शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

रत्नागिरीत एका महिन्यात ९ बळी

By admin | Updated: July 2, 2015 00:29 IST

मोसमी पाऊस : विविध ठिकाणी पडझडीमुळे ७0 लाखांची हानी

रत्नागिरी : जूनमध्ये झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात पडझड झालेली घरे, गोठे, खासगी व सार्वजनिक मालमत्ता तसेच मृत जनावरे यामुळे ६९ लाख ८७ हजार ८७८ रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत ९ जणांचे बळी गेले असून, त्यांच्या १२ वारसांना शासनाकडून मदत देण्यात आली आहे.जिल्ह्यात ८ जूनपासून पावसाला प्रारंभ झाला आहे. मात्र, त्याआधी अधूनमधून झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात अनेक घरे, गोठे, सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेले आठवडाभर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी त्यापूर्वी पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान केले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. छप्परांचे नुकसान, घरांचे पूर्णत: नुकसान तसेच झाडांचेही नुकसान झाले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांची जनावरे मृत झाली असून, नैसर्गिक आपत्तीने अनेकांचे बळी घेतले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पडझड झालेल्या घरांची एकूण संख्या ५६७ इतकी आहे तर गोठ्यांची एकूण संख्या ५२ आहे. घरांच्या एकूण नुकसानाची रक्कम ५५,७०, १२५ इतकी तर गोठ्यांची ७,१४,०१३ रूपये इतकी नोंदविण्यात आली आहे. अजूनही काही गावांमध्ये पंचनाम्याचे काम सुरु आहे.या महिनाभरातील नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील मृत जनावरांच्या नुकसानाची रक्कम १,२१,५०० इतकी आहे. जिल्ह्यातील ९ व्यक्तींचा यात बळी गेला आहे. सार्वजनिक ३५ मालमत्तांचे आणि ४ खासगी मालमत्तांचे एकूण ५,८२,२४० रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानापोटी जिल्ह्यातील एकूण ६९,८७८७८ रूपयांच्या नुकसानाची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यात ८ जूनपासून पावसाला प्रारंभ.अधूनमधून झालेल्या वादळी पावसात अनेक ठिकाणी नुकसान.अनेक ठिकाणी पडझड.मृतांच्या १२ वारसांना शासनाकडून मदत.जिल्ह्यात एकूण ६९,८७८७८ रूपयांच्या नुकसानाची नोंद.सार्वजनिक ३५ मालमत्तांचे आणि ४ खासगी मालमत्तांचे एकूण ५,८२,२४० रुपयांचे नुकसान.