शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
2
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
3
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
4
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
5
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
6
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
7
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
8
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
9
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
10
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
11
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
12
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
13
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
14
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
15
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
16
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
17
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
18
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
19
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
20
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!

जिल्ह्यातील ९५ सहकारी संस्थांना लागणार टाळे

By admin | Updated: January 15, 2016 00:29 IST

संचालक मंडळ गोत्यात : कामात सातत्य नसल्याचा ठपका, जानेवारी अखेरपर्यंत नोंदणी रद्द करण्याचा निर्णय

गिरीश परब -- सिंधुदुर्गनगरी -बँकांचा व्यवहार पूर्ण नसणे, संचालक मंडळाच्या सभा वेळेवर न घेणे तसेच संस्थांचे लेखा परीक्षण न करणाऱ्या व कागदोपत्री असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ९५ सहकारी संस्थांना कायमस्वरूपी टाळे लागणार आहे. कामात सातत्य नसल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली असून जानेवारीअखेरपर्यंत या सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सहकारी संस्थेचे उपनिबंधक अभिजीत पाटील यांनी घेतला आहे. दरम्यान, ही सर्व धक्कादायक बाब जिल्हा उपनिबंधक विभागाच्यावतीने सहकारी संस्थांच्या सर्व्हे दरम्यान उघड झाली आहे. यामुळे कित्येक सहकारी संस्थांचे अध्यक्ष व संचालक मंडळ चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राज्यात काही संस्था या कागदोपत्री व बंद अवस्थेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने राज्यातील २ लाख ३० हजार सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला होता. सक्षम असणाऱ्या संस्थाच चालू ठेवाव्यात व कागदोपत्री व ठावठिकाणा नसणाऱ्या संस्था बंद करण्याचे आदेश राज्याच्या सहकार विभागाने जिल्ह्याच्या प्रत्येक उपनिबंधक अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ हजार १५८ सहकारी संस्थांचे सर्वेक्षण १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले होते. जिल्हा उपनिबंधक अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रातील ३० कर्मचाऱ्यांना या सहकारी संस्था सर्वेक्षणाच्या मोहिमेमध्ये सामील करून घेण्यात आले होते. प्रत्येक कर्मचाऱ्याला ४० संस्थांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार या कर्मचाऱ्यांनी संस्थांचे सर्वेक्षण करताना संस्थेचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, संस्था अध्यक्ष, कार्यक्षेत्र, संस्था ही त्याच पत्त्यावर आहे का, संस्थेचा पत्ता, संस्थेचा वर्ग, नफा-तोटा, वार्षिक सर्वसाधारण सभेची दिनांक, बँक खात्यावर शेवटच्या झालेल्या व्यवहाराची तारीख, लेखा परीक्षणाची तारीख आदी माहिती या संस्थांना भेटी देऊन गोळा करण्यात आली होती. या तपासणी दरम्यान संचालक मंडळाच्या सभा, लेखा परीक्षण, निवडणूक याबाबतचे कामकाज ठप्प असणाऱ्या असल्याचे आढळून आले होते. यात १२० संस्था बंद तर १७ कार्यस्थगित संस्था व २ संस्थांचा ठावठिकाणा नसल्याचे यातून उघड झाले होते.या सर्व सहकारी संस्थांना नोटीसा पाठवून त्यांच्याकडून खुलासा पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यातील काही संस्थांचा खुलासा अमान्य झाल्याने यातील ९५ संस्था या अवसायनात काढण्यात आल्या होत्या. या संस्थांवर प्रशासक नेमून संस्थेचे जे काही आर्थिक व्यवहार असतील किंवा देणे-घेणे असेल ते सर्व ३१ जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर या ९५ संस्था कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याचेही उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित सहकारी संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ चांगलेच अडचणीत सापडले आहेत.सहकारी संस्थांची संख्या ११५८सर्वेक्षण व्हायच्या अगोदर जिल्ह्यात ११५८ एवढ्या सहकारी संस्था कार्यरत असल्याची नोंद उपनिबंधक सहकारी संस्थांकडे होती. मात्र, सर्वेक्षणाअंती सर्व चित्रच बदलून गेले आहे. सर्वेक्षणाअंती १२० संस्था बंद, १७ कार्यस्थित व २ ठाव ठिकाणा नसलेल्या असे एकूण १३९ संस्था अडचणीत आहेत.या सर्वांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यातील ९५ संस्था जानेवारीअखेर बंद होणार असून उर्वरितांवर कारवाई करण्याची प्रक्रिया उपनिबंधक विभागाकडून सुरु करण्यात आली आहे.