शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

शेतकऱ्यांना वृक्षांच्या तोडीनंतर वाहतूक पास द्याव

By admin | Updated: March 12, 2015 00:04 IST

प्रमोद जठार : ‘ती’ अट रद्द करण्याची उपवनसंरक्षकांकडे मागणीे

सावंतवाडी : जिल्ह्यातील मालकी वृक्षाच्या तोडीनंतरच्या वाहतूक प्रकरणी लागू केलेल्या २५/२ दाखल्याच्या अटी तत्काळ रद्द करा. या दाखल्याच्या अटीमुळे शेतकऱ्यांनी तोडलेली झाडे पावसामध्ये कुजून जात आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे या दाखल्याच्या अटी रद्द करून तोडलेल्या झाडांची वाहतूक परवाने पास देण्याची मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी व जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी उपवनसरंक्षक एस. रमेशकुमार यांच्याजवळ बुधवारी केली. यावर उपवनसंरक्षक रमेशकुमार यांनी दोन शेतकऱ्यांचे वाहतूक पास व लागू केलेल्या २५/२ दाखल्याच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा करून १३ मार्च रोजी यावर अंतिम निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, मंगेश तळवणेकर, बळीराम सावंत, सुरेश सावंत, शकील शेख व शेतकरी उपस्थित होते. खासगी मालकी क्षेत्रातील निबंधित अधिसूचित वृक्षतोड करण्यासाठी महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९८४ नुसार वृक्ष अधिकारी यांच्याकडून परवानगी दिली जाते. तसेच जिवंत नदीनाल्यापासून ३० मीटर अंतरावरील अति उतारावरील, तसेच एकटी २० झाडे राखून न ठेवता वृक्षतोड करावयाची असल्यास महाराष्ट्र महसूल अधिनियम तरतुदीनुसार महसूल विभागाकडील परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु निर्बंधक किंवा अनिर्बंधित झाडांची तोड जिवंत नदीनाल्यापासून ३० मीटरच्या आत व्यावसायिक करीत नाहीत. शेतकऱ्यांनी यापूर्वी केलेल्या वृक्षतोडीबाबत एकही तक्रार वनविभाग किंवा महसूल विभाग यांच्याजवळ नाही, असे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्पष्ट केले. तर तोडलेल्या झाडांसाठी तत्काळ वाहतूक पास द्या. अन्यथा येथून हलणार नाही, असा पवित्रा प्रमोद जठारांसह सर्व शेतकऱ्यांनी घेतला. यावर उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तत्काळ दोन शेतकऱ्यांना वाहतूक परवाने दिले. तर इतर शेतकऱ्यांच्या परवान्यांसंदर्भात दोन दिवसात वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)