शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

भाजपांतर्गत निवडणूक कार्यक्रम जाहीर

By admin | Updated: September 27, 2015 00:19 IST

अतुल काळसेकर : एकमेव पक्षात घराणेशाही नाही

कणकवली : भाजपा पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ५ आॅक्टोबरपासून पुढील महिनाभरात गावपातळीवरील स्थानिय समित्यांच्या निवडणुका होत असून डिसेंबरच्या मध्यावर जिल्हा कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे. लोकशाही पद्धतीने पक्षांतर्गत निवडणुका होत असून कुठली घराणेशाही नसलेला एकमेव पक्ष असल्याचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथील पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष शिशिर परूळेकर उपस्थित होते. काळसेकर पुढे म्हणाले की, चालू वर्ष भाजपातील संघटनात्मक निवडणुकीचे वर्ष आहे. पक्षांतर्गत लोकशाही टिकवलेला भाजप हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. आतापर्यंत सदस्य नोंदणी अभियानांतर्गत १०.७५ कोटी सदस्यांसह जगातील क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. भाजपाचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून जिल्ह्यासाठी प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांची निवडणूक अधिकारी म्हणून तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सरचिटणीस चारूदत्त देसाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. तालुकानिहाय निवडणूक अधिकारी नेमण्यात आले आहेत. दोडामार्ग चंद्रशेखर देसाई, सावंतवाडी पुखराज पुरोहित, वेंगुर्ले साईप्रसाद नाईक, मालवण विलास हडकर, कुडाळ नीलेश तेंडुलकर, कणकवली राजश्री धुमाळे, वैभववाडी संजय रावराणे तर देवगडसाठी नरेंद्र भाबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका स्तरावरच्या निवडणुकांपूर्वी ५ आॅक्टोबरपूर्वी सक्रीय सदस्य नोंदणी करायची आहे. जिल्हास्तरावरून या सदस्यांना मान्यता दिली जाणार आहे. ज्या कार्यकर्त्याने १५ दिवस पूर्ण वेळ काम करण्यासह किमान १०० प्राथमिक सदस्य केले आहेत त्याला सक्रीय सदस्य म्हणून मान्यता देण्यात येईल. ५ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर स्थानिय समित्यांच्या निवडणुका होणार असून त्या- त्या गावातील प्राथमिक सदस्य स्थानिय समिती अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड करतील. या समितीत महिला आघाडी व युवक आघाडीचे सदस्य निवडण्यात येतील. नोव्हेंबर अखेरीस तालुका स्तरावरील निवडणुका होणार आहेत. यासाठी स्थानिय समितीचा अध्यक्ष मतदार असेल. आॅक्टोबर महिन्यात प्राथमिक व सक्रीय सदस्यांसाठी प्रशिक्षणे होणार आहेत. सक्रीय सदस्यांमधून तालुकानिहाय आठ सदस्य जिल्हा निवडणूक प्रक्रियेत भाग घेतील. ज्या तालुक्यात ५० टक्केपेक्षा कमी स्थानिय समित्या होतील. त्या तालुक्याची समिती गठीत झालेली नाही असे गृहीत धरून तालुका प्रक्रियेतून बाद होणार आहे, असे काळसेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)