शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

संधीचा फायदा जनतेसाठी

By admin | Updated: December 17, 2014 22:54 IST

दिनेश साळगावकर : पक्षबांधणीसाठी काम करणार

कुडाळ : काहीजणांच्या मते कुडाळ तालुका काँगे्रसचे तालुकाध्यक्षपद हे जरी काटेरी मुकुट असले, तरी माझ्या मते तो काटेरी मुकुट नसून मला मिळालेली संधी आहे. या संधीचा फायदा मी जनतेसाठी व पक्षबांधणीसाठी करणार असल्याचे वक्त व्य काँगे्रसचे नूतन तालुकाध्यक्ष दिनेश साळगावकर यांनी केले. यापुढे निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. काँगे्रसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कुडाळ तालुका काँग्रेसच्या नूतन तालुकाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनेश साळगावकर यांची निवड केली. तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर साळगावकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेसचे संजय पडते, अस्मिता बांदेकर, आनंद शिरवलकर, विकास कुडाळकर, माजी तालुकाध्यक्ष प्र्रकाश मोर्ये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, प्रसाद पोईपकर, राकेश कांदे आदी उपस्थित होते. यावेळी साळगावकर म्हणाले, लोकसभा व विधानसभेतील पराभवामुळे आम्ही १० वर्षे मागे आलो असून पुन्हा शुन्यातून सुरुवात करणार आहोत. ही सुरुवात करताना जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून पक्षसंघटना मजबूत करणार आहोत. पक्षाचे आणि आमचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी व कुडाळातील पदाधिकारी व नेते या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून माझ्यावर जी जबाबदारी सोपविली आहे, ती सर्वांना बरोबर घेऊन समर्थपणे पेलणार आहे, असा विश्वास साळगावकर यांनी व्यक्त केला. या तालुक्यातील आकारीपड, वनसंज्ञा, हत्तीप्रश्न तसेच इतर प्रश्न समस्यांबाबत सत्ताधाऱ्यांकडून योग्य न्याय न मिळाल्यास वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा यावेळी दिनेश साळगावकर यांनी दिला. (प्रतिनिधी)स्थानिक स्वराज्य संस्थेत आमचीच सत्ताजिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्ह्यातील ८० टक्के ग्रामपंचायतींवर आमचीच सत्ता असून याचा उपयोग जनतेच्या विकासासाठी करणार असल्याचे साळगावकर यांनी सांगितले. चतुर्थी सणात धूप, अगरबत्ती वाटून जनेतला भावनिक बंधनात टाकून विजय मिळविणारे आमदार वैभव नाईक हत्तीप्रश्नी गप्प का, असा सवाल साळगावकर यांनी उपस्थित केला. सत्ताधारी भाजप पक्ष विकासाच्या बढाया मारीत असून विकास कोणता करणार, ते मात्र अजून उघड केलेले नाही. त्यामुळे त्यांनी बढाया मारू नये.या जिल्ह्यात विकास फक्त नारायण राणे यांनीच केला असून त्यांनी केलेला विकास टिकविण्याचे कामच सत्ताधाऱ्यांनी करून दाखवावे.