शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक थांब्यांमुळे अपघात

By admin | Updated: September 23, 2016 23:11 IST

७० टक्क्यांपेक्षा जास्त थांबे धोकादायक

विशाल रेवडेकर ल्ल फोंडाघाट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द असलेल्या खारेपाटण ते कणकवली ओसरगाव महिला भवनपर्यंत एस.टी. प्रशासनाचे तब्बल ७० टक्क्यांपेक्षा जास्त थांबे हे धोकादायक वळणावर आहेत. त्यामुळे या मार्गावर होणाऱ्या अपघातांना हे थांबेदेखील कारणीभूत ठरत आहेत. ‘एस.टी.चे हे थांबे अजून किती जणांचे जीवन थांबविणार?’ असा प्रश्न यानिमित्ताने वाहतूकदारांमधून उपस्थित होत आहे. असं म्हटलं जातं की, एखाद्या घटनेत वित्तहानी सोडाच जीवितहानी होत नाही, तोपर्यंत प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधींना जाग येत नाही. मग ते महामार्गावरील खड्डे असो किंवा अपघात. मागील अनेक वर्षांपासून एस.टी. प्रशासनाचे अगदी वडिलोपार्जित म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे ‘विनंती थांबा’ जरी इतिहासजमा झाले असले, तरीदेखील प्रवासी ‘वाट पाहीन पण एस.टी.नेच जाईन’ या ब्रीद वाक्याप्रमाणे बसथांब्यावर थांबतात. मात्र, कधी धोकादायक ठिकाणी असलेले हे थांबे अनेक लोकांचे जीवन थांबविताना दिसतात. बसथांब्यावर धोकादायक ठिकाणी बस थांबून झालेल्या अपघातात जीव गमवावे लागतात. जानवली-गावठणवाडी येथील बसथांब्यावर एस.टी. बस प्रवासी घेण्यासाठी थांबली असताना, त्याच्या मागून दुचाकीस्वार आणि आयशर टेम्पोही थांबला. त्याचवेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी भरधाव वेगाने येणाऱ्या लक्झरी बसने टेम्पोला मागून धडक दिल्याने टेम्पो मोटारसायकलवर आदळला. या अपघातात टेम्पो आणि एस.टी. बस या दोन वाहनांमध्ये चिरडून दुचाकीस्वार दीपक पांडुरंग राणे (३५ रा. कुणकवण) आणि संदीप पांडुरंग राणे (४२) हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. यातील दीपक राणेंच्या डोक्याला व बरगड्यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले, तर संदीप राणे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, या तिहेरी अपघातप्रकरणी नडगीवे येथील विठू माऊली अर्थात व्ही.एम. ट्रॅव्हल्सचा चालक बोटीचंद राजभर याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तरीदेखील हे प्रकरण संपले का? निश्चितच नाही. नेमका दोष कोणाचा ? जानवली येथील थांब्यावर झालेल्या अपघातात एकाला जीव गमवावा लागला, तर दुसऱ्याला गंभीर दुखापतींचा सामना करावा लागला आहे. तरीदेखील प्रशासन सुस्तच राहणार का? कारण हा अपघातात सर्वांच्यादृष्टीने लक्झरी चालक दोषी असल्यानेच प्रथमदर्शनी दिसत आहे. त्याची शिक्षा त्याला न्यायालयाकडून मिळेलही किंवा मृत व जखमी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळेलही, परंतु कुटुंबातील गेलेला कर्ता तर मागे येणार नाही ना? मग यात नेमका दोषी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धोकादायक वाहतूक थांबे महामार्गावर बुधवारी झालेल्या अपघातात एकाचा जीव गेला असला, तरी या अपघाताचे ठिकाण पाहता एस.टी. चालकाने जानवली-गावठणवाडी या थांब्यावर बस प्रवाशांसाठी उभी केली होती ते ठिकाण वाहन उभे करण्यास योग्य होते का ? वास्तविक मुंबई-गोवा महामार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करत असतातच. मात्र, महामार्गावर वाहने उभी करण्याचेदेखील काही नियम आहेतच ना? मग धोकादायक वळणावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे व तेही महामार्गावरील, हे या अपघाताचे मूळ कारण आहे. यात बसचालकाची चूक निश्चितच नसेलही. कारण बस थांब्यावरील प्रवासी न घेता पुढे गेला असता तर कदाचित त्याच्यावरदेखील खात्याकडून कारवाईचा बडगा होताच. वाहतूक नियम फक्त सामान्यांसाठीच का ? महाराष्ट्रात तसेच जिल्ह्यात खूप मोठ्याप्रमाणात एस.टी.चे अपघात वाढत चालले आहेत. नियम धाब्यावर बसवून गाडी चालविणे, धोकादायक ठिकाणी गाडी उभे करणे, विशेषत: गाडी उभी करताना मागील किंवा पुढील वाहनाला कोणतीही सूचना न देणे हे नियम पाळले जात नाहीत. मात्र, हे नियम सर्वसामान्यांसाठी असतात का? शासकीय वाहनांना यात सूट दिली जाते का? असा सवाल वाहनचालकांमधून उपस्थित केला जात आहे. महामार्गावर एस.टी. बसेसचे असलेले अनधिकृत थांबे हा एक धोका वारंवार दुर्लक्षिला जातो. कणकवली शहरात मध्यवर्ती तायशेटे हॉस्पिटलजवळील थांबा बसमधूनच उतरलेल्या प्रवाशांचा बऱ्याचदा बळी घेणारा ठरला आहे आणि असे अनेक जीवघेणे थांबे स्वतंत्र लेन करून सुरक्षित करावेत म्हणून प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या समितीच्या बैठकीत गेल्या २0 वर्षांत वारंवार मांडले गेले आहेत; परंतु महामार्गाच्या सार्वजनिक बांधकामकडून दखल घेतली गेलेली नाही. आता तर महामार्गाचे रूंदीकरण या मथळ्याखाली आणखी दोन वर्षे असेच अपघातकर्ते थांबे सिंधुदुर्गवासीयांना सहन करावे लागणार आहेत. -अशोक करंबेळकर, अध्यक्ष, प्रवासी संघटना, कणकवली.