शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

प्रशासनाला अतिरिक्त कामाचे ‘शासन’

By admin | Updated: February 18, 2015 23:48 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला..

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयातही क आणि ड संवर्गातील रिक्त पदांची समस्या सतावत असून, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. क संवर्गातील एकूण ९३० मंजूर पदांपैकी ८५६ पदे भरण्यात आली असून, ७४ पदे अद्याप रिक्त आहेत. तर ड संवर्गातील एकूण ५६३ मंजूर पदांपैकी ३२२ पदे भरण्यात आली असून, तब्बल २०२ पदे अद्याप रिक्तच आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध तालुक्याच्या ठिकाणाहून तसेच ग्रामीण भागातून अनेक नागरिक विविध कामांसाठी येत असतात. मात्र, या कार्यालयात क व ड श्रेणी कर्मचाऱ्यांची विविध मंजूर पदे आहेत, त्याच्यापेक्षा कितीतरी पदे रिक्त आहेत. त्यामुळे, आहे त्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा भार उचलावा लागत आहे. याचा परिणाम काही नागरिकांच्या कामावरही होत आहे. त्यातच हे जिल्ह्याचे प्रमुख कार्यालय असल्याने, विविध मंत्र्यांचे दौरे, विविध कार्यक्रम, प्रशिक्षणे सातत्याने होत असतात. त्यामुळे, आहे त्याच कर्मचाऱ्यांना ही सर्व कामे निभावून न्यावी लागतात. परिणामी आहे तीच कामे या कर्मचाऱ्यांना भारी पडत असतानाच, रिक्त पदांचा भारही सोसावा लागत आहे. त्यातच बदली, पदोन्नतीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांची आधीची पदे रिक्त राहतात. या रिक्त पदी नियुक्ती लवकर केली जात नसल्याने आहे त्याच कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामाचा डोलारा सांभाळावा लागतो. त्यामुळे नागरिकांच्या कामांना विलंब होत आहे. तलाठी, लिपीक-टंकलेखक यांच्याच रिक्त पदांची संख्या जास्त आहे. तर ड संवर्गातील कोतवाल आणि स्वच्छक ही पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत.या कार्यालयात काही प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तर काही सेवानिवृत्त होत आहेत. या महिन्यांनी इतर विभागातील काही प्रमुखही सेवानिवृत्त होणार आहेत. मात्र, शासनाच्या धोरणामुळे झालेल्या रिक्त पदाचा कोटा भरण्यास विलंब होतो. विधानसभा निवडणूक आॅक्टोबरमध्ये झाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी यांची बदली पालगड (कोकणातील नवनिर्वाचित जिल्हा) येथे झाली. त्यांच्या पदाचा तात्पुरता कार्यभार महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी नीता सावंत - शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, याला आता अनेक महिन्याचा कालावधी उलटूनही अद्याप जिल्हा पुरवठा अधिकारी पद रिक्त आहे.तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी नंदकुमार जाधव नोव्हेंबरअखेर सेवानिवृत्त झाले असले, तरी अजूनही हे पद भरले गेलेले नाही. या विभागाची जबाबदारी सध्या पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी नितीन राऊत यांच्याकडे देण्यात आलेली आहे. जनतेची कामे या रिक्त पदांमुळे खोळंबली जात आहेत. जनतेला एका कामासाठी वारंवार खेटे मारावे लागतात. त्यामुळे, वेळबरोबरच पैशाचाही अपव्यय होत आहे. शासन ही पदे भरण्याबाबत उदासीनता का दाखवत आहे, असा सवाल नागरिकांमधून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)कर्मचारी वैतागले...निवडणूक काळात तर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची खूपच ओढाताण होते. कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी हे अतिरिक्त काम वाढत असल्याने सेवेच्या आठ तासांच्या पलिकडेही जादा काम करावे लागत होते. त्यामुळे रिक्त पदांचा भार विनाकरण कार्यरत कर्मचाऱ्यांना सोसावा लागत होता.मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदेक संवर्गातील कर्मचारीपदेमंजूरभरलेलीरिक्तलघुलेखक(उच्च श्रेणी)११०लघुलेखक(निवड श्रेणी)७५२अव्वल कारकून १७२१६७५मंडळ अधिकारी ७०६५५लिपीक -टंकलेखक २६०२२२३८तलाठी ३९९३७५२४लघुटंकलेखक२२०वाहन चालक१९१९०राजापूूर ५१३९७०९एकूण९३०८५६७४ड संवर्गातील कर्मचारी(शिपाई, पहारेकरी)पदेमंजूरभरलेलीरिक्तस्वच्छक, हमाल कम स्वीपर१५५१२९२६नाईक१४१७०कोतवाल३९४२१८१७६