शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
4
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
5
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
6
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
7
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
8
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
9
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
10
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
11
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
12
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
13
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
14
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
15
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
16
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
17
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
18
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
19
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
20
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

जिल्ह्यात सर्वपक्षीयांचे शक्तीप्रदर्शन

By admin | Updated: September 28, 2014 00:22 IST

विधानसभा निवडणूक : शेवटच्या दिवशी प्रशासनावर उमेदवारी अर्जांची बरसात

रत्नागिरी : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी प्रशासनावर उमेदवारी अर्जांचा पाऊसच पडला. अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन केल्याने पाचही मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शनिवारी एकाच दिवशी विक्रमी ४१ अर्ज दाखल झाले.या विधानसभा निवडणुकीत आघाडी आणि युती संपुष्टात आल्याने आणि त्यासाठी कालावधी गेल्याने शेवटच्या दिवशीपर्यंत उमेदवारांना शनिवारपर्यंत वाट पहावी लागली. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख चारही पक्षांच्या उमेदवारांची घोषणा शेवटच्या दिवशी करण्यात आल्याने शनिवारी एकाच दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी त्या त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारांची रिघ लागली होती.जिल्ह्यातील पाच जागांसाठी एकूण ६५ उमेदवारांनी १०१ इतके अर्ज दाखल झाले आहेत. यादी जाहीर करण्यास झालेला विलंब आणि युती-आघाडीतील फाटाफूट यामुळे शनिवारी ४१ अर्ज दाखल झाले. दापोलीतून सर्वाधिक १२, गुहागरातून ४, चिपळुणातून ९, रत्नागिरीतून १० आणि राजापुरातून ६ असे एकूण ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. युती आणि आघाडीमधील मुख्य घटक पक्ष वेगवेगळे झाल्याने अनेक इच्छुकांना संधी मिळाली त्यामुळे या निवडणुकीत अनेकांना संधी मिळाली. तसेच काही पक्षांना तर उमेदवार म्हणून कोणाची निवड करावी, असाही प्रश्न पडल्याने अनेक नवखे चेहरे या निवडणुकीत आपलं नशिब अजमावण्यासाठी उभे राहिल्याचे दिसून येत होते.अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असतानाही जोरदार शक्तीप्रदर्शन केले. रत्नागिरीत उदय सामंत यांनी, दापोलीत किशोर देसाई, संजय कदम, राजापुरातून अजित यशवंतराव, गुहागरातून शिवसेनेचे विजय भोसले यांनी मोठी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे अनेक ठिकाणी शनिवारी राजकीय वातावरण ढवळून निघाले असून रविवारपासून प्रचाराला सुरूवात होईल.(प्रतिनिधी)