शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

कृषी सहलीचे पैसे परस्पर हडप

By admin | Updated: March 20, 2015 23:20 IST

सावंतवाडी विभागातील प्रकार : सदस्याचा उपोषणाचा इशारा

सावंतवाडी : कृषी विभागाने नेमलेल्या आत्मा समितीला विश्वासात न घेता परस्पर नागपूर येथे सहल काढून त्यांचा अडीच लाख रूपयांचा निधी परस्पर हडप केल्याचा प्रकार सावंतवाडी तालुका कृषी विभागात घडला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी आवाज उठवताच त्यातील काही रक्कम भरण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला पण शेतकऱ्यांच्या वाट्याचे पैसे अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. सावंतवाडी तालुका कृषी विभागाच्या कारभाराविरोधात आत्मा समितीचे सदस्य उपोषणाला बसणार आहेत. याबाबत परब यांनी निवेदनातून दिलेली माहिती अशी की, कृषी विभागाच्या आत्मा समितीत ४२ जणांचा समावेश होता. त्यातील ४२ जणांना स्प्रे पंपाचे वाटप करण्यात आले होते. मात्र, यातील सर्वच्या सर्व पंप निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे काहींनी पंप दुरूस्त केले मात्र, यातील १७ जणांनी आपले पंप कृषी विभागाला परत केले. हे पंप जमा करून १ वर्ष उलटले तरी या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत हे पंप अदा करण्यात आले नाही. याबाबत अनेकवेळा तालुका कृषी अधिकारी ईश्वर गुरव यांना आत्मा समितीच्या सदस्यांनी जाब विचारला असता, हे पंप लवकरच येतील अशी उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचे काम हे अधिकारी करीत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत स्प्रे पंप मिळाले नाहीत. त्यामुळे आत्मा समितीचे सदस्य चांगलेच आक्रमक बनले आहेत.फेबु्रवारी २०१४ मध्ये कृषी विभागाने आत्मा सदस्यांना सहलीचे आयोजन केले होते. मात्र, ज्या सदस्यांसाठी शासनाचा उपक्रम होता त्या सदस्यांना सहलीची माहितीच नव्हती. सहलीवर शासनाचे पंधराशे व स्वत:चे पंधराशे असे मिळून तीन हजार खर्च करण्याचे ठरले होते. त्यासाठी सदस्यांची परवानगी घेणे आवश्यक होते. पण ही सहल नागपूर येथे जाणार हे निश्चित झाल्यावर त्यांच्या गाड्याही बुक केल्या. मात्र, सदस्यांना नागपूर येथे सहल जात असल्याची पुसटशी कल्पनाही दिली नाही. ज्या गाड्यांतून सहल नेली त्यात सदस्यांपेक्षा वेगळी माणसे नेण्यात आली. ती सदस्य तसेच कृषी मित्र असे दाखवल्याचा प्रकार उघड झाला आहे.आत्माच्या सदस्यांना घेऊन सहलीचे आयोजन करण्याचा शासनाचा उद्देश होता. मात्र, हा उद्देश येथील कृषी विभागाने असफल ठरवत सहलीसाठी नेलेल्या शेतकऱ्यांकडूनच पैसे घेतले. यात शासनाकडून दीड हजार व सदस्याचे दीड हजार असे तीन हजार रूपये घेण्याचे शासनाचे परिपत्रक होते. मात्र नियम धाब्यावर बसवून येथील कृषी विभाागाने सर्वच पैसे शेतकऱ्यांकडून घेतले होते. यावर सदस्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता, आम्ही तुमचे पैसे काढून ठेवले आहेत, असे सांगितले. मात्र अद्यापही पैसे दिले नाहीत. (प्रतिनिधी)चौकशीची मागणी तालुका कृषी अधिकाऱ्यावर उत्तम परब यांनी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कृषी विभागात लाखो रूपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. सर्व कृषी योजनेची चौकशी करावी, अशी मागणी करीत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा शुक्रवारी पत्रकातून दिला आहे.