शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पालकमंत्री असल्याचे नेहमी भान ठेवा

By admin | Updated: June 19, 2015 00:25 IST

परशुराम उपरकर : दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका

कणकवली : कोकणचा विकास करणार असे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सांगणारे दीपक केसरकर फक्त आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांबाबतच विचार करीत आहेत. ते फक्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे नसून, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, याचे त्यांनी भान ठेवावे, असा टोला मनसेचे कोकण विभागीय संघटक परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.येथील संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, दया मेस्त्री उपस्थित होते. उपरकर म्हणाले, पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी मंजूर करून आणलेली विकासकामे दीपक केसरकर रद्द करीत आहेत. चिपी विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात विकासकामे करून संपूर्ण जिल्ह्याचा विकास केल्याचा आव ते आणत आहेत. चिपी विमानतळ ते गोव्यापर्यंतच्या सागरी मार्गासाठी ११५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे त्यांनी अलिकडेच सांगितले. मात्र मालवण, देवगड, विजयदुर्ग हा भागही सागरी मार्गामध्ये येतो याबद्दल ते काहीही वाच्यता करीत नाहीत. तिंबलोच्या हॉटेलला फायदा मिळावा यासाठी केसरकरांची सर्व धडपड सुरु आहे.वेंगुर्ले तालुक्यासाठी २५० कोटींची नळयोजना आणणार असल्याचे ते सांगत असले तरी ही योजना नेमकी कोणासाठी आहे हे जनतेला माहित आहे. पूर्वीचे पालकमंत्री जूनमध्ये चिपी विमानतळावर विमान उतरणार असे सांगत होते. मात्र, केसरकर डिसेंबरमध्ये विमान उतरणार असल्याचे सांगतात. ही जनतेची दिशाभूल आहे. जनतेकडून कमी दराने घेतलेली जमीन ८ हजार रुपये गुंठा दराने आयआरबी कंपनीला वापरासाठी देण्यात आली आहे. एलएनटी कंपनीने ५० कोटींचे काम याठिकाणी केले असून आता काम बंद आहे. कारण कामाच्या निविदेमध्ये नमूद करण्यात आलेले काम आता कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीचे नुकसान होणार आहे. विमानतळावरील धावपट्टी ३.४५ किलोमीटरवरून २.५ किलोमीटरवर आणण्यात आली आहे तर पाच विमानांसाठी पार्कींग शेड उभारण्याचे पूर्वी ठरले होते. मात्र, आता ही व्यवस्था दोनच विमानांसाठी होणार आहे. सुरक्षिततेसाठी असलेली कंपाऊंड वॉलही कमी करण्यात आली आहे. सामान्यांसाठी विमानतळाचा काही उपयोग होणार नाही. विमानात बसण्याची सर्वसामान्यांची इच्छा अपूर्ण राहणार असून, तिंबलोसारख्या हॉटेलातील पर्यटकांनाच या विमानतळाचा उपयोग होणार असल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)