शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

५0 लाखांच्या रकमेचा तिढा सुटला

By admin | Updated: October 9, 2016 23:33 IST

रकमेबाबत संशय नसल्याचे आयकरचे पत्र : न्यायालयाच्या परवानगीनंतर पोलिस पैसे देणार

सावंतवाडी : आरोंदा दूरक्षेत्रावर सापडलेल्या ५० लाखांच्या रोकड प्रकरणाचा तपास आयकर विभागाने पूर्ण केला असून, या पैशामागे कोणताही संशय नसल्याचे त्यांनी पोलिसांना कळविले आहे. तसेच पुढील निर्णय आपल्या स्तरावर घ्या, असेही आयकर विभागाने पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. हे पत्र चार दिवसांपूर्वी सावंतवाडी पोलिसांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता ५० लाखांच्या रकमेचा गुंता सुटला असून, संबंधितांना हे पैसे न्यायालयीन प्रकियेतून घ्यावे लागणार आहेत. ७ जुलैला रात्रीच्या सुमारास आरोंदा दूरक्षेत्रावर वाहनांची तपासणी करीत असताना पोलिसांना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कारमध्ये ५० लाखांची रोकड सापडली होती. या रकमेसोबत दोघे युवक होते. त्यांनी हे पैसे व्यवसायातील असल्याचे पोलिसांना सांगितले होते. तरीही पोलिसांनी सखोल चौकशी करण्यासाठी युवकांसह पैसे ताब्यात घेतले होते. या रकमेबाबत तत्कालीन पोलिस उपअधीक्षक प्रविण चिंचाळकर व पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी चौकशी केली. मात्र, त्या दोन युवकांच्या उत्तरामध्ये त्यांना संशय आला. तसेच पैशांसोबत रितसर कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी रक्कम सील केली होती. मात्र त्या युवकांना सोडून दिले होते. त्यानंतर हा तपास कोल्हापूर व पुणे येथील आयकर विभागाकडे देण्यात आला. त्यांनी चार ते पाच वेळा या युवकांची चौकशी केली. तसेच त्यांना रितसर कागदपत्रे हजर करण्याचे आदेशही देण्यात आले होते. ही चौकशी पुणे येथील कार्यालयात करण्यात आली होती. सतत चार महिने आयकर विभागाने या रकमेबाबत चौकशी केल्यानंतर अखेर चार दिवसांपूर्वी सावंतवाडी पोलिसांना रितसर पत्र पाठवून या पैशांमागे कोणताही संशय नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या पोलिस ठाण्याच्या स्तरावर कोणती कारवाई करायची असेल तर करू शकता, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी पैसे सील केल्याने हे पैसे न्यायालयील मार्गानेच संबधितांना घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी सावंतवाडी न्यायालयाला रितसर बॉण्ड द्यावा लागणार आहे. त्यानंतर पोलिस हे पैसे त्या युवकांच्या ताब्यात देणार आहेत. (प्रतिनिधी) पाटील : न्यायालयीन प्रक्रियेतूनच रक्कम घ्यावी लागेल ४आयकर विभागाने पैशांमागे कोणताही संशय नसल्याचे पत्र पोलिस ठाण्याला पाठविले आहे. मात्र, ही रक्कम सील करण्यात आल्याने न्यायालयीन मार्गानेच हे पैसे घ्यावे लागतील, असे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले.