शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

शेतकऱ्यांना वृक्षांच्या तोडीनंतर वाहतूक पास द्याव

By admin | Updated: March 12, 2015 00:04 IST

प्रमोद जठार : ‘ती’ अट रद्द करण्याची उपवनसंरक्षकांकडे मागणीे

सावंतवाडी : जिल्ह्यातील मालकी वृक्षाच्या तोडीनंतरच्या वाहतूक प्रकरणी लागू केलेल्या २५/२ दाखल्याच्या अटी तत्काळ रद्द करा. या दाखल्याच्या अटीमुळे शेतकऱ्यांनी तोडलेली झाडे पावसामध्ये कुजून जात आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे या दाखल्याच्या अटी रद्द करून तोडलेल्या झाडांची वाहतूक परवाने पास देण्याची मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी व जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी उपवनसरंक्षक एस. रमेशकुमार यांच्याजवळ बुधवारी केली. यावर उपवनसंरक्षक रमेशकुमार यांनी दोन शेतकऱ्यांचे वाहतूक पास व लागू केलेल्या २५/२ दाखल्याच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा करून १३ मार्च रोजी यावर अंतिम निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, मंगेश तळवणेकर, बळीराम सावंत, सुरेश सावंत, शकील शेख व शेतकरी उपस्थित होते. खासगी मालकी क्षेत्रातील निबंधित अधिसूचित वृक्षतोड करण्यासाठी महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९८४ नुसार वृक्ष अधिकारी यांच्याकडून परवानगी दिली जाते. तसेच जिवंत नदीनाल्यापासून ३० मीटर अंतरावरील अति उतारावरील, तसेच एकटी २० झाडे राखून न ठेवता वृक्षतोड करावयाची असल्यास महाराष्ट्र महसूल अधिनियम तरतुदीनुसार महसूल विभागाकडील परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु निर्बंधक किंवा अनिर्बंधित झाडांची तोड जिवंत नदीनाल्यापासून ३० मीटरच्या आत व्यावसायिक करीत नाहीत. शेतकऱ्यांनी यापूर्वी केलेल्या वृक्षतोडीबाबत एकही तक्रार वनविभाग किंवा महसूल विभाग यांच्याजवळ नाही, असे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्पष्ट केले. तर तोडलेल्या झाडांसाठी तत्काळ वाहतूक पास द्या. अन्यथा येथून हलणार नाही, असा पवित्रा प्रमोद जठारांसह सर्व शेतकऱ्यांनी घेतला. यावर उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तत्काळ दोन शेतकऱ्यांना वाहतूक परवाने दिले. तर इतर शेतकऱ्यांच्या परवान्यांसंदर्भात दोन दिवसात वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)