शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

निकषानुसारच शिक्षक अतिरिक्त ठरणार!

By admin | Updated: June 20, 2016 00:24 IST

शाळांची कार्यशाळा : संच मान्यतेनुसार संख्या निश्चित

टेंभ्ये : सन २०१५-१६ च्या आॅनलाईन संच मान्यतेनुसार अतिरिक्त व रिक्त शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. यानुसार शिक्षक अतिरिक्त ठरलेल्या शाळांमधून अतिरिक्त शिक्षकांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबत जिल्ह्यातील संबंधित शाळांची कार्यशाळा पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथे झाली. शासन निकषानुसारच शिक्षक अतिरिक्त ठरविले जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी यावेळी स्पष्ट केले. यासाठी महाराष्ट्रातील खासगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावलीतील तरतुदीनुसार अतिरिक्त शिक्षक निश्चित करावा, असे आवाहन लोहार यांनी केले आहे. जिल्ह्यातील काही शाळांमधून सेवाज्येष्ठ शिक्षकांना अतिरिक्त करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी शिक्षक अतिरिक्त ठरविण्याच्या निकषांबाबत ‘लोकमत’शी संवाद साधला. शाळा सेवेच्या शर्ती नियमावली १९८१मधील नियम १२ अनुसूची ‘फ’नुसार शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करावी. इयत्ता ६ वी ते इयत्ता १० वीमधील पटसंख्या कमी झाल्यास प्रशिक्षित पदवीधर वर्गातील कनिष्ठतम कायम शिक्षक व इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी पर्यंतची विद्यार्थी संख्या कमी झाल्यास प्रशिक्षित अपदवीधर वर्गातील कनिष्ठतम शिक्षक अतिरिक्त ठरतील. अशा पद्धतीने शिक्षक अतिरिक्त ठरवताना अनुशेषाचा प्राधान्याने विचार करावा. शाळेतील मागासवर्गीय व्यक्ती ज्येष्ठतेनुसार कपातीस पात्र असेल. परंतु, शाळेतील त्यांची संख्या राखीव जागेच्या टक्केवारीनुसार अधिक नसेल तर संबंधित कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविता येणार नाही. शिक्षक : शिक्षणाधिकारी करणार पडताळणी शाळांनी पाठविलेल्या अतिरिक्त शिक्षकांची पडताळणी शिक्षणाधिकारी क़रणार आहेत. संस्थांनी अतिरिक्त ठरविलेला कर्मचारी हा कनिष्ठतम कायम कर्मचारी आहे का? मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची विहीत टक्केवारी तपासून अतिरिक्त ठरविलेल्या कर्मचारी योग्य आहे का? शाळेतील विषयांची गरज लक्षात घेता योग्य कर्मचारी अतिरिक्त ठरविला आहे का? या सर्व प्रश्नांंच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी स्वत: अतिरिक्त शिक्षकांच्या यादीची पडताळणी करणार असल्याचे शिक्षणाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. ..तर शिक्षक अतिरिक्त ज्या प्रवर्गातील शिक्षक अतिरिक्त ठरेल, त्या प्रवर्गातील कनिष्ठतम शिक्षक अतिरिक्त ठरवावा लागेल, असे किरण लोहार यांनी यावेळी बोलताना सांगितले.