शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

कृषी पर्यटन अभ्यासक्रम सुरू करणार

By admin | Updated: June 4, 2015 00:03 IST

दीपक केसरकर : वेंगुर्ले फळसंशोधन केंद्रात पर्यटन विषयावर चर्चासत्र

वेंगुर्ले : येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात अद्ययावत ‘कृषी पर्यटन’ विषयक अभ्यासक्रम सुरू करणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला विद्यार्थी कृषी पर्यटनातून स्वयंरोजगार निर्मिती करण्यासाठी सर्वार्थाने सक्षम असेल, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात आयोजित चर्चासत्रात केले. वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात ‘ग्रामीण कृषी विकास आणि कृषी पर्यटन’ या चर्चासत्राचे आयोजन पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले. यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वर्लू उपस्थित होते. कुलगुरू डॉ. वेंकटेश्वर्लू यांनी, कोकणात दरवर्षी लाखो पर्यटक येतात, अशा पर्यटकांना कृषी पर्यटनाकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. याकरिता कृषी पर्यटन प्रकल्पाची जास्तीत जास्त प्रसिद्धी एमटीडीसीच्या माध्यमातून देण्यात यावी, असे प्रतिपादन केले. पालकमंत्री केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारणारा तीन महिने, सहा महिने व बारा महिने कालावधींचा ‘कृषी पर्यटन’ विषयक अभ्यासक्रम हा देशातील पहिलाच अशा प्रकारचा उपक्रम असून, याला विद्यापीठाचे पूर्ण सहकार्य लाभेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी ग्रामविकास मंत्रालयाचे सहसचिव दीपक मोरे यांनी कृषी पर्यटन अभ्यासक्रमाचे महत्त्व विशद केले. जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी योग्य नियोजन झाल्यास पर्यटन व्यवसायामध्ये आपण गोवा राज्याच्याही पुढे जाऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, अधिष्ठाता डॉ. रमेश बुरटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र साळगावकर यांच्यासह फळ संशोधन केंद्रातील तसेच विविध खात्यांचे अधिकारी व जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘मँगो व्हिलेज’ संकल्पना राबविणार\पलकमंत्री केसरकर म्हणाले, केरळ व गोवा राज्यात ‘स्पाईप व्हिलेज’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या धर्तीवर सिंधुदुुर्ग जिल्ह्यात कृषी पर्यटनाखाली ‘मँगो व्हिलेज’ ही संकल्पना राबविण्यात यावी. या अभ्यासक्रमासाठी आवश्यक निधी लवकरच विद्यापीठाला उपलब्ध करून दिला जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.