शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार

By admin | Updated: March 7, 2016 00:38 IST

नारायण राणे : आंदोलनकर्त्या डंपर व्यावसायिकांची घेतली भेट; पोलिसांनी केलेला लाठीचार्ज चुकीचा

सिंधुदुर्गनगरी : वाळु वाहतुकीसंदर्भात आमचे सरकार असताना पाच हजार दंड होता. आता या युती सरकारच्या काळात लाखो रूपयांचा दंड आकारण्यात येत असून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज होणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, आंदोलनकर्त्यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन मी सुरूच ठेवणार आहे, असा इशारा काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आंदोलनकर्त्यांशी भेटी दरम्यान चर्चा करताना दिला दिला. नाकात बोलण्यापेक्षा ठोस निर्णय घेणारा पालकमंत्री असता तर आजचा हा प्रश्न नक्कीच निकाली निघाला असता, असा टोलाही राणे यांनी पालकमंत्री केसरकर यांना लगावला.सिंधुदुर्गनगरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर चालक-मालक व्यावसायिकांचे तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच असून या आंदोलनस्थळी दुपारी ३ वाजता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा करीत प्रशासनाने केलेल्या कारवाई विरोधात नाराजी व्यक्त केली.यावेळी आंदोलनकर्ते संजय पडते व इतरांनी राणे यांना प्रशासन मोठ्या प्रमाणात वाळू व डंपर व्यावसायिकांना त्रास देत असून मोठ्या प्रमाणात दंडाची आकारणी, तसेच डंपर जप्त करीत असून अगोदरच कर्जबाजारी असलेल्या डंपर व्यावसायिकांना त्रास देण्याचे काम हे प्रशासन करीत आहे असे सांगितले.यावर बोलताना राणे म्हणाले की, आमचे सरकार असताना पाच हजार दंड होता तसेच किमान व कमाल अशी दंड आकारणीवर मर्यादा होती. म्हणजे तीन पटाच्या वरती दंड आकारणी करण्यात येत नव्हती. आता या सरकारने तीनऐवजी पाचपट दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याला जबाबदार कोण आहे ते तुम्हीच ठरवा. सत्ताधारी आमदाराला पोलीस लाठीमार करतात, येथील जनतेला लाठीमार होतो, जिल्हाधिकारी तुम्हाला भेट देत नाही तुमचे म्हणणे ऐकून घेत नाही. या सर्व आजच्या स्थितीला सत्ताधिकारी, लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत असे त्यांनी सांगितले. काही जण मार खाऊन मुंबईला गेले असून मुख्यमंत्र्यांची भेट घेत आयुक्तांची कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे हा प्रश्न सुटणार आहे का? ते नेमके काय करतात हेच नेमके समजत नाही असाही टोला त्यांनी येथील सत्ताधारी लोकप्रतिनिधींना लगावला. तर भाजपचे पदाधिकारी माधव भंडारी यांनी काँग्रेसने गुंड आणल्याचे सांगितले. हे त्यांचे विधान चुकीचे असून आम्ही जनतेला न्याय मिळण्यासाठी लढतच राहणार आहोत. मी पालकमंत्री असताना ही परिस्थिती या जिल्ह्यात नव्हती. येथील प्रशासनावर वचक होती मात्र आताच्या या सत्ताधिकारी लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकारी ऐकत नाही. या प्रश्नासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोललो असून यावर योग्य तो निर्णय घ्यायला लावणार आहे. येथे सुरू असलेल्या आंदोलनात मी पक्षीय राजकारण आणणार नाही. हे व्यावसायिक माझ्या जिल्ह्यातील असून त्यांच्यावर लाठीचार्ज केला, रक्त काढले. त्यामुळे माझ्या या जनतेला न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन मी सुरूच ठेवणार आहे असा इशाराही त्यांनी दिला.(प्रतिनिधी)राणेंचा टोला : नाकात बोलणारा पालकमंत्री नकोसध्याचे पालकमंत्री हे नाकात बोलणारे असून काही कामाचे नाहीत, अशी टीका पालकमंत्र्यांवर करीत आम्हाला नाकात बोलणारा पालकमंत्री नको. ठोस निर्णय घेणारा पालकमंत्री असता तर आजचा हा प्रश्न नक्कीच निकाली निघाला असता, असा टोलाही नारायण राणे यांनी पालकमंत्री केसरकर यांना लगावला.