शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

सेना कॉर्नरवर, राष्ट्रवादी दारात, भाजप घरात...!

By admin | Updated: October 14, 2015 00:03 IST

रत्नागिरी पालिका : आरोप-प्रत्यारोपांचा गुलाल उधळत प्रचार सुरु

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या चार जागांची पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली असून, प्रचाराला गती आली आहे. गेल्या चार दिवसांपासून शिवसेनेने प्रभाग २ व ४मध्ये कॉर्नर सभांवर भर दिला असून, त्यात राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश शेट्ये यांना ‘कॉर्नर’ केले जात आहे. दुसरीकडे शिवसेनेला मोठे आव्हान दिलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार उमेश शेट्ये व अन्य सहकारी उमेदवारांनी दारोदार जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत प्रचार करण्यावर भर दिला आहे, तर भाजप मात्र घरात जाऊन गुप्तपणे प्रचार करीत आहे. एकूणच आरोप प्रत्यारोपांचा गुलाल उधळत प्रचार सुरू आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादीत परतलेल्या उमेश शेट्ये यांनी पोटनिवडणुकीत शिवसेनेपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी यांनी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनवल्याने दोन्ही पक्षांचे नेते पोटनिवडणूक होत असलेल्या दोन्ही प्रभागात आतापासूनच ठाण मांडून आहेत. कोण कुठे जातोय, कोणाचे लागेबांधे आहेत, शब्द देऊन कोण फसवत आहे, याकडेही आतापासूनच लक्ष दिले जात असून, संबंधितांना दोन्ही बाजूने कानपिचक्या देण्यात आल्याचाही बोलबाला आहे. अनेक उमेदवार नवखे आहेत. त्यामुळे प्रचाराच्या वेळी सर्वच पक्षांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतली असून, कॉर्नरसभांना मतदार, कार्यकर्ते व नेतेही हजेरी लावत आहेत. मात्र, प्रचारातील ही आघाडी १ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने मतांमध्ये प्रतिबिंबित किती होणार, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. उमेश शेट्ये सेनेतून बाहेर पडल्याने व आमने - सामने उभे ठाकल्याने त्यांच्याबाबत शिवसेनेत खुन्नस आहे. मात्र, उमेश शेट्ये यांच्या चक्री राजकारणाला शिवसेना किती पुरून उरणार त्यावरच या पोटनिवडणुकीतील सेनेचे यश अवलंबून राहणार आहे. सेनेच्या प्रचारात बंड्या साळवी, प्रमोद शेरे, मिलिंद कीर यांसारखे अनेक नेते कार्यरत आहेत. कीर व उमेश शेट्ये यांच्यात पत्रकारपरिषदांमधून जोरदार चकमक याआधीच झडली आहे. परंतु त्या आरोप - प्रत्यारोपांचा कोणाला किती फायदा होणार, हेसुध्दा मतदार राजाच ठरवणार आहे. मिलिंद कीर यांच्या आरोपानुसार उमेश शेट्ये हे नगरपरिषदेला लागलेली वाळवी आहे की, शेट्ये यांच्या आरोपानुसार मिलिंद कीर हे सूर्याजी पिसाळांची अवलाद आहे, याचा फैसला आता मतदारांच्या हाती आहे. शिवसेनेच्या कॉर्नर बैठका सुरू असल्या तरी राष्ट्रवादीने मात्र दारात जाऊन प्रचारावर भर दिला आहे. यानिमित्ताने मतदारांना भेटून उमेदवार व कार्यकर्ते राष्ट्रवादीने शहरात केलेल्या विकासकामांची माहिती देत आहेत व विजयासाठी आशीर्वाद मागत आहेत. पालिकेतील विद्यमान कारभाऱ्यांनी विकासासाठी काहीच केले नसून या दोन्ही प्रभागातील विकासासाठीच राष्ट्रवादीला निवडून देण्याचे आवाहन केले जात आहे. बुधवारपासून राष्ट्रवादीचे पदाधिकारी मतदारांच्या घरी जाऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी मते मागणार आहेत. अनेक कारणांवरून उमेश शेट्ये, कौसल्या शेट्ये हे उमेदवार अपात्र ठरणार असून, पुन्हा पोटनिवडणूक होऊ नये म्हणून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन सेनेचे नेते करीत आहेत. यातील कोणाचा राजकीय युक्तिवाद लोकांच्या पचनी पडणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. सेनेचा प्रचार कॉर्नरवर, राष्ट्रवादी दारात जात असताना भाजपचे उमेदवार व कार्यकर्ते मात्र घरात जाऊन प्रचार करीत आहेत. त्यात नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, भाजपचे पदाधिकारीही सहभागी होत आहेत. मनसेच्या प्रचारास मात्र अजून वेग आलेला नाही. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच पक्षांचे वरिष्ठ नेते रत्नागिरीत दाखल होणार असून, त्यावेळी प्रचाराची खऱ्या अर्थाने रणधुमाळी होणार आहे. सेनेचे खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भास्कर जाधव हे नेते अंतिम टप्प्यात रत्नागिरीत प्रचाराला येतील, असे सांगितले जात आहे. रत्नागिरी पालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेश शेट्ये, कौसल्या शेट्ये, शिल्पा सुर्वे, रुबीना मालवणकर. शिवसेनेच्या ऋतुजा देसाई, पूर्वा सुर्वे, दिशा साळवी, तन्वीर जमादार. भाजपच्या सुहासिनी भोळे, नीलिमा शेलार, मनोज पाटणकर, निशा आलीम व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन शिंदे, रचना आंबेलकर आणि अपक्ष आशिष केळकर हे उमेदवारही पालिकेच्या या निवडणूक रिंगणात आपले भवितव्य आजमावत आहेत. (प्रतिनिधी)जनतेची करमणूकगेल्या काही वर्षात म्हणावी तशी विकासकामे न झाल्याने युती अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विरोधकांमध्येही गेल्या काही दिवसात मरगळ आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात होणाऱ्या या पोटनिवडणुकीत जनतेचा कल काय असणार? याबाबत सांगता येणे कठीण आहे. मात्र, आरोप - प्रत्यारोपांमुळे जनतेची चांगलीच करमणूक होत आहे.युतीत भांडणे : विकासकामांचा मुद्दा महत्त्वाचारत्नागिरी शहराच्या विकासासाठी सेना - भाजप युतीला निवडून दिले होते. मात्र, सत्तेवरून युतीत भांडणे झाली व नागरिकांच्या विकासाबाबतच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. त्यामुळे आता कोणत्या मुद्द्यांवर मते मागता, असेही अनेक ठिकाणी मतदारांनी काही उमेदवार व कार्यकर्त्यांना खडसावल्याची चर्चा शहरात आहे. त्यामुळे शहरात झालेली विकासकामे हा पोटनिवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरताना दिसून येत आहे.