शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

‘त्या’ मुख्याध्यापकावर कारवाई झालीच पाहिजे

By admin | Updated: December 15, 2015 23:26 IST

गुरूनाथ पेडणेकर : जिल्हा परिषद शिक्षण समिती सभेत शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश

सिंधुदुर्गनगरी : शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी प्रशासकीय चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या तळवडे येथील श्री जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापकावरील कारवाईला स्थगिती द्यावी या आशयाचे लेखी आदेश पालकमंत्र्यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला दिले असून ही बाब अतिशय गंभीर आहे. असे सांगत पालकमंत्री दोषी मुख्याध्यापकाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या या आदेशाला शिक्षण विभागाने बळी न पडता मुख्याध्यापकावर कारवाई केलीच पाहिजे असे आदेश शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांना दिले.जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक सभा सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य सुकन्या नरसुले, सुषमा कोदे, विभावरी खोत, वैशाली रावराणे, स्वीकृत सदस्य संजय बगळे, फादर लोबो, समिती सचिव तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री जनता विद्यालयातील मुख्याध्यापक प्रशासकीय चौकशीत दोषी आढळला आहे. अशा दोषींवर कारवाई होणे योग्य असताना पालकमंत्री दीपक केसरकर मात्र त्याला पाठिशी घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी शिक्षण विभागात लेखी पत्राद्वारे आदेश काढत मुख्याध्यापकावरील कारवाईला स्थगिती द्यावी असे त्यात नमूद केले आहे. ही बाब गंभीर असून मुख्याध्यापकावर कारवाईही होणारच आणि त्यासाठी शिक्षण विभागाने तशी कार्यवाही करावी असे आदेश पेडणेकर यांनी दिले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विविध स्पर्धांबाबतच्या ‘ती’ अट रद्द करा, अशी मागणी सदस्य संजय बगळे यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)४०० शाळांमध्ये ई-लर्निंग प्रकल्प राबवाजिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४६८ शाळांपैकी केवळ ४ शाळांमध्ये ई-लर्निंग प्रोजेक्ट राबविला जात आहे. त्यामुळे पुढील काळात किमान ४०० शाळांमध्ये ई-लर्निंग प्रकल्प राबवा असे आदेश सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी शिक्षण विभागास दिले. या विषयावर बोलताना सुकन्या नरसुले म्हणाल्या की, यापूर्वीच्या ई-लर्निंग शाळा सादील अभावी बंद पडल्या आहेत. त्या शाळा भविष्यात चालू होणार की नाही असे सांगत शिक्षण विभागास जाब विचारला. अद्याप जिल्हा नियोजनमधून निधी नाहीशिक्षण विभागामार्फत केल्या जाणाऱ्या विविध कामांना जिल्हा नियोजन समितीमधून पालकमंत्र्यांनी अद्याप निधी मंजूर केला नसल्याची माहिती सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी दिली. यापुढे २० पटसंख्या असलेल्या शाळांना शिक्षक मिळणार नसल्याचे संकेत वरिष्ठ स्तरावरून मिळत आहेत. मात्र याबाबत कोणतेही लेखी आदेश नाहीत. तसेच यापुढे २०४२ संख्या असलेल्या शाळांना धोका निर्माण होण्याची शक्यता रत्नाकर धाकोरकर यांनी बोलताना व्यक्त केली.