शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

हागणदारी मुक्तीनंतर जिल्हा प्लास्टिकमुक्ती

By admin | Updated: October 18, 2015 00:23 IST

संदेश सावंत यांची घोषणा : सावंतवाडीत लोकोत्सव उत्साहात

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त झाल्यानंतर आता आम्हाला प्लास्टिकमुक्त जिल्हा करायचा आहे, अशी घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी केली. सावंतवाडी पंचायत समितीने आयोजित केलेला लोकोत्सव जिल्ह्यात उत्कृष्ट झाला असून, आपली आता जबाबदारी वाढली असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग, उपसभापती रणजित देसाई, सभापती प्रमोद सावंत, आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, माजी सभापती प्रमोद कामत, प्रियंका गावडे, उपसभापती महेश सारंग, गटविकास अधिकारी मोहन भोई, अलिबागचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा परिषद सदस्या रिटा अल्फान्सो, वृंदा सारंग, गजानन पालयेकर, प्रकाश कवठणकर, पुनाजी राऊळ, पंचायत समिती सदस्य अशोक दळवी, राघोबा सावंत, लाडोबा केरकर, स्वप्निल नाईक, रोहिणी गावडे, श्वेता कोरगावकर, गौरी आरोंदेकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यात सावंतवाडी तालुका हागणदारीमुक्त झाल्यानिमित्त सावंतवाडी शहरातून भव्य अशी रॅली काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने चित्ररथ सहभागी झाले होते. या रॅलीचे विसर्जन बॅ. नाथ पै सभागृहात पार पडल्यानंतर तेथे लोकोत्सव पार पडला. यावेळी अध्यक्ष संदेश सावंत व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत तसेच सरपंच व ग्रामसेवक यांना गौरविण्यात आले. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी शेखर सिंग यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच आता यापुढे हागणदारीमुक्त जिल्हा यामुळे आपली सर्वांची जबाबदारी वाढली असून, एकत्रितपणे प्रयत्न करून हागणदारीमुक्त जिल्हा केला तसा तो यापुढे टिकवा, असे आव्हान त्यांनी केले. संदेश सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त झाला याची साक्ष जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मिळत आहे. सिंधुदुर्गचा महाराष्ट्रातही गौरव झाला असून, हा गौरव टिकवण्याचे काम प्रत्येक तालुक्याचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त झाला तसा तो प्लास्टिकमुक्त करूया, असे आव्हानही यावेळी सावंत यांनी केले. लोकोत्सव कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती प्रमोद सावंत यांनी केले. यावेळी माजी सभापती प्रमोद कामत, ओवळिये सरपंच गजानन सावंत, माडखोल सरपंच अनिता राऊळ, उपाध्यक्ष रणजित देसाई आदींनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पेडणेकर यांनी केले. तालुक्यातून अनेक ग्रामपंचायतीनी खास चित्ररथ तयार केले होते. त्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी) शिवसेनेच्या गटनेत्याच्या भाषणावर गदा सावंतवाडी पंचायत समितीत काँग्रेसची सत्ता असून लोकोत्सवाच्या कार्यक्रमावर पूर्णपणे काँग्रेसचाच प्रभाव असल्याचे दिसून येत होते. शिवसेनेला व्यासपीठावर बसवले; मात्र एकाही सदस्याला बोलण्यास देण्यात आले नाही. शिवसेनेचे गटनेते अशोक दळवी यांचे भाषणासाठी नाव घेतले. मात्र, सभापतींनी त्यांना तेथेच थांबवत प्रमोद कामत यांना भाषण करण्यास सांगितले. यावेळी दळवींची नाराजी स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसत होती.