शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक थांब्यांमुळे अपघात

By admin | Updated: September 23, 2016 23:11 IST

७० टक्क्यांपेक्षा जास्त थांबे धोकादायक

विशाल रेवडेकर ल्ल फोंडाघाट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द असलेल्या खारेपाटण ते कणकवली ओसरगाव महिला भवनपर्यंत एस.टी. प्रशासनाचे तब्बल ७० टक्क्यांपेक्षा जास्त थांबे हे धोकादायक वळणावर आहेत. त्यामुळे या मार्गावर होणाऱ्या अपघातांना हे थांबेदेखील कारणीभूत ठरत आहेत. ‘एस.टी.चे हे थांबे अजून किती जणांचे जीवन थांबविणार?’ असा प्रश्न यानिमित्ताने वाहतूकदारांमधून उपस्थित होत आहे. असं म्हटलं जातं की, एखाद्या घटनेत वित्तहानी सोडाच जीवितहानी होत नाही, तोपर्यंत प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधींना जाग येत नाही. मग ते महामार्गावरील खड्डे असो किंवा अपघात. मागील अनेक वर्षांपासून एस.टी. प्रशासनाचे अगदी वडिलोपार्जित म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे ‘विनंती थांबा’ जरी इतिहासजमा झाले असले, तरीदेखील प्रवासी ‘वाट पाहीन पण एस.टी.नेच जाईन’ या ब्रीद वाक्याप्रमाणे बसथांब्यावर थांबतात. मात्र, कधी धोकादायक ठिकाणी असलेले हे थांबे अनेक लोकांचे जीवन थांबविताना दिसतात. बसथांब्यावर धोकादायक ठिकाणी बस थांबून झालेल्या अपघातात जीव गमवावे लागतात. जानवली-गावठणवाडी येथील बसथांब्यावर एस.टी. बस प्रवासी घेण्यासाठी थांबली असताना, त्याच्या मागून दुचाकीस्वार आणि आयशर टेम्पोही थांबला. त्याचवेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी भरधाव वेगाने येणाऱ्या लक्झरी बसने टेम्पोला मागून धडक दिल्याने टेम्पो मोटारसायकलवर आदळला. या अपघातात टेम्पो आणि एस.टी. बस या दोन वाहनांमध्ये चिरडून दुचाकीस्वार दीपक पांडुरंग राणे (३५ रा. कुणकवण) आणि संदीप पांडुरंग राणे (४२) हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. यातील दीपक राणेंच्या डोक्याला व बरगड्यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले, तर संदीप राणे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, या तिहेरी अपघातप्रकरणी नडगीवे येथील विठू माऊली अर्थात व्ही.एम. ट्रॅव्हल्सचा चालक बोटीचंद राजभर याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तरीदेखील हे प्रकरण संपले का? निश्चितच नाही. नेमका दोष कोणाचा ? जानवली येथील थांब्यावर झालेल्या अपघातात एकाला जीव गमवावा लागला, तर दुसऱ्याला गंभीर दुखापतींचा सामना करावा लागला आहे. तरीदेखील प्रशासन सुस्तच राहणार का? कारण हा अपघातात सर्वांच्यादृष्टीने लक्झरी चालक दोषी असल्यानेच प्रथमदर्शनी दिसत आहे. त्याची शिक्षा त्याला न्यायालयाकडून मिळेलही किंवा मृत व जखमी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळेलही, परंतु कुटुंबातील गेलेला कर्ता तर मागे येणार नाही ना? मग यात नेमका दोषी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धोकादायक वाहतूक थांबे महामार्गावर बुधवारी झालेल्या अपघातात एकाचा जीव गेला असला, तरी या अपघाताचे ठिकाण पाहता एस.टी. चालकाने जानवली-गावठणवाडी या थांब्यावर बस प्रवाशांसाठी उभी केली होती ते ठिकाण वाहन उभे करण्यास योग्य होते का ? वास्तविक मुंबई-गोवा महामार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करत असतातच. मात्र, महामार्गावर वाहने उभी करण्याचेदेखील काही नियम आहेतच ना? मग धोकादायक वळणावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे व तेही महामार्गावरील, हे या अपघाताचे मूळ कारण आहे. यात बसचालकाची चूक निश्चितच नसेलही. कारण बस थांब्यावरील प्रवासी न घेता पुढे गेला असता तर कदाचित त्याच्यावरदेखील खात्याकडून कारवाईचा बडगा होताच. वाहतूक नियम फक्त सामान्यांसाठीच का ? महाराष्ट्रात तसेच जिल्ह्यात खूप मोठ्याप्रमाणात एस.टी.चे अपघात वाढत चालले आहेत. नियम धाब्यावर बसवून गाडी चालविणे, धोकादायक ठिकाणी गाडी उभे करणे, विशेषत: गाडी उभी करताना मागील किंवा पुढील वाहनाला कोणतीही सूचना न देणे हे नियम पाळले जात नाहीत. मात्र, हे नियम सर्वसामान्यांसाठी असतात का? शासकीय वाहनांना यात सूट दिली जाते का? असा सवाल वाहनचालकांमधून उपस्थित केला जात आहे. महामार्गावर एस.टी. बसेसचे असलेले अनधिकृत थांबे हा एक धोका वारंवार दुर्लक्षिला जातो. कणकवली शहरात मध्यवर्ती तायशेटे हॉस्पिटलजवळील थांबा बसमधूनच उतरलेल्या प्रवाशांचा बऱ्याचदा बळी घेणारा ठरला आहे आणि असे अनेक जीवघेणे थांबे स्वतंत्र लेन करून सुरक्षित करावेत म्हणून प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या समितीच्या बैठकीत गेल्या २0 वर्षांत वारंवार मांडले गेले आहेत; परंतु महामार्गाच्या सार्वजनिक बांधकामकडून दखल घेतली गेलेली नाही. आता तर महामार्गाचे रूंदीकरण या मथळ्याखाली आणखी दोन वर्षे असेच अपघातकर्ते थांबे सिंधुदुर्गवासीयांना सहन करावे लागणार आहेत. -अशोक करंबेळकर, अध्यक्ष, प्रवासी संघटना, कणकवली.