शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकऱ्यांना वृक्षांच्या तोडीनंतर वाहतूक पास द्याव

By admin | Updated: March 12, 2015 00:04 IST

प्रमोद जठार : ‘ती’ अट रद्द करण्याची उपवनसंरक्षकांकडे मागणीे

सावंतवाडी : जिल्ह्यातील मालकी वृक्षाच्या तोडीनंतरच्या वाहतूक प्रकरणी लागू केलेल्या २५/२ दाखल्याच्या अटी तत्काळ रद्द करा. या दाखल्याच्या अटीमुळे शेतकऱ्यांनी तोडलेली झाडे पावसामध्ये कुजून जात आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे या दाखल्याच्या अटी रद्द करून तोडलेल्या झाडांची वाहतूक परवाने पास देण्याची मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी व जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी उपवनसरंक्षक एस. रमेशकुमार यांच्याजवळ बुधवारी केली. यावर उपवनसंरक्षक रमेशकुमार यांनी दोन शेतकऱ्यांचे वाहतूक पास व लागू केलेल्या २५/२ दाखल्याच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा करून १३ मार्च रोजी यावर अंतिम निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, मंगेश तळवणेकर, बळीराम सावंत, सुरेश सावंत, शकील शेख व शेतकरी उपस्थित होते. खासगी मालकी क्षेत्रातील निबंधित अधिसूचित वृक्षतोड करण्यासाठी महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९८४ नुसार वृक्ष अधिकारी यांच्याकडून परवानगी दिली जाते. तसेच जिवंत नदीनाल्यापासून ३० मीटर अंतरावरील अति उतारावरील, तसेच एकटी २० झाडे राखून न ठेवता वृक्षतोड करावयाची असल्यास महाराष्ट्र महसूल अधिनियम तरतुदीनुसार महसूल विभागाकडील परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु निर्बंधक किंवा अनिर्बंधित झाडांची तोड जिवंत नदीनाल्यापासून ३० मीटरच्या आत व्यावसायिक करीत नाहीत. शेतकऱ्यांनी यापूर्वी केलेल्या वृक्षतोडीबाबत एकही तक्रार वनविभाग किंवा महसूल विभाग यांच्याजवळ नाही, असे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्पष्ट केले. तर तोडलेल्या झाडांसाठी तत्काळ वाहतूक पास द्या. अन्यथा येथून हलणार नाही, असा पवित्रा प्रमोद जठारांसह सर्व शेतकऱ्यांनी घेतला. यावर उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तत्काळ दोन शेतकऱ्यांना वाहतूक परवाने दिले. तर इतर शेतकऱ्यांच्या परवान्यांसंदर्भात दोन दिवसात वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)