शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
3
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
4
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
5
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
6
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
7
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
8
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
9
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
10
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
11
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
12
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
13
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
14
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
15
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
16
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
17
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
18
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
19
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
20
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

पालकमंत्री असल्याचे नेहमी भान ठेवा

By admin | Updated: June 19, 2015 00:25 IST

परशुराम उपरकर : दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका

कणकवली : कोकणचा विकास करणार असे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सांगणारे दीपक केसरकर फक्त आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांबाबतच विचार करीत आहेत. ते फक्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे नसून, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, याचे त्यांनी भान ठेवावे, असा टोला मनसेचे कोकण विभागीय संघटक परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.येथील संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, दया मेस्त्री उपस्थित होते. उपरकर म्हणाले, पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी मंजूर करून आणलेली विकासकामे दीपक केसरकर रद्द करीत आहेत. चिपी विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात विकासकामे करून संपूर्ण जिल्ह्याचा विकास केल्याचा आव ते आणत आहेत. चिपी विमानतळ ते गोव्यापर्यंतच्या सागरी मार्गासाठी ११५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे त्यांनी अलिकडेच सांगितले. मात्र मालवण, देवगड, विजयदुर्ग हा भागही सागरी मार्गामध्ये येतो याबद्दल ते काहीही वाच्यता करीत नाहीत. तिंबलोच्या हॉटेलला फायदा मिळावा यासाठी केसरकरांची सर्व धडपड सुरु आहे.वेंगुर्ले तालुक्यासाठी २५० कोटींची नळयोजना आणणार असल्याचे ते सांगत असले तरी ही योजना नेमकी कोणासाठी आहे हे जनतेला माहित आहे. पूर्वीचे पालकमंत्री जूनमध्ये चिपी विमानतळावर विमान उतरणार असे सांगत होते. मात्र, केसरकर डिसेंबरमध्ये विमान उतरणार असल्याचे सांगतात. ही जनतेची दिशाभूल आहे. जनतेकडून कमी दराने घेतलेली जमीन ८ हजार रुपये गुंठा दराने आयआरबी कंपनीला वापरासाठी देण्यात आली आहे. एलएनटी कंपनीने ५० कोटींचे काम याठिकाणी केले असून आता काम बंद आहे. कारण कामाच्या निविदेमध्ये नमूद करण्यात आलेले काम आता कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीचे नुकसान होणार आहे. विमानतळावरील धावपट्टी ३.४५ किलोमीटरवरून २.५ किलोमीटरवर आणण्यात आली आहे तर पाच विमानांसाठी पार्कींग शेड उभारण्याचे पूर्वी ठरले होते. मात्र, आता ही व्यवस्था दोनच विमानांसाठी होणार आहे. सुरक्षिततेसाठी असलेली कंपाऊंड वॉलही कमी करण्यात आली आहे. सामान्यांसाठी विमानतळाचा काही उपयोग होणार नाही. विमानात बसण्याची सर्वसामान्यांची इच्छा अपूर्ण राहणार असून, तिंबलोसारख्या हॉटेलातील पर्यटकांनाच या विमानतळाचा उपयोग होणार असल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)