शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखड्यासाठी ८२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 00:39 IST

दीपक केसरकर : सिंधुदुर्गला पर्यटनदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गाला पर्यटनदृष्ट्या बळकट करण्यासाठी तसेच तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचार करता बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक क्रांती घडविण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आराखडा बनविण्यात आला आहे. याची माहिती रविवार ५ जून रोजी शरद कृषी भवन येथे होणाऱ्या कार्यशाळेत दिली जाणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी ८२ कोटी रूपये निधीची तरतूदही करण्यात येणार असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी जिल्ह्यासाठी चार योजना आखण्यात आल्या आहेत. याची इत्यंभूत माहिती कार्यशाळेत दिली जाणार आहे. याबाबत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, राष्ट्रीय जीवनोन्नती अभियानाचे विशेष कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी चांदा ते बांदा योजना व माझा गाव माझा विकास, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामीण पर्यटन यांचा समावेश आहे. किनारपट्टीतील पर्यटनदृष्ट्या सक्षम गावांंचा विकास अपेक्षित आहे. तर ग्रामीण पर्यटन अंतर्गत जिल्ह्यातील पाच समूह पर्यटन गटांचा विकास करण्यात येणार आहे. या अंतर्गत त्या समुहामधील गावात निवास, न्याहारी, साहसी पर्यटन, खाडी पर्यटन याद्वारे पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर आहे. त्याचा वापर करून विविध खाद्यपदार्थ, टिकाऊपदार्थ, बचत गटामार्फत बनवून त्यांची विक्री हमी देऊन करण्यात येणार आहे. त्यामुळे बचत गटांना व पर्यायाने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल.मालवण मधील स्कुबा डायव्हींग बरोबरच शिरोडा येथे स्कुबा डायव्हींग प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्याचदृष्टीने या कार्यशाळेत सांगोपांग चर्चा होणार अशी माहिती यावेळी दीपक केसरकर यांनी दिली.(प्रतिनिधी)चिपी विमानतळावर : २0१७ मध्ये विमान उतरणारचिपी येथील धावपट्टीचे काम पूर्णत्वास आले असून त्याचे स्थापत्य तयार झाले आहे. या वर्षात येथील वीजजोडणीचे काम पूर्ण होईल. या धावपट्टीची क्षमता अडीच किलोमीटर आहे. या धावपट्टीवर सर्वच प्रकारची विमाने उतरू शकतात. गोव्यातील विमानतळही अडीच किलोमीटर धावपट्टीचे आहेत. ज्यावेळी या विमानतळाचे भूमिपूजन होईल. तेंव्हा चिपीची धावपट्टी पूर्ण होऊन विमाने उतरू लागतील. सध्यस्थिती पाहता जून २०१७ मध्ये या धावपट्टीवर विमान उतरू शकेल, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.४0 हजार जनता अद्याप दारिद्र्यरेषेखालीजिल्ह्यातील ४० हजार जनता अद्याप दारिद्र्य रेषेखाली आहेत. त्यांच्या सबलीकरणासाठी राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वर्धीनीद्वारा गावाच्या विकासाबरोबरच दारिद्र्य रेषेच्याखालील लोकांच्या विकासासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.सी-वर्ल्डसाठी येथील ग्रामस्थांनी स्वेच्छेने जमीन देण्याचे कबुल केले आहे. त्यामुळे सी-वर्ल्डसाठी आवश्यक साडेतीनशे हेक्टर जमीन संपादित करून हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाईल.- दीपक केसरकर, पालकमंत्री