना भेटणार आहे.पारंपरिक मच्छिमारांच्या क्षेत्रात पर्ससीन या आधुनिक मच्छिमारी जाळ्यांमार्फत मच्छिमारी केली जात असल्याने पारंपरिक मच्छिमार संकटात सापडले होते. त्यामुळेच १२ वाव (फॅदम)च्या आत पर्ससीनला मच्छिमारीस परवानगी देऊ नये, अशी मच्छिमारांची मागणी होती. त्याबाबत राज्य शासनाने गेल्याच आठवड्यात पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने निर्णय दिला होता. हा निर्णय देताना पर्ससीनला पूर्ण हंगामात मच्छिमारीऐवजी केवळ सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांतच सागरात किनाऱ्यापासून १२ वाव (फॅदम) अंतराच्या बाहेर मच्छिमारीस परवानगी दिली. जानेवारी ते मे महिन्यापर्यंत पर्ससीन मच्छिमारीला घालण्यात आलेल्या बंदीविरोधात गेल्या काही दिवसांत पर्ससीन मच्छिमारांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. शिवसेनेचा पर्ससीन मच्छिमारीला विरोध असल्याचे पत्र शासनाला दिल्याचे वातावरणही सोशल मीडियावर निर्माण केले जात असून ते पत्र कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठीचे आहे. मात्र त्यावरून सेनेचा पर्ससीनला विरोध आहे, असा चुकीचा प्रचार केला जात आहे. त्यांच्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यावर पर्ससीन मच्छिमारांनी विश्वास ठेवू नये, असे आमदार उदय सामंत यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.शिवसेनेचा व सेनेच्या कोणत्याही आमदार व खासदारांचा पर्ससीन मच्छिमारीला विरोध नाही. शासनाने ठरवून दिलेल्या सागरी क्षेत्रातच मच्छिमारी करावी, हे पर्ससीन मच्छिमारांनाही मान्य आहे. मात्र त्यांना १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीतच मच्छिमारी करण्याची परवानगी देणे व उर्वरित साडेचार महिन्यांसाठी पर्ससीन मच्छिमारीला बंदी घालणे हे अन्यायकारक आहे. त्याबाबत योग्य निर्णय होऊन पर्ससीनला १ सप्टेंबर ते १५ मे पर्यंत त्यांच्या मागणीनुसार मच्छिमारीला परवानगी मिळावी, असे निवेदन खासदार विनायक राऊत, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार लवकरच मंत्री खडसे यांना देणार असल्याचेही सामंत म्हणाले. (प्रतिनिधी)