शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

धोकादायक थांब्यांमुळे अपघात

By admin | Updated: September 23, 2016 23:11 IST

७० टक्क्यांपेक्षा जास्त थांबे धोकादायक

विशाल रेवडेकर ल्ल फोंडाघाट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द असलेल्या खारेपाटण ते कणकवली ओसरगाव महिला भवनपर्यंत एस.टी. प्रशासनाचे तब्बल ७० टक्क्यांपेक्षा जास्त थांबे हे धोकादायक वळणावर आहेत. त्यामुळे या मार्गावर होणाऱ्या अपघातांना हे थांबेदेखील कारणीभूत ठरत आहेत. ‘एस.टी.चे हे थांबे अजून किती जणांचे जीवन थांबविणार?’ असा प्रश्न यानिमित्ताने वाहतूकदारांमधून उपस्थित होत आहे. असं म्हटलं जातं की, एखाद्या घटनेत वित्तहानी सोडाच जीवितहानी होत नाही, तोपर्यंत प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधींना जाग येत नाही. मग ते महामार्गावरील खड्डे असो किंवा अपघात. मागील अनेक वर्षांपासून एस.टी. प्रशासनाचे अगदी वडिलोपार्जित म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे ‘विनंती थांबा’ जरी इतिहासजमा झाले असले, तरीदेखील प्रवासी ‘वाट पाहीन पण एस.टी.नेच जाईन’ या ब्रीद वाक्याप्रमाणे बसथांब्यावर थांबतात. मात्र, कधी धोकादायक ठिकाणी असलेले हे थांबे अनेक लोकांचे जीवन थांबविताना दिसतात. बसथांब्यावर धोकादायक ठिकाणी बस थांबून झालेल्या अपघातात जीव गमवावे लागतात. जानवली-गावठणवाडी येथील बसथांब्यावर एस.टी. बस प्रवासी घेण्यासाठी थांबली असताना, त्याच्या मागून दुचाकीस्वार आणि आयशर टेम्पोही थांबला. त्याचवेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी भरधाव वेगाने येणाऱ्या लक्झरी बसने टेम्पोला मागून धडक दिल्याने टेम्पो मोटारसायकलवर आदळला. या अपघातात टेम्पो आणि एस.टी. बस या दोन वाहनांमध्ये चिरडून दुचाकीस्वार दीपक पांडुरंग राणे (३५ रा. कुणकवण) आणि संदीप पांडुरंग राणे (४२) हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. यातील दीपक राणेंच्या डोक्याला व बरगड्यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले, तर संदीप राणे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, या तिहेरी अपघातप्रकरणी नडगीवे येथील विठू माऊली अर्थात व्ही.एम. ट्रॅव्हल्सचा चालक बोटीचंद राजभर याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तरीदेखील हे प्रकरण संपले का? निश्चितच नाही. नेमका दोष कोणाचा ? जानवली येथील थांब्यावर झालेल्या अपघातात एकाला जीव गमवावा लागला, तर दुसऱ्याला गंभीर दुखापतींचा सामना करावा लागला आहे. तरीदेखील प्रशासन सुस्तच राहणार का? कारण हा अपघातात सर्वांच्यादृष्टीने लक्झरी चालक दोषी असल्यानेच प्रथमदर्शनी दिसत आहे. त्याची शिक्षा त्याला न्यायालयाकडून मिळेलही किंवा मृत व जखमी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळेलही, परंतु कुटुंबातील गेलेला कर्ता तर मागे येणार नाही ना? मग यात नेमका दोषी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धोकादायक वाहतूक थांबे महामार्गावर बुधवारी झालेल्या अपघातात एकाचा जीव गेला असला, तरी या अपघाताचे ठिकाण पाहता एस.टी. चालकाने जानवली-गावठणवाडी या थांब्यावर बस प्रवाशांसाठी उभी केली होती ते ठिकाण वाहन उभे करण्यास योग्य होते का ? वास्तविक मुंबई-गोवा महामार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करत असतातच. मात्र, महामार्गावर वाहने उभी करण्याचेदेखील काही नियम आहेतच ना? मग धोकादायक वळणावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे व तेही महामार्गावरील, हे या अपघाताचे मूळ कारण आहे. यात बसचालकाची चूक निश्चितच नसेलही. कारण बस थांब्यावरील प्रवासी न घेता पुढे गेला असता तर कदाचित त्याच्यावरदेखील खात्याकडून कारवाईचा बडगा होताच. वाहतूक नियम फक्त सामान्यांसाठीच का ? महाराष्ट्रात तसेच जिल्ह्यात खूप मोठ्याप्रमाणात एस.टी.चे अपघात वाढत चालले आहेत. नियम धाब्यावर बसवून गाडी चालविणे, धोकादायक ठिकाणी गाडी उभे करणे, विशेषत: गाडी उभी करताना मागील किंवा पुढील वाहनाला कोणतीही सूचना न देणे हे नियम पाळले जात नाहीत. मात्र, हे नियम सर्वसामान्यांसाठी असतात का? शासकीय वाहनांना यात सूट दिली जाते का? असा सवाल वाहनचालकांमधून उपस्थित केला जात आहे. महामार्गावर एस.टी. बसेसचे असलेले अनधिकृत थांबे हा एक धोका वारंवार दुर्लक्षिला जातो. कणकवली शहरात मध्यवर्ती तायशेटे हॉस्पिटलजवळील थांबा बसमधूनच उतरलेल्या प्रवाशांचा बऱ्याचदा बळी घेणारा ठरला आहे आणि असे अनेक जीवघेणे थांबे स्वतंत्र लेन करून सुरक्षित करावेत म्हणून प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या समितीच्या बैठकीत गेल्या २0 वर्षांत वारंवार मांडले गेले आहेत; परंतु महामार्गाच्या सार्वजनिक बांधकामकडून दखल घेतली गेलेली नाही. आता तर महामार्गाचे रूंदीकरण या मथळ्याखाली आणखी दोन वर्षे असेच अपघातकर्ते थांबे सिंधुदुर्गवासीयांना सहन करावे लागणार आहेत. -अशोक करंबेळकर, अध्यक्ष, प्रवासी संघटना, कणकवली.