शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार

By admin | Updated: March 7, 2016 00:38 IST

नारायण राणे : आंदोलनकर्त्या डंपर व्यावसायिकांची घेतली भेट; पोलिसांनी केलेला लाठीचार्ज चुकीचा

सिंधुदुर्गनगरी : वाळु वाहतुकीसंदर्भात आमचे सरकार असताना पाच हजार दंड होता. आता या युती सरकारच्या काळात लाखो रूपयांचा दंड आकारण्यात येत असून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज होणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, आंदोलनकर्त्यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन मी सुरूच ठेवणार आहे, असा इशारा काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आंदोलनकर्त्यांशी भेटी दरम्यान चर्चा करताना दिला दिला. नाकात बोलण्यापेक्षा ठोस निर्णय घेणारा पालकमंत्री असता तर आजचा हा प्रश्न नक्कीच निकाली निघाला असता, असा टोलाही राणे यांनी पालकमंत्री केसरकर यांना लगावला.सिंधुदुर्गनगरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर चालक-मालक व्यावसायिकांचे तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच असून या आंदोलनस्थळी दुपारी ३ वाजता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा करीत प्रशासनाने केलेल्या कारवाई विरोधात नाराजी व्यक्त केली.यावेळी आंदोलनकर्ते संजय पडते व इतरांनी राणे यांना प्रशासन मोठ्या प्रमाणात वाळू व डंपर व्यावसायिकांना त्रास देत असून मोठ्या प्रमाणात दंडाची आकारणी, तसेच डंपर जप्त करीत असून अगोदरच कर्जबाजारी असलेल्या डंपर व्यावसायिकांना त्रास देण्याचे काम हे प्रशासन करीत आहे असे सांगितले.यावर बोलताना राणे म्हणाले की, आमचे सरकार असताना पाच हजार दंड होता तसेच किमान व कमाल अशी दंड आकारणीवर मर्यादा होती. म्हणजे तीन पटाच्या वरती दंड आकारणी करण्यात येत नव्हती. आता या सरकारने तीनऐवजी पाचपट दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याला जबाबदार कोण आहे ते तुम्हीच ठरवा. सत्ताधारी आमदाराला पोलीस लाठीमार करतात, येथील जनतेला लाठीमार होतो, जिल्हाधिकारी तुम्हाला भेट देत नाही तुमचे म्हणणे ऐकून घेत नाही. या सर्व आजच्या स्थितीला सत्ताधिकारी, लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत असे त्यांनी सांगितले. काही जण मार खाऊन मुंबईला गेले असून मुख्यमंत्र्यांची भेट घेत आयुक्तांची कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे हा प्रश्न सुटणार आहे का? ते नेमके काय करतात हेच नेमके समजत नाही असाही टोला त्यांनी येथील सत्ताधारी लोकप्रतिनिधींना लगावला. तर भाजपचे पदाधिकारी माधव भंडारी यांनी काँग्रेसने गुंड आणल्याचे सांगितले. हे त्यांचे विधान चुकीचे असून आम्ही जनतेला न्याय मिळण्यासाठी लढतच राहणार आहोत. मी पालकमंत्री असताना ही परिस्थिती या जिल्ह्यात नव्हती. येथील प्रशासनावर वचक होती मात्र आताच्या या सत्ताधिकारी लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकारी ऐकत नाही. या प्रश्नासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोललो असून यावर योग्य तो निर्णय घ्यायला लावणार आहे. येथे सुरू असलेल्या आंदोलनात मी पक्षीय राजकारण आणणार नाही. हे व्यावसायिक माझ्या जिल्ह्यातील असून त्यांच्यावर लाठीचार्ज केला, रक्त काढले. त्यामुळे माझ्या या जनतेला न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन मी सुरूच ठेवणार आहे असा इशाराही त्यांनी दिला.(प्रतिनिधी)राणेंचा टोला : नाकात बोलणारा पालकमंत्री नकोसध्याचे पालकमंत्री हे नाकात बोलणारे असून काही कामाचे नाहीत, अशी टीका पालकमंत्र्यांवर करीत आम्हाला नाकात बोलणारा पालकमंत्री नको. ठोस निर्णय घेणारा पालकमंत्री असता तर आजचा हा प्रश्न नक्कीच निकाली निघाला असता, असा टोलाही नारायण राणे यांनी पालकमंत्री केसरकर यांना लगावला.