शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

मंत्रिमंडळात सेना ‘इन’; जिल्ह्यातील तीनही आमदार ‘आऊट’!

By admin | Updated: January 3, 2015 00:13 IST

या तिघांनाही ‘मातोश्री’ ‘आऊट’ करणार, याबाबत चर्चेला आता उधाण आले आहे.

रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिवसेना ‘इन’ झाल्यानंतर जिल्ह्यातील सेनेच्या तीनपैकी एकाही आमदाराला लाल दिव्याची गाडी मिळाली नाही. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २ राज्यमंत्रीपदांमध्ये समावेश होईल व पालकमंत्रीपदही मिळेल, अशी अपेक्षा असतानाच राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना रत्नागिरीचे पालकमंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातील तीन आमदारांपैकी एकजण मंत्रिमंडळात ‘इन’ होणार की, या तिघांनाही ‘मातोश्री’ ‘आऊट’ करणार, याबाबत चर्चेला आता उधाण आले आहे. अलिकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात सेनेचे तीन उमेदवार विजयी झाले. हे तीनही आमदार त्यांच्या पातळीवर सेनेतील दिग्गज मानले जातात. राजापूरचा गड सांभाळणारे राजन साळवी यांचे नाव जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करीत असल्याने राज्यभरात ओळखीचे आहे. चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांची दुसरी टर्म आहे. त्यांचाही सेनेत चांगलाच दबदबा आहे. रत्नागिरी हा मतदारसंघ अनेक वर्षे भाजपाकडे आहे. मात्र, युती तुटल्याने राष्ट्रवादीतून अचानकपणे सेनेत प्रवेश करीत माजी राज्यमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीचा किल्ला लढवित सर केला. त्यामुळे या तिघांनाही आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद मिळण्याची आशा आहे. मात्र, या तिघांनाही बाजूला ठेवत खेडमधील रामदास कदम यांच्या ‘कदमा’पर्यंत लाल दिव्याची गाडी पोहोचली. त्यामुळे जिल्ह्यातील तीनही सेना आमदारांच्या राज्यमंत्रीपद मिळण्याच्या आशा धुळीला मिळाल्या. राज्य मंत्रिमंडळात सेनेच्या कोट्यातील आणखी दोन राज्यमंत्रीपदे भरायची आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार जवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे या विस्तारात जिल्ह्याला आणखी एक राज्यमंत्रीपद मिळेल, असा सूर शिवसेनेत पुन्हा आळवला जात आहे. शिवसेनेकडे मंत्रीपदासाठी इच्छुकांची मोठी यादी आहे, अन कोट्यातील मंत्रीपदे मात्र केवळ दोन आहेत. या स्थितीत ‘मातोश्री’चा ‘ग्रीन सिग्नल’ या तीनपैकी कोणाला मिळेल का, याचीही चाचपणी सुरू झाली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नाही तर नाही निदान राज्यमंत्रीपद तरी मिळेल, अशी या तीनही आमदारांच्या समर्थकांची अपेक्षा असून, ती पूर्ण होणार का, याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहे.या सर्व प्रकारात जिल्ह्याचे पालकमंत्रीपद व राज्यमंत्रीपद सक्षमतेने सांभाळणाऱ्या उदय सामंत यांची पक्षातील ज्येष्ठतेच्या मुद्द्यावरून झालेली कोंडी फुटणार की नाही, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)मंत्रीपदावरून सेनेत गटबाजी?जिल्हा शिवसेनेत दोन गट कार्यरत आहेत. त्यामुळे तीनपैकी एका आमदाराला मंत्रीपद दिले, तर ही गटबाजी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मंत्रीपद नको, असा विचार करीत तीनही आमदारांना मातोश्रीने आऊट केले की काय, अशीही चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. उदय सामंत हे राष्ट्रवादीत असताना राज्यमंत्री व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री होते. मंत्रीपदावर असतानाच त्यांनी निवडणूक अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी शिवसेनेत उडी घेतली व रत्नागिरीची उमेदवारी मिळवित विजयही संपादन केला. सेनेचे धडाडीने कार्य करणाऱ्या व विधानसभा गाजविणाऱ्या साळवी यांची मंत्रीपदाची संधी हुकणार, या शंकेने साळवी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली. साळवी यांना मंत्रीपद मिळावे, अशी समर्थकांची मागणी आहे. दुसरीकडे आमदार सदानंद चव्हाण यांनीही मंत्रीपदासाठी फिल्डींग लावली आहे.