शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

जिल्ह्यात नवरात्रौत्सवाची लगबग

By admin | Updated: September 23, 2016 23:05 IST

सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

सुनील गोवेकर ल्ल आरोंदा गणेश चतुर्थीचा उत्सव आता संपतो न संपतो तोच जिल्ह्याला नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात दांडिया, गरबा या नृत्यांसह भजने, डबलबारी यांच्या तयारीची लगबग पाहावयास मिळत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रौत्सवातही गावागावांत सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम पाहावयास मिळणार आहे. या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील नवरात्रौसव मंडळे कार्यरत झाली असून, स्थानिक कलाकारांना नव्याने व्यासपीठ मिळणार आहे. गणेश चतुर्थीचा सण जवळपास संपलेला असून, नऊ दिवसांची सांस्कृतिक मांदियाळी असलेला नवरात्रौसव आता सुरू होणार आहे. दांडिया ग्रुप, डबलबारी करणारे भजनी बुवा, भजनी मंडळे, दशावतार, गाण्याचे कार्यक्रम करणारे विविध वाद्यवृंद, आॅर्केस्ट्रा, नृत्यात निपुण असणारे कलाकार अशा सर्वच कलाकारांना हक्काचे व्यासपीठ निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील विविध शहरी भागांबरोबरच आता ग्रामीण भागातूनही गेल्या काही वर्षांत नवरात्रौसव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देवींच्या मंदिरातून नवरात्रौसव साजरा करण्याची परंपरा आधीपासूनच असली, तरी दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात सादर करण्याची परंपरा अलीकडील काही वर्षांपासूनच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नवरात्रौत्सव उत्सवातील नऊ रात्री जागणार आहेत. दांडिया, गरबा नृत्य हे मुळात गुजरातचे असले, तरी हे नृत्य तरुण वर्गाला भुरळ पाडणारे असल्याने गावागावांतून दांडिया ग्रुप निर्माण होत आहेत. गावागावांतील नवरात्रौत्सव मंडळांमार्फत दांडिया स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे चांगले नृत्य सादर करणाऱ्या ग्रुपसाठी आर्थिक फायदा होत असल्याने स्पर्धेत टिकण्यासाठी दांडिया ग्रुप आतापासूनच सरावात गुंतलेले आहेत. तरुणाईसाठी दांडिया हा प्रकार आकर्षण असल्याने तरुण, तरुणी या नृत्य प्रकाराकडे वळत आहेत. डबलबारीचे खास आकर्षण जिल्ह्यात भजन, दशावतार या कलांना अच्छे दिन असून, नवरात्रौत्सवामध्येही या कलाकारांची चलती असणार आहे. भजन मंडळांसाठी नऊ दिवसांत विविध ठिकाणी कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध असणार आहे. तर नवरात्रौत्सव मंडळाच्या माध्यमातून दशावतारी नाट्यमंडळांनाही कलेसाठी व्यासपीठ निर्माण होणार आहे. संगीत भजनाच्या डबलबाऱ्यांंचे आयोजन नवरात्रौत्सव कालावधीत केले जाते. आजही प्रेक्षकांसाठी भजनी बाऱ्यांचे आयोजन हे खास आकर्षण ठरत आले आहे. जिल्ह्यातील नामवंत बुवांच्या डबलबाऱ्यांचे आयोजन तसेच तिरंगी भजनांचे सामने रंगणार आहेत. अतिशय लोकप्रिय असणाऱ्या या प्रकाराला प्रेक्षकांची आजही पहिली पसंती असल्याचे दिसून येते.