शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

शेतकऱ्यांच्या धोरणात मच्छिमारांना सामावून घ्या

By admin | Updated: June 4, 2017 01:36 IST

राजन तेली : मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी

सावंतवाडी : शेतकऱ्यांसाठी शासनाने जे धोरण अवलंबिले आहे, त्यात जिल्ह्यातील मच्छिमारांनासुद्धा सामावून घेण्यात यावे. त्यांना शीतगृह, कर्जमाफी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात येणार असल्याचे भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले.शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर मुख्यमंंत्र्यांच्या शेतकऱ्यांसोबत शुक्रवारी रात्री झालेल्या चर्चेत अतिमहत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना ३१ आॅक्टोबरपूर्वी कर्जमाफी देण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा यासाठी जूनमध्ये अधिवेशनात नवीन कायदा केला जाईल. शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दरात जो व्यापारी माल घेईल त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय या बैठकीत झाला.ज्या शेतकऱ्यांना वाढीव वीजबिले आली त्यांचा पुनर्विचार केला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांची थकित वीजबिले माफ करण्यात येणार असल्याचे मुुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केल्याची माहिती तेली यांनी दिली. शेतकऱ्यांचा माल वाया जाऊ नये यासाठी शीतगृहाची साखळी निर्माण करण्यात येणार आहे. गोडाऊन व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच नाशिवंत मालासाठी प्रक्रिया उद्योग राबविण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत झाला.