शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

आंबोलीत धबधब्याची कामे निकृष्ट

By admin | Updated: June 27, 2016 00:34 IST

अपघात झाल्यास वनविभागावर गुन्हे दाखल करा

आंबोली : आंबोली धबधब्याच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना वनविभागाला जबाबदार धरावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे. आंबोली धबधब्याजवळ पायऱ्यांचे काम करताना उंची जास्त ठेवली आहे. डाव्या बाजूने रेलींग बसविले नाही. यामुळे पर्यटकांना अपघाताची शक्यता आहे. काही पर्यटक धबधब्याच्या वर चढून अपघात होतो. मात्र, त्यासाठी सुरक्षा उपाययोजना म्हणून जाळी बसविण्याचे काम वनखात्याचे होते. धबधब्याची जमीन वन अखत्यारीत येत असल्याने निधी खर्च करून कामे करण्यासाठी पर्यटनाचा निधी मिळवून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे.पर्यटकांची पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही केलेली नाहीत. त्यामुुळे पायऱ्यांची घसरण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोनशे झाडे धोकादायक आहेत, असा अहवाल देऊनही अद्याप तोडलेली नाहीत. मात्र, घाटात झाड पडल्यास एकही कर्मचारी तेथे येत नाही. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. घाटात दररोज दरड पडते. त्यावेळी वनखात्याकडे कर्मचारी असूनही दरड हटविण्यासाठी येत नाहीत. मग या परिसरात ड्युटीवर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची व वनक्षेत्रपालांची, वनपालांची जबाबदारी काय? आतापर्यंत वनविभागाकडून घाटातील दरडीचा व धोकादायक ठिकाणांचा एकही अहवाल केंद्रीय वनखात्याकडे व पर्यावरण विभागाकडे गेलेला नाही. दरडींना केवळ सार्वजनिक बांधकाम खात्याला जबाबदार धरले जाते. मात्र, खरे जबाबदार वनविभाग आहे. त्यामुळे अपघाताची जबाबदारी निश्चित करून वनखात्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पत्रकार अनिल चव्हाण, विजय राऊत, निर्णय राऊत यांनी पोलिसांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. यावेळी हवालदार गजेंद्र भिसे, प्रकाश कदम, नितीन उम्रजकर, विलास नर, राजेंद्र शेळके, सर्फराज मुजावर, गुरूदास तेली, गजानन देसाई आदी उपस्थित होते. (वार्ताहर)