शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

विकास आराखड्यासाठी ८२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 00:39 IST

दीपक केसरकर : सिंधुदुर्गला पर्यटनदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गाला पर्यटनदृष्ट्या बळकट करण्यासाठी तसेच तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचार करता बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक क्रांती घडविण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आराखडा बनविण्यात आला आहे. याची माहिती रविवार ५ जून रोजी शरद कृषी भवन येथे होणाऱ्या कार्यशाळेत दिली जाणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी ८२ कोटी रूपये निधीची तरतूदही करण्यात येणार असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी जिल्ह्यासाठी चार योजना आखण्यात आल्या आहेत. याची इत्यंभूत माहिती कार्यशाळेत दिली जाणार आहे. याबाबत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, राष्ट्रीय जीवनोन्नती अभियानाचे विशेष कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी चांदा ते बांदा योजना व माझा गाव माझा विकास, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामीण पर्यटन यांचा समावेश आहे. किनारपट्टीतील पर्यटनदृष्ट्या सक्षम गावांंचा विकास अपेक्षित आहे. तर ग्रामीण पर्यटन अंतर्गत जिल्ह्यातील पाच समूह पर्यटन गटांचा विकास करण्यात येणार आहे. या अंतर्गत त्या समुहामधील गावात निवास, न्याहारी, साहसी पर्यटन, खाडी पर्यटन याद्वारे पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर आहे. त्याचा वापर करून विविध खाद्यपदार्थ, टिकाऊपदार्थ, बचत गटामार्फत बनवून त्यांची विक्री हमी देऊन करण्यात येणार आहे. त्यामुळे बचत गटांना व पर्यायाने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल.मालवण मधील स्कुबा डायव्हींग बरोबरच शिरोडा येथे स्कुबा डायव्हींग प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्याचदृष्टीने या कार्यशाळेत सांगोपांग चर्चा होणार अशी माहिती यावेळी दीपक केसरकर यांनी दिली.(प्रतिनिधी)चिपी विमानतळावर : २0१७ मध्ये विमान उतरणारचिपी येथील धावपट्टीचे काम पूर्णत्वास आले असून त्याचे स्थापत्य तयार झाले आहे. या वर्षात येथील वीजजोडणीचे काम पूर्ण होईल. या धावपट्टीची क्षमता अडीच किलोमीटर आहे. या धावपट्टीवर सर्वच प्रकारची विमाने उतरू शकतात. गोव्यातील विमानतळही अडीच किलोमीटर धावपट्टीचे आहेत. ज्यावेळी या विमानतळाचे भूमिपूजन होईल. तेंव्हा चिपीची धावपट्टी पूर्ण होऊन विमाने उतरू लागतील. सध्यस्थिती पाहता जून २०१७ मध्ये या धावपट्टीवर विमान उतरू शकेल, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.४0 हजार जनता अद्याप दारिद्र्यरेषेखालीजिल्ह्यातील ४० हजार जनता अद्याप दारिद्र्य रेषेखाली आहेत. त्यांच्या सबलीकरणासाठी राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वर्धीनीद्वारा गावाच्या विकासाबरोबरच दारिद्र्य रेषेच्याखालील लोकांच्या विकासासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.सी-वर्ल्डसाठी येथील ग्रामस्थांनी स्वेच्छेने जमीन देण्याचे कबुल केले आहे. त्यामुळे सी-वर्ल्डसाठी आवश्यक साडेतीनशे हेक्टर जमीन संपादित करून हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाईल.- दीपक केसरकर, पालकमंत्री