शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

जिल्ह्यातील ९५ सहकारी संस्थांना लागणार टाळे

By admin | Updated: January 15, 2016 00:29 IST

संचालक मंडळ गोत्यात : कामात सातत्य नसल्याचा ठपका, जानेवारी अखेरपर्यंत नोंदणी रद्द करण्याचा निर्णय

गिरीश परब -- सिंधुदुर्गनगरी -बँकांचा व्यवहार पूर्ण नसणे, संचालक मंडळाच्या सभा वेळेवर न घेणे तसेच संस्थांचे लेखा परीक्षण न करणाऱ्या व कागदोपत्री असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ९५ सहकारी संस्थांना कायमस्वरूपी टाळे लागणार आहे. कामात सातत्य नसल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली असून जानेवारीअखेरपर्यंत या सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सहकारी संस्थेचे उपनिबंधक अभिजीत पाटील यांनी घेतला आहे. दरम्यान, ही सर्व धक्कादायक बाब जिल्हा उपनिबंधक विभागाच्यावतीने सहकारी संस्थांच्या सर्व्हे दरम्यान उघड झाली आहे. यामुळे कित्येक सहकारी संस्थांचे अध्यक्ष व संचालक मंडळ चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राज्यात काही संस्था या कागदोपत्री व बंद अवस्थेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने राज्यातील २ लाख ३० हजार सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला होता. सक्षम असणाऱ्या संस्थाच चालू ठेवाव्यात व कागदोपत्री व ठावठिकाणा नसणाऱ्या संस्था बंद करण्याचे आदेश राज्याच्या सहकार विभागाने जिल्ह्याच्या प्रत्येक उपनिबंधक अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ हजार १५८ सहकारी संस्थांचे सर्वेक्षण १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले होते. जिल्हा उपनिबंधक अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रातील ३० कर्मचाऱ्यांना या सहकारी संस्था सर्वेक्षणाच्या मोहिमेमध्ये सामील करून घेण्यात आले होते. प्रत्येक कर्मचाऱ्याला ४० संस्थांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार या कर्मचाऱ्यांनी संस्थांचे सर्वेक्षण करताना संस्थेचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, संस्था अध्यक्ष, कार्यक्षेत्र, संस्था ही त्याच पत्त्यावर आहे का, संस्थेचा पत्ता, संस्थेचा वर्ग, नफा-तोटा, वार्षिक सर्वसाधारण सभेची दिनांक, बँक खात्यावर शेवटच्या झालेल्या व्यवहाराची तारीख, लेखा परीक्षणाची तारीख आदी माहिती या संस्थांना भेटी देऊन गोळा करण्यात आली होती. या तपासणी दरम्यान संचालक मंडळाच्या सभा, लेखा परीक्षण, निवडणूक याबाबतचे कामकाज ठप्प असणाऱ्या असल्याचे आढळून आले होते. यात १२० संस्था बंद तर १७ कार्यस्थगित संस्था व २ संस्थांचा ठावठिकाणा नसल्याचे यातून उघड झाले होते.या सर्व सहकारी संस्थांना नोटीसा पाठवून त्यांच्याकडून खुलासा पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यातील काही संस्थांचा खुलासा अमान्य झाल्याने यातील ९५ संस्था या अवसायनात काढण्यात आल्या होत्या. या संस्थांवर प्रशासक नेमून संस्थेचे जे काही आर्थिक व्यवहार असतील किंवा देणे-घेणे असेल ते सर्व ३१ जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर या ९५ संस्था कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याचेही उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित सहकारी संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ चांगलेच अडचणीत सापडले आहेत.सहकारी संस्थांची संख्या ११५८सर्वेक्षण व्हायच्या अगोदर जिल्ह्यात ११५८ एवढ्या सहकारी संस्था कार्यरत असल्याची नोंद उपनिबंधक सहकारी संस्थांकडे होती. मात्र, सर्वेक्षणाअंती सर्व चित्रच बदलून गेले आहे. सर्वेक्षणाअंती १२० संस्था बंद, १७ कार्यस्थित व २ ठाव ठिकाणा नसलेल्या असे एकूण १३९ संस्था अडचणीत आहेत.या सर्वांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यातील ९५ संस्था जानेवारीअखेर बंद होणार असून उर्वरितांवर कारवाई करण्याची प्रक्रिया उपनिबंधक विभागाकडून सुरु करण्यात आली आहे.