शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

संघटना बांधणीचे ध्येय : जठार

By admin | Updated: November 11, 2014 23:22 IST

नारायण राणे यांच्या पराभवामुळे जिल्ह्यातील ‘राणे फॅक्टर’ संपला आहे

वैभववाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पराभवामुळे जिल्ह्यातील ‘राणे फॅक्टर’ संपला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्यातील सत्तेचा प्रभावीपणे वापर करून प्रत्येक गाव सक्षम करणे त्याचबरोबर भाजपाची संघटनात्मक बांधणी भक्कम करणे एवढेच आता आमचे ध्येय आहे, असे मत माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे व्यक्त केले.भाजपा कार्यालयात आयोजित कार्यकर्ता बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, प्रमोद रावराणे, तालुकाध्यक्ष सुहास सावंत, सरचिटणीस राजेंद्र राणे, मनोहर फोंडके, उत्तम सुतार, संजय रावराणे, रंगनाथ नागप आदी उपस्थित होते.ते म्हणाले, जिल्ह्यातील पक्षाच्या पराभवाने खचून न जाता कार्यकर्त्यांनी सत्तेचा उपयोग करून विकासासाठी आवश्यक निधी गावापर्यंत नेण्याच्या दृष्टीने सध्या नियोजन केले जात आहे. त्यासाठी गाव, तालुका व जिल्हा पातळीवर संघटनात्मक पुनर्रचना केली जाणार आहे. त्यामुळे भाजपाच्या विकासात्मक कार्यपद्धतीची प्रचिती लवकरच येईल. राज्यातील विश्वासदर्शक ठरावानंतर तालुक्यातील एस. टी. स्टँड, आयटीआय इमारत, ऊस संशोधन केंद्र यासह अन्य प्रमुख विकासकामांसाठी मंत्रालयात संयुक्त बैठक आयोजित केली जाणार आहे. याबाबत नुकतीच शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी चर्चाही झाली आहे, असे जठार यांनी स्पष्ट केले. माजी आमदार जठार म्हणाले, १६ ते १९ या काळात भाजपाने जिल्ह्यात प्रचार दौरा आयोजित केला आहे. हा दौरा १९ रोजी सकाळी १० वाजता वैभववाडीत होणार आहे.यावेळी जनतेने आपल्या भागातील समस्या लेखी स्वरूपात घेऊन भाजपा कार्यालयात हजर रहावे, असे आवाहन करीत यापुढे जनतेने विकासाची चिंता करणे सोडून द्यावे. (प्रतिनिधी)कोकणाला हक्काचा माणूस मिळालारेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना सरकारमध्ये घेऊन कोकणचा सन्मान केला आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला भाजपाचा हक्काचा खासदार मिळाला आहे. त्यामुळे कोेकण रेल्वेचे अनेक प्रश्न तत्काळ मार्गी लागतीलच. शिवाय विविध विकास प्रकल्पांनाही चालना मिळेल. या सगळ्याचा फायदा भाजपावाढीसाठी होणार आहे असा विश्वास माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.