शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

By admin | Updated: March 11, 2016 00:02 IST

जिल्हा परिषद : मानधनवाढीच्या मागणीसाठी धडकल्या

रत्नागिरी : केंद्रीय अर्थसंकल्पात महिला व बालकल्याण विभागासाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करून मानधन वाढवण्याचे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले होते़ परंतु, आपल्याच बोलण्याला त्यांनी हरताळ फासला आहे़ त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन न वाढवणाऱ्या भाजप सरकारच्या जाहीरनाम्याचे काय होणार, असा संतप्त सवाल अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे़जिल्ह्यातील सुमारे १000 अंगणवाडी सेविकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. शहरातील प्रमोद महाजन क्रीडासंकुल ते जिल्हा परिषद असा निषेध मोर्चा काढण्यात आला़ अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमल परूळेकर यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात विविध घोषणा देऊन शासनाचा निषेध करण्यात आला़ दरम्यान, सभेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या महिला व बालकत्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले़अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर १५ फेब्रुवारी २०१६ रोजी दिल्ली येथील जंतरमंतरवर देशव्यापी मोर्चाचे आयोजन केले होते़ देशभरातून सुमारे २२ लाख अंगणवाडी सेविका या मोर्चात सहभागी झाल्या होत्या़ यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महिला व बालकल्याण विभागासाठी २५ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार असून, सेविकांचे मानधन वाढवण्याचे आश्वासनही दिले होते़ मात्र आपल्याच बोलण्याला अर्थमंत्र्यांनी हारताळ फासला असून, अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत तीव्र नाराजी आहे, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते़ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी मानावे व त्यानुसार वेतनश्रेणी द्यावी, हा निर्णय होईपर्यंत राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये व मदतनिसांना १० हजार रुपये मानधन द्यावे़ कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन त्वरित द्यावे व यापुढे दरमहा ५ तारखेपूर्वी मानधन देण्यात यावे़ कर्मचाऱ्यांना वर्षाला १५ दिवस भरपगारी रजा मिळावी़ प्राथमिक शाळांप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मे महिन्यात एक महिना सुटी द्यावी़ निवृत्तिवेतन सन २००५ पासून लागू करावे़ तसेच सध्या चालू योजनेतील १ लाख व मदतनिसांना ७५ हजाराची मर्यादा काढावी़ दरवर्षी सेविका व मदतनिसांना ५ हजार रुपये बोनस द्यावा़ गणवेशासाठी वर्षाला १ हजार रुपये द्यावेत़ शिक्षणाचा अधिकार अंगणवाडीतील मुलांसाठीही लागू करावा़ योजनाबाह्य कामे कर्मचाऱ्यांवर सोपवू नयेत, या मागण्यांचा समावेश आहे़सत्तेवर आल्यावर केजरीवाल यांनी दिल्लीत अंगणवाडी सेविकांना ६ हजार रुपये मानधन केले़ आंध्रप्रदेश, तामिळनाडूत ७ हजार २०० रुपये, पाँडेचरीमध्ये १३ हजार रुपये, तर शेजारच्या गोवा राज्यात १५ हजार रुपये मानधन देण्यात येते़ केरळ सरकारचाही १० हजार रुपये मानधन करण्याचा प्रस्ताव आहे़ अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत मोठ्या संस्थांना आमंत्रित केले होते़ एकूणच अंगणवाड्या भांडवलदारांच्या ताब्यात देण्याचा डाव असून, अंगणवाडीचा प्रवास खाजगीकरणाकडे चालला असल्याचा आरोप कमल परूळेकर यांनी यावेळी केला़ (शहर वार्ताहर)महिलांची भूमिका : तूटपुंज्या मानधनावर कामगेले अनेक दिवस अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांवर शासनाने विचार केलेला नाही. तूटपुंज्या मानधनावर या अंगणवाडीसेविका काम करत आहेत. दुर्गम भागात शिक्षणाचे रोपटे रुजवणाऱ्या या वर्गावर शासनाने अन्याय करू नये, अशी भूमिका यावेळी या महिलांनी मांडली.मानधन कमी का?शासनाने आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यस्तरावर जोरदार आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. दिल्लीत अंगणवाडी सेविकांना ६ हजार मानधन मिळते, मग महाराष्ट्रातच कमी का? असा या महिलांचा सवाल आहे.