शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

आंबोलीत धबधब्याची कामे निकृष्ट

By admin | Updated: June 27, 2016 00:34 IST

अपघात झाल्यास वनविभागावर गुन्हे दाखल करा

आंबोली : आंबोली धबधब्याच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना वनविभागाला जबाबदार धरावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे. आंबोली धबधब्याजवळ पायऱ्यांचे काम करताना उंची जास्त ठेवली आहे. डाव्या बाजूने रेलींग बसविले नाही. यामुळे पर्यटकांना अपघाताची शक्यता आहे. काही पर्यटक धबधब्याच्या वर चढून अपघात होतो. मात्र, त्यासाठी सुरक्षा उपाययोजना म्हणून जाळी बसविण्याचे काम वनखात्याचे होते. धबधब्याची जमीन वन अखत्यारीत येत असल्याने निधी खर्च करून कामे करण्यासाठी पर्यटनाचा निधी मिळवून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे.पर्यटकांची पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही केलेली नाहीत. त्यामुुळे पायऱ्यांची घसरण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोनशे झाडे धोकादायक आहेत, असा अहवाल देऊनही अद्याप तोडलेली नाहीत. मात्र, घाटात झाड पडल्यास एकही कर्मचारी तेथे येत नाही. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. घाटात दररोज दरड पडते. त्यावेळी वनखात्याकडे कर्मचारी असूनही दरड हटविण्यासाठी येत नाहीत. मग या परिसरात ड्युटीवर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची व वनक्षेत्रपालांची, वनपालांची जबाबदारी काय? आतापर्यंत वनविभागाकडून घाटातील दरडीचा व धोकादायक ठिकाणांचा एकही अहवाल केंद्रीय वनखात्याकडे व पर्यावरण विभागाकडे गेलेला नाही. दरडींना केवळ सार्वजनिक बांधकाम खात्याला जबाबदार धरले जाते. मात्र, खरे जबाबदार वनविभाग आहे. त्यामुळे अपघाताची जबाबदारी निश्चित करून वनखात्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पत्रकार अनिल चव्हाण, विजय राऊत, निर्णय राऊत यांनी पोलिसांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. यावेळी हवालदार गजेंद्र भिसे, प्रकाश कदम, नितीन उम्रजकर, विलास नर, राजेंद्र शेळके, सर्फराज मुजावर, गुरूदास तेली, गजानन देसाई आदी उपस्थित होते. (वार्ताहर)