शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार

By admin | Updated: March 7, 2016 00:38 IST

नारायण राणे : आंदोलनकर्त्या डंपर व्यावसायिकांची घेतली भेट; पोलिसांनी केलेला लाठीचार्ज चुकीचा

सिंधुदुर्गनगरी : वाळु वाहतुकीसंदर्भात आमचे सरकार असताना पाच हजार दंड होता. आता या युती सरकारच्या काळात लाखो रूपयांचा दंड आकारण्यात येत असून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज होणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, आंदोलनकर्त्यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन मी सुरूच ठेवणार आहे, असा इशारा काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आंदोलनकर्त्यांशी भेटी दरम्यान चर्चा करताना दिला दिला. नाकात बोलण्यापेक्षा ठोस निर्णय घेणारा पालकमंत्री असता तर आजचा हा प्रश्न नक्कीच निकाली निघाला असता, असा टोलाही राणे यांनी पालकमंत्री केसरकर यांना लगावला.सिंधुदुर्गनगरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर चालक-मालक व्यावसायिकांचे तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच असून या आंदोलनस्थळी दुपारी ३ वाजता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा करीत प्रशासनाने केलेल्या कारवाई विरोधात नाराजी व्यक्त केली.यावेळी आंदोलनकर्ते संजय पडते व इतरांनी राणे यांना प्रशासन मोठ्या प्रमाणात वाळू व डंपर व्यावसायिकांना त्रास देत असून मोठ्या प्रमाणात दंडाची आकारणी, तसेच डंपर जप्त करीत असून अगोदरच कर्जबाजारी असलेल्या डंपर व्यावसायिकांना त्रास देण्याचे काम हे प्रशासन करीत आहे असे सांगितले.यावर बोलताना राणे म्हणाले की, आमचे सरकार असताना पाच हजार दंड होता तसेच किमान व कमाल अशी दंड आकारणीवर मर्यादा होती. म्हणजे तीन पटाच्या वरती दंड आकारणी करण्यात येत नव्हती. आता या सरकारने तीनऐवजी पाचपट दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याला जबाबदार कोण आहे ते तुम्हीच ठरवा. सत्ताधारी आमदाराला पोलीस लाठीमार करतात, येथील जनतेला लाठीमार होतो, जिल्हाधिकारी तुम्हाला भेट देत नाही तुमचे म्हणणे ऐकून घेत नाही. या सर्व आजच्या स्थितीला सत्ताधिकारी, लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत असे त्यांनी सांगितले. काही जण मार खाऊन मुंबईला गेले असून मुख्यमंत्र्यांची भेट घेत आयुक्तांची कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे हा प्रश्न सुटणार आहे का? ते नेमके काय करतात हेच नेमके समजत नाही असाही टोला त्यांनी येथील सत्ताधारी लोकप्रतिनिधींना लगावला. तर भाजपचे पदाधिकारी माधव भंडारी यांनी काँग्रेसने गुंड आणल्याचे सांगितले. हे त्यांचे विधान चुकीचे असून आम्ही जनतेला न्याय मिळण्यासाठी लढतच राहणार आहोत. मी पालकमंत्री असताना ही परिस्थिती या जिल्ह्यात नव्हती. येथील प्रशासनावर वचक होती मात्र आताच्या या सत्ताधिकारी लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकारी ऐकत नाही. या प्रश्नासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोललो असून यावर योग्य तो निर्णय घ्यायला लावणार आहे. येथे सुरू असलेल्या आंदोलनात मी पक्षीय राजकारण आणणार नाही. हे व्यावसायिक माझ्या जिल्ह्यातील असून त्यांच्यावर लाठीचार्ज केला, रक्त काढले. त्यामुळे माझ्या या जनतेला न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन मी सुरूच ठेवणार आहे असा इशाराही त्यांनी दिला.(प्रतिनिधी)राणेंचा टोला : नाकात बोलणारा पालकमंत्री नकोसध्याचे पालकमंत्री हे नाकात बोलणारे असून काही कामाचे नाहीत, अशी टीका पालकमंत्र्यांवर करीत आम्हाला नाकात बोलणारा पालकमंत्री नको. ठोस निर्णय घेणारा पालकमंत्री असता तर आजचा हा प्रश्न नक्कीच निकाली निघाला असता, असा टोलाही नारायण राणे यांनी पालकमंत्री केसरकर यांना लगावला.