शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वपक्षीयांचे शक्तीप्रदर्शन

By admin | Updated: September 28, 2014 00:22 IST

विधानसभा निवडणूक : शेवटच्या दिवशी प्रशासनावर उमेदवारी अर्जांची बरसात

रत्नागिरी : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी प्रशासनावर उमेदवारी अर्जांचा पाऊसच पडला. अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन केल्याने पाचही मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शनिवारी एकाच दिवशी विक्रमी ४१ अर्ज दाखल झाले.या विधानसभा निवडणुकीत आघाडी आणि युती संपुष्टात आल्याने आणि त्यासाठी कालावधी गेल्याने शेवटच्या दिवशीपर्यंत उमेदवारांना शनिवारपर्यंत वाट पहावी लागली. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख चारही पक्षांच्या उमेदवारांची घोषणा शेवटच्या दिवशी करण्यात आल्याने शनिवारी एकाच दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी त्या त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारांची रिघ लागली होती.जिल्ह्यातील पाच जागांसाठी एकूण ६५ उमेदवारांनी १०१ इतके अर्ज दाखल झाले आहेत. यादी जाहीर करण्यास झालेला विलंब आणि युती-आघाडीतील फाटाफूट यामुळे शनिवारी ४१ अर्ज दाखल झाले. दापोलीतून सर्वाधिक १२, गुहागरातून ४, चिपळुणातून ९, रत्नागिरीतून १० आणि राजापुरातून ६ असे एकूण ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. युती आणि आघाडीमधील मुख्य घटक पक्ष वेगवेगळे झाल्याने अनेक इच्छुकांना संधी मिळाली त्यामुळे या निवडणुकीत अनेकांना संधी मिळाली. तसेच काही पक्षांना तर उमेदवार म्हणून कोणाची निवड करावी, असाही प्रश्न पडल्याने अनेक नवखे चेहरे या निवडणुकीत आपलं नशिब अजमावण्यासाठी उभे राहिल्याचे दिसून येत होते.अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असतानाही जोरदार शक्तीप्रदर्शन केले. रत्नागिरीत उदय सामंत यांनी, दापोलीत किशोर देसाई, संजय कदम, राजापुरातून अजित यशवंतराव, गुहागरातून शिवसेनेचे विजय भोसले यांनी मोठी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे अनेक ठिकाणी शनिवारी राजकीय वातावरण ढवळून निघाले असून रविवारपासून प्रचाराला सुरूवात होईल.(प्रतिनिधी)