शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जलसमाधीचा निर्णय स्थगित; आंदोलन सुरूच

By admin | Updated: April 20, 2015 00:22 IST

तिलारी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न : झटापटीनंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविले

कसई दोडामार्ग : पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन धुडकावून लावत तिलारी धरणग्रस्तांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता; मात्र पोलिसांनी अडविल्यामुळे जलसमाधीचा निर्णय स्थगित केला. यावेळी पोलीस व आंदोलनकर्त्यांत काहीकाळ झटापटही झाली. यानंतर आंदोलन सुरूच ठेवून शासन निर्णयाची वाट पाहणार व त्यानंतर पुन्हा जलसमाधीचा निर्णय घेऊ, असा इशारा रविवारी आंदोलनकर्त्यांनी दिला. तिलारी प्रकल्पग्रस्तांची वनटाईम सेटलमेंट रक्कम न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांनी बुधवारपासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली होती. रविवारी आंदोलनाचा पाचवा दिवस होता. प्रकल्पग्रस्त आपल्या मागणीसाठी जलसमाधी घेणार, या निर्णयावर ठाम राहिल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. दुपारी ग्रामविकास, वित्तमंत्री व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट देऊन चर्चा केली. गोवा राज्याने वनटाईम सेटलमेंटची तरतूद केली आहे. महाराष्ट्र शासनाकडे तुमचा प्रस्ताव ठेवला आहे. उद्या, मंगळवारी मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीमध्ये वनटाईम सेटलमेंटच्या रकमेबाबत अंतिम निर्णय घेऊन महिन्याच्या आत जीआर काढून रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री केसरकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. दरम्यान, याआधीही केसरकर यांनी आश्वासने दिली होती. त्यामुळे आंदोलनाचे नेते संजय नाईक यांनी आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा घेतला. तत्पूर्वी आंदोलनकर्ते ‘आम्हाला न्याय द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत जलसमाधी घेण्यासाठी जाऊ लागले, तेव्हा पोलिसांनी त्यांना साखळी करून अडवून ठेवले. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन झटापटही झाली. पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी यांनी प्रकल्पग्रस्तांना सुनावले की, तुम्ही कायदा हातात घेतला, तर आम्हालाही कायदा हातात घेऊन अटक करावी लागेल, असे सुनावले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवून जलसमाधीचा निर्णय स्थगित केला, परंतु उद्यापर्यंत निर्णय न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा संजय नाईक यांनी दिला. (वार्ताहर)