शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

मंत्रिमंडळात सेना ‘इन’; जिल्ह्यातील तीनही आमदार ‘आऊट’!

By admin | Updated: January 3, 2015 00:13 IST

या तिघांनाही ‘मातोश्री’ ‘आऊट’ करणार, याबाबत चर्चेला आता उधाण आले आहे.

रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिवसेना ‘इन’ झाल्यानंतर जिल्ह्यातील सेनेच्या तीनपैकी एकाही आमदाराला लाल दिव्याची गाडी मिळाली नाही. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २ राज्यमंत्रीपदांमध्ये समावेश होईल व पालकमंत्रीपदही मिळेल, अशी अपेक्षा असतानाच राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना रत्नागिरीचे पालकमंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातील तीन आमदारांपैकी एकजण मंत्रिमंडळात ‘इन’ होणार की, या तिघांनाही ‘मातोश्री’ ‘आऊट’ करणार, याबाबत चर्चेला आता उधाण आले आहे. अलिकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात सेनेचे तीन उमेदवार विजयी झाले. हे तीनही आमदार त्यांच्या पातळीवर सेनेतील दिग्गज मानले जातात. राजापूरचा गड सांभाळणारे राजन साळवी यांचे नाव जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करीत असल्याने राज्यभरात ओळखीचे आहे. चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांची दुसरी टर्म आहे. त्यांचाही सेनेत चांगलाच दबदबा आहे. रत्नागिरी हा मतदारसंघ अनेक वर्षे भाजपाकडे आहे. मात्र, युती तुटल्याने राष्ट्रवादीतून अचानकपणे सेनेत प्रवेश करीत माजी राज्यमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीचा किल्ला लढवित सर केला. त्यामुळे या तिघांनाही आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद मिळण्याची आशा आहे. मात्र, या तिघांनाही बाजूला ठेवत खेडमधील रामदास कदम यांच्या ‘कदमा’पर्यंत लाल दिव्याची गाडी पोहोचली. त्यामुळे जिल्ह्यातील तीनही सेना आमदारांच्या राज्यमंत्रीपद मिळण्याच्या आशा धुळीला मिळाल्या. राज्य मंत्रिमंडळात सेनेच्या कोट्यातील आणखी दोन राज्यमंत्रीपदे भरायची आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार जवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे या विस्तारात जिल्ह्याला आणखी एक राज्यमंत्रीपद मिळेल, असा सूर शिवसेनेत पुन्हा आळवला जात आहे. शिवसेनेकडे मंत्रीपदासाठी इच्छुकांची मोठी यादी आहे, अन कोट्यातील मंत्रीपदे मात्र केवळ दोन आहेत. या स्थितीत ‘मातोश्री’चा ‘ग्रीन सिग्नल’ या तीनपैकी कोणाला मिळेल का, याचीही चाचपणी सुरू झाली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नाही तर नाही निदान राज्यमंत्रीपद तरी मिळेल, अशी या तीनही आमदारांच्या समर्थकांची अपेक्षा असून, ती पूर्ण होणार का, याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहे.या सर्व प्रकारात जिल्ह्याचे पालकमंत्रीपद व राज्यमंत्रीपद सक्षमतेने सांभाळणाऱ्या उदय सामंत यांची पक्षातील ज्येष्ठतेच्या मुद्द्यावरून झालेली कोंडी फुटणार की नाही, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)मंत्रीपदावरून सेनेत गटबाजी?जिल्हा शिवसेनेत दोन गट कार्यरत आहेत. त्यामुळे तीनपैकी एका आमदाराला मंत्रीपद दिले, तर ही गटबाजी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मंत्रीपद नको, असा विचार करीत तीनही आमदारांना मातोश्रीने आऊट केले की काय, अशीही चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. उदय सामंत हे राष्ट्रवादीत असताना राज्यमंत्री व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री होते. मंत्रीपदावर असतानाच त्यांनी निवडणूक अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी शिवसेनेत उडी घेतली व रत्नागिरीची उमेदवारी मिळवित विजयही संपादन केला. सेनेचे धडाडीने कार्य करणाऱ्या व विधानसभा गाजविणाऱ्या साळवी यांची मंत्रीपदाची संधी हुकणार, या शंकेने साळवी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली. साळवी यांना मंत्रीपद मिळावे, अशी समर्थकांची मागणी आहे. दुसरीकडे आमदार सदानंद चव्हाण यांनीही मंत्रीपदासाठी फिल्डींग लावली आहे.