शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सुनील घाडीगावकरांवरील कारवाई निषेधार्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 17:54 IST

मालवण पंचायत समितीत आमचे नेतृत्व करणाºया घाडीगावकर यांची प्रशासनाने केलेली नाहक बदमानी राजकीय द्वेषापोटी केली आहे, असा आरोप करत आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली कारवाई निषेधार्ह आहे, अशी भूमिका पंचायत समिती सदस्य राजू परुळेकर व अजिंक्य पाताडे यांनी मांडली.

ठळक मुद्देराजू परुळेकर यांनी घेतला निषेधाचा ठराव मालवण पंचायत समिती मासिक सभारेंज नसताना उदघाटन कशासाठी ? उपसभापती आक्रमक

मालवण,28  : पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगावकर यांच्यावर राजकीय आकसापोटी जिल्हा पुरवठा विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. घाडीगावकर यांचे दारिद्र्यरेषेखाली यादीत नाव नसतानाही काही राजकीय व्यक्तींनी पदाचा वापर करून कारवाई करण्याबाबत अधिकाºयांवर दबाव आणला. पंचायत समितीत आमचे नेतृत्व करणाºया घाडीगावकर यांची प्रशासनाने केलेली नाहक बदमानी राजकीय द्वेषापोटी केली आहे, असा आरोप करत आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली कारवाई निषेधार्ह आहे, अशी भूमिका पंचायत समिती सदस्य राजू परुळेकर व अजिंक्य पाताडे यांनी मांडली.

सुनील घाडीगावकर यांनी २००२ पूर्वी दारिद्र्यरेषेखाली नाव यादीतून कमी करण्यास सांगितले होते. त्यानुसार झालेल्या २००२ व २००५ च्या सर्व्हेत त्यांचे नाव कमीही करण्यात आले होते. असे असताना अधिकाºयांना पाठीशी घालून निवडणुका डोळ्यासमोर कारवाई करण्यात आली आहे.

जनतेने आम्हाला निवडून दिले असून आम्ही गरिबांच्या कल्याणासाठी पुढाकार घेतो. घाडीगावकर यांनी धान्य उचल केली नसतानाही पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे त्यांच्यावर राजकीय आकसापोटी कारवाई करण्यात आल्याने निषेधाचा ठराव घेण्याची सूचना परुळेकर यांनी केली.

मालवण पंचायत समिती येथील छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती मनीषा वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. यावेळी उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सदस्य अजिंक्य पाताडे, विनोद आळवे, राजू परुळेकर, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, गायत्री ठाकूर, सागरिका लाड तसेच विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

यावेळी मधुरा चोपडेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. पर्यटन हंगाम सुरु झाला असतानाही देवबाग मार्गावर रस्त्यात खड्डे आहे. झाडीही दुर्तफा वाढली आहे. दिवाळीपूर्वी झाडी तोडण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी तालुक्यातील खड्डे बुजविण्यास प्राधान्य दिले असून त्यानंतर झाडी तोडण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.

वायरी-देवबाग मार्गावर पर्यटन हंगामात वाहतूक कोंडी तसेच पर्यटकांकडून धिंगाणा केला जातो, त्यामुळे या मार्गावर पोलीस नियुक्त करावा, अशी सूचना मांडली. यावेळी गटविकास अधिकारी पराडकर यांनी पोलीस प्रशासनाला पेट्रोलिंगसाठी पोलीस तैनात करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे स्पष्ट केले.

रेंज नसताना उदघाटन कशासाठी ?तालुक्यातील वायंगवडे येथील दूरसंचारच्या टॉवरचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. मात्र टॉवरला अद्यापही रेंज नाही. ग्राहकांना रेंज मिळत नसेल तर उदघाटन करण्याची घाई कशासाठी केली, असा सवाल अजिंक्य पाताडे यांनी उपस्थित केला. यावेळी दूरसंचारच्या अधिकाºयांनी उदघाटनाचा कार्यक्रम शासकीय होता, अशी सारवासारव करताना रेंज नोव्हेंबरपर्यंत सुरळीत होईल, असे स्पष्ट केले.

यावेळी परुळेकर व पाताडे यांनी टॉवर उभारणीसाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा केला होता. मात्र प्रॉटोकॉलनुसार बोलावण्यात न आल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी गटविकास अधिकाºयांनी केंद्र सरकारचे नियम, प्रोटोकॉल वेगळे असतात, असे सांगितले.

उपसभापती आक्रमक

उपसभापती अशोक बागवे यांनी अवजड वाहनासाठी बंद असलेले कोळंब पूल, आचरा विभागातील वीज अधिकाºयांना धारेवर धरले. कोळंब पूल धोकादायक आहे, असे सांगून गेले काही महिने नागरिकांना आर्थिक भुर्दंड होत आहे. तसेच या मार्गावरून एसटी वाहतूकही बंद असल्याने बांधकाम विभागाच्या कर्मामुळे एसटीचे भारमान कमी झाले आहे. नागरिकांना होणारा त्रास व एसटीचे बुडालेले भारमानाला बांधकाम विभाग जबाबदार आहे, असा आरोप बागवे करत प्रवासी वाहतुकीसाठी पूल खुला करावा, अशा सूचना केल्या.

यावेळी बांधकामाचे अधिकारी प्रकाश चव्हाण यांनी कोळंब पूल धोकादायक बनल्याने जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलाच्या कामासाठी फेरनिविदा काढण्यात आली आहे, असे स्पष्ट केले. तर आचरा विभागात विजेच्या समस्या कायम असून अधिकाºयांना कामे करायची मानसिकता नसेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत, अशी भूमिका मांडली.