शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री असल्याचे नेहमी भान ठेवा

By admin | Updated: June 19, 2015 00:25 IST

परशुराम उपरकर : दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका

कणकवली : कोकणचा विकास करणार असे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सांगणारे दीपक केसरकर फक्त आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांबाबतच विचार करीत आहेत. ते फक्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे नसून, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, याचे त्यांनी भान ठेवावे, असा टोला मनसेचे कोकण विभागीय संघटक परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.येथील संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, दया मेस्त्री उपस्थित होते. उपरकर म्हणाले, पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी मंजूर करून आणलेली विकासकामे दीपक केसरकर रद्द करीत आहेत. चिपी विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात विकासकामे करून संपूर्ण जिल्ह्याचा विकास केल्याचा आव ते आणत आहेत. चिपी विमानतळ ते गोव्यापर्यंतच्या सागरी मार्गासाठी ११५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे त्यांनी अलिकडेच सांगितले. मात्र मालवण, देवगड, विजयदुर्ग हा भागही सागरी मार्गामध्ये येतो याबद्दल ते काहीही वाच्यता करीत नाहीत. तिंबलोच्या हॉटेलला फायदा मिळावा यासाठी केसरकरांची सर्व धडपड सुरु आहे.वेंगुर्ले तालुक्यासाठी २५० कोटींची नळयोजना आणणार असल्याचे ते सांगत असले तरी ही योजना नेमकी कोणासाठी आहे हे जनतेला माहित आहे. पूर्वीचे पालकमंत्री जूनमध्ये चिपी विमानतळावर विमान उतरणार असे सांगत होते. मात्र, केसरकर डिसेंबरमध्ये विमान उतरणार असल्याचे सांगतात. ही जनतेची दिशाभूल आहे. जनतेकडून कमी दराने घेतलेली जमीन ८ हजार रुपये गुंठा दराने आयआरबी कंपनीला वापरासाठी देण्यात आली आहे. एलएनटी कंपनीने ५० कोटींचे काम याठिकाणी केले असून आता काम बंद आहे. कारण कामाच्या निविदेमध्ये नमूद करण्यात आलेले काम आता कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीचे नुकसान होणार आहे. विमानतळावरील धावपट्टी ३.४५ किलोमीटरवरून २.५ किलोमीटरवर आणण्यात आली आहे तर पाच विमानांसाठी पार्कींग शेड उभारण्याचे पूर्वी ठरले होते. मात्र, आता ही व्यवस्था दोनच विमानांसाठी होणार आहे. सुरक्षिततेसाठी असलेली कंपाऊंड वॉलही कमी करण्यात आली आहे. सामान्यांसाठी विमानतळाचा काही उपयोग होणार नाही. विमानात बसण्याची सर्वसामान्यांची इच्छा अपूर्ण राहणार असून, तिंबलोसारख्या हॉटेलातील पर्यटकांनाच या विमानतळाचा उपयोग होणार असल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)