शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सेना कॉर्नरवर, राष्ट्रवादी दारात, भाजप घरात...!

By admin | Updated: October 14, 2015 00:03 IST

रत्नागिरी पालिका : आरोप-प्रत्यारोपांचा गुलाल उधळत प्रचार सुरु

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या चार जागांची पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली असून, प्रचाराला गती आली आहे. गेल्या चार दिवसांपासून शिवसेनेने प्रभाग २ व ४मध्ये कॉर्नर सभांवर भर दिला असून, त्यात राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश शेट्ये यांना ‘कॉर्नर’ केले जात आहे. दुसरीकडे शिवसेनेला मोठे आव्हान दिलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार उमेश शेट्ये व अन्य सहकारी उमेदवारांनी दारोदार जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत प्रचार करण्यावर भर दिला आहे, तर भाजप मात्र घरात जाऊन गुप्तपणे प्रचार करीत आहे. एकूणच आरोप प्रत्यारोपांचा गुलाल उधळत प्रचार सुरू आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादीत परतलेल्या उमेश शेट्ये यांनी पोटनिवडणुकीत शिवसेनेपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी यांनी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनवल्याने दोन्ही पक्षांचे नेते पोटनिवडणूक होत असलेल्या दोन्ही प्रभागात आतापासूनच ठाण मांडून आहेत. कोण कुठे जातोय, कोणाचे लागेबांधे आहेत, शब्द देऊन कोण फसवत आहे, याकडेही आतापासूनच लक्ष दिले जात असून, संबंधितांना दोन्ही बाजूने कानपिचक्या देण्यात आल्याचाही बोलबाला आहे. अनेक उमेदवार नवखे आहेत. त्यामुळे प्रचाराच्या वेळी सर्वच पक्षांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतली असून, कॉर्नरसभांना मतदार, कार्यकर्ते व नेतेही हजेरी लावत आहेत. मात्र, प्रचारातील ही आघाडी १ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने मतांमध्ये प्रतिबिंबित किती होणार, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. उमेश शेट्ये सेनेतून बाहेर पडल्याने व आमने - सामने उभे ठाकल्याने त्यांच्याबाबत शिवसेनेत खुन्नस आहे. मात्र, उमेश शेट्ये यांच्या चक्री राजकारणाला शिवसेना किती पुरून उरणार त्यावरच या पोटनिवडणुकीतील सेनेचे यश अवलंबून राहणार आहे. सेनेच्या प्रचारात बंड्या साळवी, प्रमोद शेरे, मिलिंद कीर यांसारखे अनेक नेते कार्यरत आहेत. कीर व उमेश शेट्ये यांच्यात पत्रकारपरिषदांमधून जोरदार चकमक याआधीच झडली आहे. परंतु त्या आरोप - प्रत्यारोपांचा कोणाला किती फायदा होणार, हेसुध्दा मतदार राजाच ठरवणार आहे. मिलिंद कीर यांच्या आरोपानुसार उमेश शेट्ये हे नगरपरिषदेला लागलेली वाळवी आहे की, शेट्ये यांच्या आरोपानुसार मिलिंद कीर हे सूर्याजी पिसाळांची अवलाद आहे, याचा फैसला आता मतदारांच्या हाती आहे. शिवसेनेच्या कॉर्नर बैठका सुरू असल्या तरी राष्ट्रवादीने मात्र दारात जाऊन प्रचारावर भर दिला आहे. यानिमित्ताने मतदारांना भेटून उमेदवार व कार्यकर्ते राष्ट्रवादीने शहरात केलेल्या विकासकामांची माहिती देत आहेत व विजयासाठी आशीर्वाद मागत आहेत. पालिकेतील विद्यमान कारभाऱ्यांनी विकासासाठी काहीच केले नसून या दोन्ही प्रभागातील विकासासाठीच राष्ट्रवादीला निवडून देण्याचे आवाहन केले जात आहे. बुधवारपासून राष्ट्रवादीचे पदाधिकारी मतदारांच्या घरी जाऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी मते मागणार आहेत. अनेक कारणांवरून उमेश शेट्ये, कौसल्या शेट्ये हे उमेदवार अपात्र ठरणार असून, पुन्हा पोटनिवडणूक होऊ नये म्हणून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन सेनेचे नेते करीत आहेत. यातील कोणाचा राजकीय युक्तिवाद लोकांच्या पचनी पडणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. सेनेचा प्रचार कॉर्नरवर, राष्ट्रवादी दारात जात असताना भाजपचे उमेदवार व कार्यकर्ते मात्र घरात जाऊन प्रचार करीत आहेत. त्यात नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, भाजपचे पदाधिकारीही सहभागी होत आहेत. मनसेच्या प्रचारास मात्र अजून वेग आलेला नाही. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच पक्षांचे वरिष्ठ नेते रत्नागिरीत दाखल होणार असून, त्यावेळी प्रचाराची खऱ्या अर्थाने रणधुमाळी होणार आहे. सेनेचे खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भास्कर जाधव हे नेते अंतिम टप्प्यात रत्नागिरीत प्रचाराला येतील, असे सांगितले जात आहे. रत्नागिरी पालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेश शेट्ये, कौसल्या शेट्ये, शिल्पा सुर्वे, रुबीना मालवणकर. शिवसेनेच्या ऋतुजा देसाई, पूर्वा सुर्वे, दिशा साळवी, तन्वीर जमादार. भाजपच्या सुहासिनी भोळे, नीलिमा शेलार, मनोज पाटणकर, निशा आलीम व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन शिंदे, रचना आंबेलकर आणि अपक्ष आशिष केळकर हे उमेदवारही पालिकेच्या या निवडणूक रिंगणात आपले भवितव्य आजमावत आहेत. (प्रतिनिधी)जनतेची करमणूकगेल्या काही वर्षात म्हणावी तशी विकासकामे न झाल्याने युती अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विरोधकांमध्येही गेल्या काही दिवसात मरगळ आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात होणाऱ्या या पोटनिवडणुकीत जनतेचा कल काय असणार? याबाबत सांगता येणे कठीण आहे. मात्र, आरोप - प्रत्यारोपांमुळे जनतेची चांगलीच करमणूक होत आहे.युतीत भांडणे : विकासकामांचा मुद्दा महत्त्वाचारत्नागिरी शहराच्या विकासासाठी सेना - भाजप युतीला निवडून दिले होते. मात्र, सत्तेवरून युतीत भांडणे झाली व नागरिकांच्या विकासाबाबतच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. त्यामुळे आता कोणत्या मुद्द्यांवर मते मागता, असेही अनेक ठिकाणी मतदारांनी काही उमेदवार व कार्यकर्त्यांना खडसावल्याची चर्चा शहरात आहे. त्यामुळे शहरात झालेली विकासकामे हा पोटनिवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरताना दिसून येत आहे.