शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

विकास आराखड्यासाठी ८२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 00:39 IST

दीपक केसरकर : सिंधुदुर्गला पर्यटनदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गाला पर्यटनदृष्ट्या बळकट करण्यासाठी तसेच तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचार करता बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक क्रांती घडविण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आराखडा बनविण्यात आला आहे. याची माहिती रविवार ५ जून रोजी शरद कृषी भवन येथे होणाऱ्या कार्यशाळेत दिली जाणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी ८२ कोटी रूपये निधीची तरतूदही करण्यात येणार असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी जिल्ह्यासाठी चार योजना आखण्यात आल्या आहेत. याची इत्यंभूत माहिती कार्यशाळेत दिली जाणार आहे. याबाबत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, राष्ट्रीय जीवनोन्नती अभियानाचे विशेष कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी चांदा ते बांदा योजना व माझा गाव माझा विकास, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामीण पर्यटन यांचा समावेश आहे. किनारपट्टीतील पर्यटनदृष्ट्या सक्षम गावांंचा विकास अपेक्षित आहे. तर ग्रामीण पर्यटन अंतर्गत जिल्ह्यातील पाच समूह पर्यटन गटांचा विकास करण्यात येणार आहे. या अंतर्गत त्या समुहामधील गावात निवास, न्याहारी, साहसी पर्यटन, खाडी पर्यटन याद्वारे पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर आहे. त्याचा वापर करून विविध खाद्यपदार्थ, टिकाऊपदार्थ, बचत गटामार्फत बनवून त्यांची विक्री हमी देऊन करण्यात येणार आहे. त्यामुळे बचत गटांना व पर्यायाने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल.मालवण मधील स्कुबा डायव्हींग बरोबरच शिरोडा येथे स्कुबा डायव्हींग प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्याचदृष्टीने या कार्यशाळेत सांगोपांग चर्चा होणार अशी माहिती यावेळी दीपक केसरकर यांनी दिली.(प्रतिनिधी)चिपी विमानतळावर : २0१७ मध्ये विमान उतरणारचिपी येथील धावपट्टीचे काम पूर्णत्वास आले असून त्याचे स्थापत्य तयार झाले आहे. या वर्षात येथील वीजजोडणीचे काम पूर्ण होईल. या धावपट्टीची क्षमता अडीच किलोमीटर आहे. या धावपट्टीवर सर्वच प्रकारची विमाने उतरू शकतात. गोव्यातील विमानतळही अडीच किलोमीटर धावपट्टीचे आहेत. ज्यावेळी या विमानतळाचे भूमिपूजन होईल. तेंव्हा चिपीची धावपट्टी पूर्ण होऊन विमाने उतरू लागतील. सध्यस्थिती पाहता जून २०१७ मध्ये या धावपट्टीवर विमान उतरू शकेल, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.४0 हजार जनता अद्याप दारिद्र्यरेषेखालीजिल्ह्यातील ४० हजार जनता अद्याप दारिद्र्य रेषेखाली आहेत. त्यांच्या सबलीकरणासाठी राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वर्धीनीद्वारा गावाच्या विकासाबरोबरच दारिद्र्य रेषेच्याखालील लोकांच्या विकासासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.सी-वर्ल्डसाठी येथील ग्रामस्थांनी स्वेच्छेने जमीन देण्याचे कबुल केले आहे. त्यामुळे सी-वर्ल्डसाठी आवश्यक साडेतीनशे हेक्टर जमीन संपादित करून हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाईल.- दीपक केसरकर, पालकमंत्री