शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

विकास आराखड्यासाठी ८२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 00:39 IST

दीपक केसरकर : सिंधुदुर्गला पर्यटनदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गाला पर्यटनदृष्ट्या बळकट करण्यासाठी तसेच तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचार करता बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक क्रांती घडविण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आराखडा बनविण्यात आला आहे. याची माहिती रविवार ५ जून रोजी शरद कृषी भवन येथे होणाऱ्या कार्यशाळेत दिली जाणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी ८२ कोटी रूपये निधीची तरतूदही करण्यात येणार असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी जिल्ह्यासाठी चार योजना आखण्यात आल्या आहेत. याची इत्यंभूत माहिती कार्यशाळेत दिली जाणार आहे. याबाबत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, राष्ट्रीय जीवनोन्नती अभियानाचे विशेष कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी चांदा ते बांदा योजना व माझा गाव माझा विकास, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामीण पर्यटन यांचा समावेश आहे. किनारपट्टीतील पर्यटनदृष्ट्या सक्षम गावांंचा विकास अपेक्षित आहे. तर ग्रामीण पर्यटन अंतर्गत जिल्ह्यातील पाच समूह पर्यटन गटांचा विकास करण्यात येणार आहे. या अंतर्गत त्या समुहामधील गावात निवास, न्याहारी, साहसी पर्यटन, खाडी पर्यटन याद्वारे पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर आहे. त्याचा वापर करून विविध खाद्यपदार्थ, टिकाऊपदार्थ, बचत गटामार्फत बनवून त्यांची विक्री हमी देऊन करण्यात येणार आहे. त्यामुळे बचत गटांना व पर्यायाने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल.मालवण मधील स्कुबा डायव्हींग बरोबरच शिरोडा येथे स्कुबा डायव्हींग प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्याचदृष्टीने या कार्यशाळेत सांगोपांग चर्चा होणार अशी माहिती यावेळी दीपक केसरकर यांनी दिली.(प्रतिनिधी)चिपी विमानतळावर : २0१७ मध्ये विमान उतरणारचिपी येथील धावपट्टीचे काम पूर्णत्वास आले असून त्याचे स्थापत्य तयार झाले आहे. या वर्षात येथील वीजजोडणीचे काम पूर्ण होईल. या धावपट्टीची क्षमता अडीच किलोमीटर आहे. या धावपट्टीवर सर्वच प्रकारची विमाने उतरू शकतात. गोव्यातील विमानतळही अडीच किलोमीटर धावपट्टीचे आहेत. ज्यावेळी या विमानतळाचे भूमिपूजन होईल. तेंव्हा चिपीची धावपट्टी पूर्ण होऊन विमाने उतरू लागतील. सध्यस्थिती पाहता जून २०१७ मध्ये या धावपट्टीवर विमान उतरू शकेल, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.४0 हजार जनता अद्याप दारिद्र्यरेषेखालीजिल्ह्यातील ४० हजार जनता अद्याप दारिद्र्य रेषेखाली आहेत. त्यांच्या सबलीकरणासाठी राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वर्धीनीद्वारा गावाच्या विकासाबरोबरच दारिद्र्य रेषेच्याखालील लोकांच्या विकासासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.सी-वर्ल्डसाठी येथील ग्रामस्थांनी स्वेच्छेने जमीन देण्याचे कबुल केले आहे. त्यामुळे सी-वर्ल्डसाठी आवश्यक साडेतीनशे हेक्टर जमीन संपादित करून हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाईल.- दीपक केसरकर, पालकमंत्री