शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

आंबोलीत दोन वाहनांमध्ये अपघात

By admin | Updated: July 10, 2016 23:56 IST

चौघे गंभीर जखमी : रूग्णालयात दाखल

सावंतवाडी : आंबोली-नेनेवाडी येथे आय-२० व तवेरा कारमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात आय-२० कारमधील बेळगाव येथील चौघांना गंभीर दुखापत झाली. जखमींना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद करण्यात आली नव्हती. बेळगाव येथील रिजवान शेख यांच्या सावंतवाडीतील नातेवाइकांचा चार दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यांना पाहण्यासाठी आपल्या ताब्यातील आय-२० या कार ने बेळगाव ते सावंतवाडी असा प्रवास करीत होते. दरम्यान, आंबोली-नेनेवाडी येथील धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या तवेरा कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात रिजवान मुल्ला (वय ३५), महम्मद टपालवाले (वय २८), जैगुण सत्तार (वय ५०), रियाना फारूक गोये (वय ३३, सर्व रा. बेळगाव) हे जखमी झाले. त्यांना कुटीर रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंद नव्हती. सावंतवाडी येथे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या नातेवाइकांची भेट घेण्यासाठी येत असताना हा अपघात झाला. या अपघातापूर्वी त्यांचा टेम्पो ट्रॅव्हलरशी अपघात झाला होता. त्यावेळी त्यांना कोणती दुखापत झाली नव्हती. (वार्ताहर) आंबोलीत पर्यटकांची उच्चांकी गर्दी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी कोल्हापूर, सांगली, बेळगाव, गोवा, सिंधुदुर्ग येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तीस ते पस्तीस हजार पर्यटक आंबोलीत आले होते. पर्यटकांच्या उच्चांकी गर्दीने तब्बल पाच ते सहा तास वाहतूककोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुपारनंतर वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली.