शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

सुनील घाडीगावकरांवरील कारवाई निषेधार्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 17:54 IST

मालवण पंचायत समितीत आमचे नेतृत्व करणाºया घाडीगावकर यांची प्रशासनाने केलेली नाहक बदमानी राजकीय द्वेषापोटी केली आहे, असा आरोप करत आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली कारवाई निषेधार्ह आहे, अशी भूमिका पंचायत समिती सदस्य राजू परुळेकर व अजिंक्य पाताडे यांनी मांडली.

ठळक मुद्देराजू परुळेकर यांनी घेतला निषेधाचा ठराव मालवण पंचायत समिती मासिक सभारेंज नसताना उदघाटन कशासाठी ? उपसभापती आक्रमक

मालवण,28  : पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगावकर यांच्यावर राजकीय आकसापोटी जिल्हा पुरवठा विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. घाडीगावकर यांचे दारिद्र्यरेषेखाली यादीत नाव नसतानाही काही राजकीय व्यक्तींनी पदाचा वापर करून कारवाई करण्याबाबत अधिकाºयांवर दबाव आणला. पंचायत समितीत आमचे नेतृत्व करणाºया घाडीगावकर यांची प्रशासनाने केलेली नाहक बदमानी राजकीय द्वेषापोटी केली आहे, असा आरोप करत आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली कारवाई निषेधार्ह आहे, अशी भूमिका पंचायत समिती सदस्य राजू परुळेकर व अजिंक्य पाताडे यांनी मांडली.

सुनील घाडीगावकर यांनी २००२ पूर्वी दारिद्र्यरेषेखाली नाव यादीतून कमी करण्यास सांगितले होते. त्यानुसार झालेल्या २००२ व २००५ च्या सर्व्हेत त्यांचे नाव कमीही करण्यात आले होते. असे असताना अधिकाºयांना पाठीशी घालून निवडणुका डोळ्यासमोर कारवाई करण्यात आली आहे.

जनतेने आम्हाला निवडून दिले असून आम्ही गरिबांच्या कल्याणासाठी पुढाकार घेतो. घाडीगावकर यांनी धान्य उचल केली नसतानाही पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे त्यांच्यावर राजकीय आकसापोटी कारवाई करण्यात आल्याने निषेधाचा ठराव घेण्याची सूचना परुळेकर यांनी केली.

मालवण पंचायत समिती येथील छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती मनीषा वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. यावेळी उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सदस्य अजिंक्य पाताडे, विनोद आळवे, राजू परुळेकर, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, गायत्री ठाकूर, सागरिका लाड तसेच विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

यावेळी मधुरा चोपडेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. पर्यटन हंगाम सुरु झाला असतानाही देवबाग मार्गावर रस्त्यात खड्डे आहे. झाडीही दुर्तफा वाढली आहे. दिवाळीपूर्वी झाडी तोडण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी तालुक्यातील खड्डे बुजविण्यास प्राधान्य दिले असून त्यानंतर झाडी तोडण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.

वायरी-देवबाग मार्गावर पर्यटन हंगामात वाहतूक कोंडी तसेच पर्यटकांकडून धिंगाणा केला जातो, त्यामुळे या मार्गावर पोलीस नियुक्त करावा, अशी सूचना मांडली. यावेळी गटविकास अधिकारी पराडकर यांनी पोलीस प्रशासनाला पेट्रोलिंगसाठी पोलीस तैनात करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे स्पष्ट केले.

रेंज नसताना उदघाटन कशासाठी ?तालुक्यातील वायंगवडे येथील दूरसंचारच्या टॉवरचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. मात्र टॉवरला अद्यापही रेंज नाही. ग्राहकांना रेंज मिळत नसेल तर उदघाटन करण्याची घाई कशासाठी केली, असा सवाल अजिंक्य पाताडे यांनी उपस्थित केला. यावेळी दूरसंचारच्या अधिकाºयांनी उदघाटनाचा कार्यक्रम शासकीय होता, अशी सारवासारव करताना रेंज नोव्हेंबरपर्यंत सुरळीत होईल, असे स्पष्ट केले.

यावेळी परुळेकर व पाताडे यांनी टॉवर उभारणीसाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा केला होता. मात्र प्रॉटोकॉलनुसार बोलावण्यात न आल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी गटविकास अधिकाºयांनी केंद्र सरकारचे नियम, प्रोटोकॉल वेगळे असतात, असे सांगितले.

उपसभापती आक्रमक

उपसभापती अशोक बागवे यांनी अवजड वाहनासाठी बंद असलेले कोळंब पूल, आचरा विभागातील वीज अधिकाºयांना धारेवर धरले. कोळंब पूल धोकादायक आहे, असे सांगून गेले काही महिने नागरिकांना आर्थिक भुर्दंड होत आहे. तसेच या मार्गावरून एसटी वाहतूकही बंद असल्याने बांधकाम विभागाच्या कर्मामुळे एसटीचे भारमान कमी झाले आहे. नागरिकांना होणारा त्रास व एसटीचे बुडालेले भारमानाला बांधकाम विभाग जबाबदार आहे, असा आरोप बागवे करत प्रवासी वाहतुकीसाठी पूल खुला करावा, अशा सूचना केल्या.

यावेळी बांधकामाचे अधिकारी प्रकाश चव्हाण यांनी कोळंब पूल धोकादायक बनल्याने जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलाच्या कामासाठी फेरनिविदा काढण्यात आली आहे, असे स्पष्ट केले. तर आचरा विभागात विजेच्या समस्या कायम असून अधिकाºयांना कामे करायची मानसिकता नसेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत, अशी भूमिका मांडली.