शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

आंबोलीत धबधब्याची कामे निकृष्ट

By admin | Updated: June 27, 2016 00:34 IST

अपघात झाल्यास वनविभागावर गुन्हे दाखल करा

आंबोली : आंबोली धबधब्याच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना वनविभागाला जबाबदार धरावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे. आंबोली धबधब्याजवळ पायऱ्यांचे काम करताना उंची जास्त ठेवली आहे. डाव्या बाजूने रेलींग बसविले नाही. यामुळे पर्यटकांना अपघाताची शक्यता आहे. काही पर्यटक धबधब्याच्या वर चढून अपघात होतो. मात्र, त्यासाठी सुरक्षा उपाययोजना म्हणून जाळी बसविण्याचे काम वनखात्याचे होते. धबधब्याची जमीन वन अखत्यारीत येत असल्याने निधी खर्च करून कामे करण्यासाठी पर्यटनाचा निधी मिळवून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे.पर्यटकांची पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही केलेली नाहीत. त्यामुुळे पायऱ्यांची घसरण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोनशे झाडे धोकादायक आहेत, असा अहवाल देऊनही अद्याप तोडलेली नाहीत. मात्र, घाटात झाड पडल्यास एकही कर्मचारी तेथे येत नाही. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. घाटात दररोज दरड पडते. त्यावेळी वनखात्याकडे कर्मचारी असूनही दरड हटविण्यासाठी येत नाहीत. मग या परिसरात ड्युटीवर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची व वनक्षेत्रपालांची, वनपालांची जबाबदारी काय? आतापर्यंत वनविभागाकडून घाटातील दरडीचा व धोकादायक ठिकाणांचा एकही अहवाल केंद्रीय वनखात्याकडे व पर्यावरण विभागाकडे गेलेला नाही. दरडींना केवळ सार्वजनिक बांधकाम खात्याला जबाबदार धरले जाते. मात्र, खरे जबाबदार वनविभाग आहे. त्यामुळे अपघाताची जबाबदारी निश्चित करून वनखात्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पत्रकार अनिल चव्हाण, विजय राऊत, निर्णय राऊत यांनी पोलिसांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. यावेळी हवालदार गजेंद्र भिसे, प्रकाश कदम, नितीन उम्रजकर, विलास नर, राजेंद्र शेळके, सर्फराज मुजावर, गुरूदास तेली, गजानन देसाई आदी उपस्थित होते. (वार्ताहर)